शहरात लोकसहभागाने हवेची गुणवत्ता समाधानकारक:सिंगल युज प्लास्टिक विरोधात महापालिका कठोर
प्रतिनिधी | अमरावती दिवसेंदिवस वाढणारे शहरीकरण, काँक्रिटचे जंगल आणि विकासकामांची घोडदौड सुरू असतानाच, महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे शहराने पर्यावरण संवर्धनात राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५’ मध्ये अमरावती शहराने देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावून मानाचा तुरा खोवला आहे. यापूर्वी २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये शहराने अनुक्रमे तृतीय, प्रथम आणि…