मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण 2 महिन्यात हटवा:विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश, हिंगोलीत घेतली यंत्रणांची बैठक
हिंगोली जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण दोन महिन्यात हटविण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी ता. २३ सायंकाळी जिल्ह्यातील आढावा बैठकीत दिले आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातून होणारी वाळू चोरी खपवून घेतली जाणार नाही. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी बैठक घेतली. यावेळी…