Headlines

शॉर्टसर्किटने 6 एकर ऊस जळून खाक:शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे बुधवारी सकाळी वीज वितरण वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून ६ एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब खरात यांचा ३ एकर, रामनाथ पाचपुते यांचा २ एकर व जगन्नाथ देशमुख यांचा १ एकर अशा एकूण ६ एकर क्षेत्रावरील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. उंचखडक बुद्रुक…

Read More

शाळेत राष्ट्रभक्तीचा जागर;विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी बनवल्या राख्या:टपाल विभागामार्फत सैनिकांपर्यंत पोहोचणार राख्या, पाथर्डीतील जि.प. शाळेत अनोखा उपक्रम‎

देशाच्या सीमेवर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देशबांधवासाठी व देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र सर्व संकटाचा सामना करत पहारा देणाऱ्या वीर जवान बांधवांसाठी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या पाठवून आमचे खरे रक्षणकर्ते भाऊ तुम्हीच आहात हा कृतज्ञता भाव शह . राख म्हणाले, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या मनात देशप्रेम व…

Read More

कार्यशाळेत 600 विद्यार्थ्यांनी बनवल्या शाडू मातीच्या पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती:शालेय विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या मूर्तीची घरी स्थापना करावी

यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करावा, असे आवाहन महापौर ज्योती गाडे व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. याचबरोबर, महानगरपालिकेच्यावतीन े आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धेत यंदा प्रथमच गड व किल्ल्यांवर आधारित ऐतिहासिक देखाव्यांचा समावेश करण्यात आला असून यासाठी विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत….

Read More

इको फ्रेंडली मूर्तीत लालबागचा राजा, बालगणेशची विविध रूपे:शाडू मातीसोबतच यंदा ‘पेपर मॅश’ गणेशमूर्तींना भाविकांची मिळतेय सर्वाधिक पसंती‎

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजारपेठेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मोठी विविधता पाहायला मिळत आहे. पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तींसोबतच यंदा ‘पेपर मॅश’ (कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या) मूर्ती हे मुख्य आकर्षण ठरत आहेत. ९ इंचापासून ते अगदी अडीच फुटांपर्यंतच्या आकारांत या मूर्ती उपलब्ध आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा बाजारात पद्मासन, लालबागचा राजा, बालगणेश, दगडूशेठ अशा जवळपास १० हून अधिक आकर्षक रुपांमधील पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा…

Read More

शेवगाव तालुक्यात पावसाच्या अभावाने पिके करपली, दमदार पावसाची प्रतिक्षा, तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट, पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू‎

पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी शेवगाव तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. सुरुवातीच्या पावसाने उभारी घेतलेली खरिपाची पिके आता पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे करपू लागली आहेत. कापूस, तूर, सोयाबीनसह अन्य पिकांना पाण्याचा ताण जाणवत असून अनेक ठिकाणी पिकांची पाने कोमेजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास संकटात सापडला असून बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. तालुक्यात…

Read More

नेपाळमधील पुरामुळे यूपी-बिहारमध्ये हाय अलर्ट:MP-राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे घरांना तडे गेले

नेपाळमधील रसुवा येथे बुधवारी आलेल्या पुरामुळे झालेल्या विध्वंसानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात नेपाळ सीमेला लागून असलेल्या महाराजगंज आणि कुशीनगरमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. बॅरेजचे सर्व 36 दरवाजे उघडल्याने गंडक नदीची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. बिहारमध्येही गंडक नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये…

Read More

नेपाळमध्ये पूर, बिहारमधील गंडक नदीत पाणी वाढले:बॅरेजचे 36 दरवाजे उघडले, म्हशी-फ्रिज वाहून आले, 8 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात बुधवारी आलेल्या पुरामुळे झालेल्या विध्वंसानंतर बिहारमधील गंडक नदीतील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. रात्री 12 वाजेपर्यंत नेपाळकडून सुमारे दीड लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. बगहा येथील गंडक बॅरेजचे 36 दरवाजे उघडण्यात आले आहेत. रात्री 12 वाजता बॅरेजमधून 1 लाख 52 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. सकाळी 6 वाजता 88 हजार क्युसेक…

Read More

कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध रद्द करावा- तहसीलदारांना निवेदन:जामनेर येथे कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज‎

कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून शेतकरी केंद्रित आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी जामनेर कृषी विभाग महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. सोमवारी सुधारित आकृतीबंधा विरोधात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधात प्रत्यक्ष क्षेत्रावरील कर्मचारी कमी करून कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचारी वाढवण्यात आले आहेत. यामुळे क्षेत्रावर ५४ टक्केच कर्मचारी राहणार आहेत. त्यातही…

Read More

ज्येष्ठ नागरिक समाजासाठी दीपस्तंभासारखे दिशादर्शक:रायपूरमध्ये प्रा. टी. पी. निकम यांचे प्रतिपादन‎

ज्ञान, संस्कार, संस्कृती आणि नीतिमूल्ये जपणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमुळे आदर्श समाज घडतो. समाजासाठी ज्येष्ठ नागरिक दीपस्तंभासारखे दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. टी. पी. निकम यांनी केले. रायपूर येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘प्रसदगिरी ज्येष्ठ नागरिक संघा’ची उत्साहात स्थापना करण्यात आली. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभाकर पानपाटील होते. प्रमुख…

Read More

वार्षिक 29 लाखांचा लिलाव; तरीही वणीचा आठवडे बाजार भरतो चिखलात:चार महिन्यांत स्थलांतराचे दिलेले आश्वासन हवेतच; विक्रेते पुन्हा रस्त्यावर‎

चार महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार, ग्रामस्थ, पोलिस अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन येथील बाजार मुख्य पटांगणात नियोजनबद्ध पद्धतीने भरविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी झा . वणीसह परिसरातील सुमारे २५ गावांतील नागरिक खरेदी-विक्रीसाठी या बाजारात येतात. शेतकरी भाजीपाला व शेतीमाल घेऊन येतात. मात्र, बाजार पटांगणातील मोठा परिसर अद्याप…

Read More