Headlines

दिल्लीतील प्राध्यापकाची हत्या करण्यासाठी 1400 किमी दूरून आले जोडपे:मालमत्ता हडप करू इच्छित होते, पोलिसांनी बंगालमधून अटक केली

दिल्ली पोलिसांनी दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिका देवोस्मिता पॉल यांच्या हत्येचा तपास तीन दिवसांत पूर्ण केला आहे. पोलिसांनी पश्चिम बंगालमधील बर्धमान येथील एका जोडप्याला अटक केली आहे. पोलिसांनुसार, मालमत्तेच्या वादामुळे दोन्ही आरोपी सुमारे 1400 किमी दूर पश्चिम बंगालमधून दिल्लीत आले होते. पॉल यांच्याकडे पश्चिम बंगालमध्ये एक मालमत्ता होती, जी त्यांना आजोबांच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने मिळाली होती….

Read More

हिंगोलीत अन्न व औषध प्रशासनाला कारवाईसाठी लय सापडेना:56 हजारांचा गुटखा पकडून पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न, कार्यालयाच्या कारवाईने अनेकांच्या भुवया उंचावल्या

हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून बेफामपणे गुटखा विक्री होत असतांना अन्न औषध प्रशासनाकडून मात्र झोपेचे सोंग घेतले जात होते. हिंगोली येऊन भेटीची औपचारीकता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईची लय सापडलीच नाही. त्यानंतर आता सचिव तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वसमत येथे छापा टाकून ५६ हजाराचा गुटखा पकडत स्वतःची पाठ थोपवून घेण्याचा प्रयत्न केला ओह. तर दुसरीकडे…

Read More

सोलापुरात नात्याला काळिमा:काकाकडून 5 वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा केला होता बनाव

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावातून नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काकानेच आपल्या अवघ्या 5 वर्षांच्या सख्ख्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. समर्थ यल्लाप्पा कास्तार असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. या क्रूर कृत्याप्रकरणी संशयित आरोपी काका अंकुश परसप्पा कास्तार याच्या विरोधात मंद्रूप पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात…

Read More

बळीराजाची चिंता वाढली:15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी, घाईघाईने पेरणी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यातील बळीराजा ज्या मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे, त्याबाबत आता एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आली आहे. परिणामी, आगामी आठवडाभरात राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता अत्यंत कमी…

Read More

दिल्लीत आंदोलनानंतर आपल्या घरी पोहोचले अभिजीत दीपके:म्हणाले- सरकारने ट्रेलर पाहिला कॉकरोच काय करू शकतात, पण गोष्ट संपली नाही

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी सांगितले की, परीक्षांमधील गोंधळावरून त्यांचे आंदोलन तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत. दीपके यांनी सांगितले की, शनिवारी नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले आंदोलन यशस्वी ठरले. यात सुमारे 7,000 लोकांनी भाग घेतला. आता हे आंदोलन देशभरात पसरवले जाईल. दीपके यांनी असेही…

Read More

देशात ड्रग्जविरोधी मोहीम सुरू, पाळेमुळे खणून काढणार:अल निनोमुळे यंदा राज्यात कमी पावसाची शक्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“राज्यात आणि देशात सध्या अंमली पदार्थांविरोधात ‘नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज’ ही मोहीम तीव्र गतीने राबवली जात आहे. विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चोख माहिती गोळा करून मोठ्या कारवाया केल्या जात असून, कुठल्याही परिस्थितीत ड्रग्जच्या काळ्या जाळ्याची पाळेमुळे खणून काढली जातील,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आगामी काळातही या कारवाया सातत्याने सुरूच राहतील, असा…

Read More

यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार:विधान परिषदेला अर्ज मागे घेणारे साहेबराव कांबळे शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रवेश

यवतमाळ स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी माघार घेऊन महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अखेर आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडीमुळे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून महायुतीची ताकद…

Read More

पुढील वर्षापासून 62% लोकांसाठी गृह-ऑटो कर्ज कठीण:नवीन नियम लागू होतील, 730 पेक्षा कमी सिबिल स्कोअर असलेल्यांना अडचण येईल

आरबीआयचा नवीन नियम ‘ईसीएल डायरेक्शन-2026’ 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहे. यानुसार, जर एखाद्या ग्राहकाने कर्जाचे दोन हप्ते (ईएमआय) भरण्यास चुकला, तर बँकांना 12 पट जास्त रक्कम बाजूला ठेवावी लागेल. बाजूला ठेवण्याचा अर्थ असा आहे की बँकेच्या ताळेबंदातून (बॅलन्स शीट) इतके रुपये कमी होतील, म्हणजेच यामुळे बँकांचा नफा सुमारे 42,000 कोटी रुपयांनी कमी होऊ…

Read More

मोदी सरकारने महागाईचे 'अच्छे दिन' आणले:नाराज होऊन 2-3 दिवस गावी जाण्याशिवाय शिंदेंकडे पर्याय नाही, भाजप-शिंदे गटात फक्त आडवा अन् जिरवा सुरू- अंबादास दानवे

देशात ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने प्रत्यक्षात मात्र महागाईचेच अच्छे दिन आणले असून, यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे, असे म्हणत उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरात वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात आयोजित ‘जनआक्रोश आंदोलना’दरम्यान ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन छत्रपती शिवाजी…

Read More

हृदय हेलावून टाकणारा पत्नीचा संघर्ष:स्ट्रेचर न मिळाल्याने आजारी पतीला पाठीवर वाहण्याची, अकोला जिल्हा रुग्णालयातील प्रकार

एकीकडे देशाला ‘विकसित राष्ट्र’ बनवण्याच्या मोठमोठ्या घोषणा आणि दावे केले जात असताना, दुसरीकडे देशातील आणि राज्यातील आरोग्य व्यवस्था किती पोखरलेली आणि तकलादू आहे, याचे अत्यंत संतापजनक आणि विदारक चित्र अकोल्यात समोर आले आहे. अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अनागोंदी आणि अमानवीय कारभाराचा एक हृदय हेलावून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रुग्णालयात वेळेवर…

Read More