गडचिरोलीत कडक उन्हाचा फटका पक्ष्यांनाही!:एकाच झाडावरच्या 500 वटवाघळांचा मृत्यू; जंगलात दुर्गंधी पसरल्याने प्रकार उघडकीस
महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात उकाडा चांगलाच वाढला आहे. तीव्र उष्णता तसेच जवळपास 46 डिग्री पर्यंतचे तापमान, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात उष्माघातामुळे देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या उन्हाचा फटका केवळ मनुष्यांनाच बसत आहे असे नाही. गडचिरोलीमध्ये उष्णतेमुळे तब्बल 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या…