![]()
देशातील अत्यंत प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (IIT) बॉम्बेमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 जुलै 2026 रोजी रात्री पवई येथील आयआयटी परिसरातील हॉस्टेल क्रमांक 4 मधील खोली क्रमांक ‘जी-4147’ मध्ये या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. या दुर्दैवी प्रकारामुळे आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण वसतिगृह परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. मटीरियल सायन्स विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या सोहिल राजकुमार या अवघ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत जीवनयात्रा संपवली आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांच्या एका पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, या आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. कौटुंबिक समस्यांमुळे अस्वस्थ असल्याची प्राथमिक माहिती या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले असून, मृत विद्यार्थी मूळचा राजस्थानमधील पिलानी येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या विद्यार्थ्याचा मोबाईल आणि चॅट रेकॉर्ड्स तपासले असता, तो गेल्या काही काळापासून कौटुंबिक समस्यांमुळे कमालीचा अस्वस्थ असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय, तो आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्येही अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होता, आणि याच वाढत्या मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी काय सांगितले? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येमागे नेमकी कारने शोधून काढण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर सर्व इलेक्ट्रोनिक उपकरणांची बारकाईने तपासणी केली जात आहे. कोणत्या विशिष्ट दबावामुळे किंवा मानसिक तणावामुळे त्या विद्यार्थ्याने असे टोकाचे पाऊल उचलले आहे, हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
Source link
IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या:दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहात घेतला गळफास, पोलिसांकडून तपास सुरू