Headlines

Admin

नेरपिंगळाई संस्थेला 'कृषीरत्न' पुरस्कार प्रदान:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव, कृषी-सहकारात उल्लेखनीय कार्य

नेरपिंगळाई येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेला महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘कृषीरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष संजय सुने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृषी, सहकार आणि शेतकरी विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेला हा बहुमान मिळाला आहे. मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांत…

Read More

मोर्शीत मोकाट जनावरांमुळे अपघातात वाढ:रस्त्यांवरील कळपांमुळे नागरिक त्रस्त, नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

मोर्शी शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी येथे मोठा अपघातही घडला होता. नगरपालिका प्रशासनाकडून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सातत्याने राबवली जात नाही. त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात मोकाट जनावरांचा त्रास अधिक वाढला…

Read More

29 शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा दीड महिन्यांपासून खंडित:कळमजापूरजवळ ट्रान्सफॉर्मर जळाल्याने महावितरणवर संताप, तातडीने डीपी बदलण्याची मागणी

चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर शेतशिवारात पळसखेड पांधन डीपीवरील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने तब्बल दीड महिन्यांपासून २९ शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही समस्या निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने पिकांना वेळेवर सिंचन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, वीजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे वीज पंप सुरू…

Read More

टीईटीला विरोध; 95 टक्के शाळांना टाळे:अमरावतीत 1500 शिक्षकांचा मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला साकडे

अमरावती जिल्ह्यात ९ जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळा बंद राहिल्या. शिक्षक पात्रता चाचणीला (टीईटी) विरोध दर्शवण्यासाठी शिक्षकांनी सामूहिक रजा घेतल्याने जिल्ह्यातील ९५ टक्के शाळांना टाळे लागले. रजेवर असलेल्या शिक्षकांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात दीड हजाराहून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला, ज्यात महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन…

Read More

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक:दोन मोटारसायकलींसह 2 लाख रुपयांचे साहित्य जप्त

मोर्शी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलींसह सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ जुलै रोजी पहाटे गस्तीदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. मोर्शी-वरूड रोडवरील वारकरी ढाब्याजवळ दोन मोटारसायकलींवर चार संशयित इसम थांबले असून,…

Read More

मुख्याध्यापक ठाकरे यांनी शाळेला दिला 51 हजारांचा निधी:सेवापूर्तीनिमित्त खुल्या जीपमधून स्वागत, डिजिटल पॅनल भेट

नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे यांनी आपल्या सेवापूर्तीनिमित्त शाळेला ५१ हजार रुपयांचा निधी अर्पण केला. शाळेने त्यांचे एका दिमाखदार सोहळ्यात स्वागत केले, ज्यात त्यांना खुल्या जीपमधून आणण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी भूषवले. शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद अशोक देशमुख…

Read More

अनियंत्रित ट्रकच्या धडकेने जलवाहिनी फुटली:पेट्रोलपंप जलमय, अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट

गुरुवारी सकाळी नांदगाव पेठ येथील अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ एका अनियंत्रित ट्रकच्या धडकेने अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट निर्माण झाले आहे. सकाळी साडेनऊ वाजता डिझेल भरण्यासाठी येत असलेल्या यूपी ७८ डीटी ४५७७ क्रमांकाच्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट…

Read More

पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी:डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द, लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा फटका

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुरुस्तीच्या कामाला वेळ लागणार असल्याने…

Read More

'आयटी आणि एआय दिंडी'चे आळंदीतून प्रस्थान:'मुखी विठ्ठल नाम, करु देश बलवान!' घोषवाक्यासह 1200 वारकरी सहभागी

पुणे येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञांनी सुरू केलेल्या ‘आयटी दिंडी’चे आज, गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी आळंदी येथून पुणे शहराच्या दिशेने प्रस्थान झाले. संत ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासोबत अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारी ही दिंडी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. ‘मुखी विठ्ठल नाम, करु देश बलवान!’ हे यावर्षीचे घोषवाक्य असून, यात ‘आत्मनिर्भर भारत’…

Read More

पाणीपुरवठा पंपिंग उद्या सकाळी सुरू करा:दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, मनपा आयुक्त अमोल येडगे यांचे कडक निर्देश

छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठ्याबाबत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी कडक निर्देश दिले आहेत. उद्या सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठ्याची पंपिंग सुरू झालीच पाहिजे, असे त्यांनी संबंधित एजन्सी आणि अधिकाऱ्यांना बजावले. कामात कोणतीही दिरंगाई किंवा सबबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. आज स्मार्ट सिटी कार्यालयात आयुक्त येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठ्याच्या…

Read More