भेसळखोरांचे धाबे दणाणले:कारवाईच्या धास्तीने जामखेडात दुग्धजन्य पावडरच्या 50 गोण्या वनक्षेत्रात फेकल्या, दिघोळ-तेलंगशी रस्त्यावरील प्रकार
राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नभेसळीविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील दिघोळ–तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरसदृश पदार्थाच्या तब्बल ५० ते ६० गोण्या बेवारस अवस्थेत टाकून दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी, पशुपालक…