कांदा प्रश्न पुन्हा पेटला!:किसान काँग्रेस आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्त्यावर कांदे फेकत सरकारचा निषेध, आंदोलन ताब्यात
राज्यात कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. आज महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या वतीने थेट मंत्रालयाबाहेर आक्रमक निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी मंत्रालयासमोरील मुख्य रस्त्यावर कांदे फेकून सरकारचा निषेध केला. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आज मंत्रालयात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची…