Headlines

दाभा गावात तीव्र पाणीटंचाई:ग्रामस्थांना 20 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा, महिलांचे निवेदन

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून शासकीय नळयोजनेचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांनी थेट नांदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नळ योजनेद्वारे २० दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत…

Read More

अंदाज समितीने अधिकाऱ्यांना फटकारले:कोणार्क, पोषण आहार, कंपोस्ट डेपो आगीच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले

विधीमंडळ अंदाज समितीने गुरुवारी जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुखांची पुन्हा एकदा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या या बैठकीत शहरातील कचरा विल्हेवाट लावणारी कोणार्क कंपनी, शालेय पोषण आहार आणि सुकळी येथील कंपोस्ट डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीचे मुद्दे केंद्रस्थानी होते. आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एकूण २९ सदस्य आहेत. अमरावतीत ११ प्रतिनिधी दाखल झाले होते,…

Read More

हिंगोलीत वनविभागाचे दोन ठिकाणी छापे:दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यात वन विभागाचे पथकाने दोन ठिकाणी शुक्रवारी तारीख 29 टाकलेल्या छाप्यामध्ये दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभाग अंतर्गत औंढा वनपरिक्षेत्रातील मौजे जवळा बाजार येथील एका पेट्रोल पंपाजवळ आमराई मध्ये सागवान व इतर अधिसूचित वृक्ष प्रजातीचे वृक्ष तोड करुन लाकडांचा साठा केला…

Read More

आमच्यात कसलीही स्पर्धा नाही:आम्ही 'इन्फ्रा फॅमिली' आहोत, एकनाथ शिंदेंसोबतच्या श्रेयवादाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्राच्या विकासावर तसेच येथील पायाभूत सुविधांवर भाष्य केले. तसेच महायुतीमधील अंतर्गत राजकारणावरही त्यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्र पुढील 4-5 वर्षात इतका पुढे जाईल, देशात कोणीच स्पर्धा करू शकणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच येथील पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने होत असलेल्या श्रेयवादाच्या लढाईवर बोलताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

Read More

Quiz on Korea 2026 Pune: King Sejong Institute Event

कोरिया प्रजासत्ताकाच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासातर्फे ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ या जागतिक स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २८ जून २०२६ रोजी किंग सेजोंग इन्स्टिट्यूट येथे होणार आहे. कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालय, कोरियन . कोरियाचे मुंबईतील उपवाणिज्यदूत क्येओंगबेओम किम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, या स्पर्धेद्वारे सहभागी विद्यार्थ्यांना कोरियाची…

Read More

कोल्हापुरात संताप!:जामिनावर सुटताच नराधमाने पीडितेला पुन्हा गाठले, धर्मांतराची धमकी देत विनयभंग; आरोपीला अटक

कोल्हापूरच्या शिरोली पुलाची येथील एका गुन्हेगाराने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले असून, अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या गैबीसाहेब दस्तगीर लिंगरे (वय 42) याने पीडित महिलेला पुन्हा गाठून तिचा विनयभंग केला आणि तिला धर्मांतरासाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या खळबळजनक घटनेची गांभीर्याने दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या असून, जामिनावर बाहेर असतानाही त्याने…

Read More

लढायची वेळ आली की कोणाला तरी पुढे करतात:विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरे व काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. लढायची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात, अशी टीका शिंदे यांनी केली आहे. तसेच गोरगरीब, शोषित आणि दिव्यांगांच्या हितासाठी शिवसेना सदैव कार्यरत असल्याचे सांगत, त्यांनी बच्चू…

Read More

भोंदू अशोक खरातला न्यायालयीन कोठडी:सरकारी वकिलावर भोंदूबाबाचे वकील पडले भारी, सुनावणीवेळी कोर्टात काय घडले?

महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी घेरलेला भोंदू बाबा अशोक खरात याला आज न्यायालयाने दिलासा दिला आहे. तपास यंत्रणेने ८ व्या गुन्ह्यात खरातच्या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, आरोपीच्या वकिलांचा आक्रमक युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती बी. एन. ईचपुराणी यांनी त्याला १२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली आहे. खरातचा रवानगी आता पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये 120 अतिक्रमणे जमीनदोस्त:शहानुरमिया दर्गा रोडवरील फळविक्रेते, चायनीज चौपाटी हटवली; मनपाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने (मनपा) शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम तीव्र केली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मनपाच्या पथकाने शहरात कारवाई करत १२० अतिक्रमणे जमीनदोस्त केली. बुधवारी १४० अतिक्रमणे हटवण्यात आली होती. ही कारवाई वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी करण्यात येत आहे. आजची कारवाई प्रामुख्याने शहानूर मियां दर्गा परिसरापासून ते भाजीवाली बाई पुतळ्यापर्यंत राबवण्यात…

Read More

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 13 लाखांची फसवणूक:नागपूर सायबर पोलिसांनी परत मिळवली रक्कम, आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेणार

नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका वयोवृद्ध दाम्पत्याची 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या एका महिन्यात फसवणुकीची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना परत मिळवून दिली. अज्ञात आरोपींनी या दाम्पत्याला व्हिडिओ कॉल करून त्यांच्या नावावर बँक खाते उघडल्याचे खोटे सांगितले. या खात्याचा वापर दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवायांसाठी होत असल्याचे…

Read More