दाभा गावात तीव्र पाणीटंचाई:ग्रामस्थांना 20 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा, महिलांचे निवेदन
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून शासकीय नळयोजनेचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांनी थेट नांदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नळ योजनेद्वारे २० दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत…