Headlines

सहा वारस असताना केवळ दोघांच्या नावे केले बक्षीसपत्र:सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण‎

प्रतिनिधी | सिल्लोड तीन मुलगे, तीन मुली असे ६ वारस असताना एक मुलगा, एक मुलगी यांच्या नावे ७० गुंठे जमिनीचे बेकायदा बक्षीसपत्र करून फेरफार घेतल्याचा आरोप आहे. हे बक्षीसपत्र व फेरफार रद्द करावा, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवार (२८ एप्रिल) दुपारी ११ वाजेपासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शिंदेफळ येथील कुटुंब आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला…

Read More

देवी दाक्षायणीच्या चरणी २५ लाखांची देणगी; सोन्या-चांदीचे दागिनेही दान:यात्रोत्सवादरम्यान देवीचे दर्शन घेत भाविकांनी मनोभावे वाहिली मोठी देणगी‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील लासूरगावातील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाची नुकतीच सांगता झाली. यात्रेला आलेल्या भाविकांनी मंदिराच्या दोन्ही दानपेटीत टाकलेली देणगी तसेच सोन्या-चांदीच्या वाहिक वस्तूंची मंदिराच्या सभागृहात मंगळवारी सकाळी दहा वाजता तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या उपस्थितीत तब्बल १६ तास मंदिर प्रशासनाकडून इनकॅमेरा मोजदाद करण्यात…

Read More

आंबेडकर जयंती- आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे 17 जणांवर गुन्हे:मिरवणुकीत यंदा सर्वाधिक 132.4 डेसिबल आवाजाची नोंद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजेचे नियम उल्लंघनप्रकरणी अखेर १४ दिवसांनी १७ जणांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात व्यापारी क्षेत्रात ध्वनी मर्यादा ६५ डेसिबलची असताना त्याहून जवळपास दुप्पट १३२.४ डेसिबलची नोंद करण्यात आली आहे. बहुतांश मंडळांचा आवाज हा १०० डेसिबलच्या पार गेल्याच्या नोंदी पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. १४ एप्रिल…

Read More

मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर‎:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई‎

यंदा मराठवाड्यात पावसाने ‎चांगली हजेरी लावली होती. मात्र,‎कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे ‎स्रोत वेगाने आटू लागले आहेत. ‎परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश‎ भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र‎होऊ लागल्या अाहेत.‎ प्रशासनाकडे पिण्याच्या‎ पाण्यासाठी टँकर्सची मागणी ‎वाढली आहे. सद्यःस्थितीत बीड‎आणि धाराशिव हे दोन जिल्हे‎ वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टँकर‎ सुरू केले आहेत. विभागीय‎ आयुक्तालयाच्या २९ एप्रिलच्या‎ अहवालानुसार, मराठवाड्यातील‎ छत्रपती संभाजीनगर, जालना‎ आणि लातूर…

Read More

आमदार रासने यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट:ज्ञानेश्वर पालखी मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील भवानी पेठ येथील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र, सोहळ्यात सहभागी होणाऱ्या…

Read More

अमरावती विद्यापीठात पत्रकारिता परीक्षेचा गोंधळ, परीक्षा रद्द:चौथ्या सेमिस्टरला तिसऱ्याचा पेपर; आठवडाभरात पुन:परीक्षा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पत्रकारितेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाला. विद्यार्थ्यांना चक्क तिसऱ्या सेमिस्टरचा पेपर मिळाल्याने मंगळवारी होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे सरसकट चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करण्याची मागणी केली, मात्र विद्यापीठाने ती अमान्य करत आठवडाभरात पुन:परीक्षा घेण्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी…

Read More

राजुरवाडीजवळ जंगलाला आग, वीज केंद्राजवळ पोहोचली:अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

राजुरवाडी गावाजवळच्या जंगल परिसरात आज, बुधवारी दुपारी भीषण आग लागली. ही आग महावितरणच्या वीज केंद्राजवळ पोहोचल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवून संभाव्य धोका टाळण्यात यश आले. वनविभागाच्या कम्पार्टमेंटमध्ये दुपारच्या सुमारास ही आग लागली. वाढत्या तापमानामुळे आणि कोरड्या झाडाझुडपांमुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. ही…

Read More

उष्णतेच्या लाटेमुळे विद्यापीठ परीक्षांच्या वेळेत बदलाची मागणी:सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी कुलगुरूंना केले पत्रव्यवहार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळेत बदल करण्याची मागणी सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी केली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी विद्यापीठाला पत्रव्यवहार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. भारतीय हवामान विभागाने २५ एप्रिल ते १२ मे दरम्यान तापमान ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा…

Read More

राज्यात केंद्रीय विद्यालयांसाठी मिळणार निःशुल्क सरकारी जागा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय, महसूलमंत्री बावनकुळे यांचा पुढाकार

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनकडून जागा मागितली असल्यास रीतसर मान्यता मिळालेल्या केंद्रीय विद्यालयांसाठी निशुल्क जागा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने आज घेतला. विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथे केंद्रीय विद्यालयासाठी याच निर्णयाने जागा देण्यात आली. आता राज्यात केंद्रीय विद्यालये उभारण्यासाठी गती येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज…

Read More

महाराष्ट्र दिनी किडनी रुग्णांना मोठी भेट:राज्यात 'महाडायलिसिस' योजनेचा विस्तार, 1 मे रोजी 12 नवीन केंद्रांचे लोकार्पण

ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना सरकारी दवाखान्यात मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या “महाडायलेसिस” योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते एक मे रोजी नवीन बारा डायलिसिस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामुळे किडनी विकारांच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या…

Read More