Headlines

जिल्हा रुग्णालयात मोफत फिजिओथेरपी:दरमहा होणारा 15 हजारांचा खर्च वाचेल, ऑगस्टपासून कॅन्सरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 10 बेडचा स्वतंत्र कक्ष‎

. जिल्हा शासकीय रुग्णालयात आता कॅन्सर रुग्णांसाठी मोफत फिजिओथेरपी उपचार सुरू करण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे उपचार प्रत्यक्षात सुरू होणार असून, यासाठी १० बेडचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे. यामुळे खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी होणारा १० ते १५ हजार रुपयांचा मासिक खर्च वाचणार आहे. सध्या जिल्ह्यात कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात दरवर्षी…

Read More

दूधपंढरीत चारा टंचाईची झळ; मुरघासाचा खर्च आवाक्याबाहेर!:जिल्ह्यात 16 लाख पशुधन, 58 हजार हेक्टरवर मका‎

उन्हाची तीव्रता वाढत असतानाच, जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध चाऱ्याचे भाव कमालीचे वाढले आहेत. यापार्श्वभूमीवर सुमारे १६ लाखांवर पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालकांनी मुरघासाच्या बॅगा भरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, वाढत्या दरामुळे एका हजार ते अकराशे किलोच्या बॅगेचा खर्च चार ते पाच हजारांवर पोहोचला आहे. राज्यात दूधउत्पादनात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर…

Read More

दुगावला उलगडले मीराबाईंच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग:संत मीराबाई संगीतमय कथेच्या पाचव्या दिवशी राधा महाराजांचे निरुपण‎

दुगाव येथील दुग्धेश्वर मैदान येथे सुरू असलेल्या संत मीराबाई संगीतमय चरित्रकथेचा पाचवा दिवस अत्यंत भावपूर्ण आणि ज्ञानवर्धक ठरला. कथाकार वैष्णवभूषण श्री राधा महाराज (देवरगावकर) यांनी शुक्रवारी (दि. १०) संत मीराबाईंच्या जीवनातील अत्यंत कठीण मात्र तितक्याच प्रेरणादायी प्रसंगांचे वर्णन केले. कथेच्या पाचव्या दिवशी मीराबाईंचा चित्तोडगडचे राजकुमार कुंवर भोजराज यांच्याशी झालेला विवाह सोहळा सादर करण्यात आला. श्री…

Read More

इंदूर – पुणे मार्गावरील वाहतूक मंगळवारी 13 तास राहणार बंद:मनमाडमध्ये जयंती मिरवणुकांमुळे पाेलिसांचा निर्णय‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ ते रात्री १२ या कालावधीत मालेगाव- मनमाड- अहिल्यानगर (इंदूर- पुणे) राष्ट्रीय महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. मनमाड शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुका व शोभायात्रांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली…

Read More

शेती फायद्याची असेल तरच देशाचा विकास:येवला येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रमात जाधव यांचे प्रतिपादन‎

खासगीकरण आणि मक्तेदारीमुळे सामान्य माणसाच्या उपजीविकेची साधने हिसकावून घेतली जात आहेत. भांडवलीकरणामुळे रोजगार आणि शेतीचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत सामान्य शेतकऱ्याचा शेती व्यवसाय फायद्याचा होऊन त्याचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड किशोर…

Read More

शॉर्टसर्किटने पिंपळदरीतील ‎रोहित्र जळाले, अनर्थ टळला‎:युवकांची तत्परता; झाडाच्या फांद्या, मातीची ढेकळे मारल्याने आगीवर नियंत्रण

पिंपळदरी गावालगतच्या परिसरात महावितरणच्या एका विद्युत डीपीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी (११ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता घडली. काही धाडसी युवकांनी प्रसंगावधान राखून वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र डीपी जळून खाक झाली. गावाला वीजपुरवठा या डीपीवरून होत होता. सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास डीपीवरील तारांचे घर्षण झाले. मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या….

Read More

Khultabad to count Urus grounds, transparent policy decided, planning in the backdrop of Hazrat Jar Jari Jar Bakhsh Urs

खुलताबाद1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक खुलताबाद येथील हजरत जर जरी जर बक्ष उरुसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजनाला वेग दिला आहे. तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली उरूस व्यवस्थापन समितीची बैठक झाली. उरूस आयोजनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. महत्त्वाचे ठराव सर्वानुमते मंजू Source link

Read More

महिलांना आरक्षण देणे हीच महात्मा फुलेंना खरी आदरांजली- मुख्यमंत्री:ज्योती-सावित्री जि. प. शाळेचे फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा जोतिबा फुले यांच्या स्त्रीशिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात…

Read More

प्रगतिशील शेतकरी:पाण्याचे बजेट, मार्केटिंगद्वारे जिरायत शेतीतून 96 लाखांचे उत्पन्न; राहात्याचे शेतकरी सुभाष गडगेंचा आदर्श पॅटर्न

राहाता तालुक्यातील पिंपरी लोकाई हे गाव कधीकाळी दुष्काळाच्या छायेत होते. वार्षिक जेमतेम 150-200 मिमी पाऊस. अशा जिरायत भागात जिथे 20 एकरातून 5 पोती बाजरी निघणे कठीण होते, तिथे सुभाष विठ्ठल गडगे हे प्रयोगशील शेतकरी आज 96 लाखांचे उत्पन्न घेत आहेत. एकेकाळी कुटुंबासाठी ‘ड्रायव्हर’ म्हणून चाक फिरवणाऱ्या या हातांनी आज आधुनिक शेतीचे स्टिअरिंग इतके घट्ट पकडले…

Read More

अश्व क्षेत्रासाठी राज्य सरकार करणार सामंजस्य करार:मंत्री पंकजा मुंडेंची घोषणा, संस्थांशी सहकार्य करून देणार उभारी

अश्व क्षेत्राच्या परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थांशी सहकार्य करण्यास आणि विद्यापीठांशी जोडले जाण्यास तत्पर असेल. यासाठी संस्थांशी सामंजस्य करार (MoU) करण्याची घोषणा राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. ‘द इक्वेस्ट्रियन फोरम २०२६’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीच्या अधिपत्याखालील ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’ संस्थेने या परिषदेचे…

Read More