Headlines

Majrewadi Affordable Homes: 1600 Ready, But No Basic Amenities

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात तीन मोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. पैकी दहिटणे येथील गृहप्रकल्पात लाभार्थींना हक्काची घरे मिळाली. सलगरवस्ती येथे बांधकाम सुरू आहे. मजरेवाडी येथील गृहप्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण झाले. एकूण 6174 पैकी 1600 घरांचे बां . मजरेवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेतून ‘परवडणारी घरे’ या योजनेतून 2464 घरांचा खासगी प्रकल्प आणि त्याच्या शेजारीच महाराष्ट्र…

Read More

स्वच्छतेची जबाबदारी केवळ मनपाची नसून प्रत्येक नगरकरांचीही- महापौर:शाहू महाराज जयंतीनिमित्त अभियान; सक्कर चौक परिसराची केली साफसफाई‎

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरभर विशेष स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. “स्वच्छतेमुळे शहराचे सौंदर्य वाढतेच, शिवाय नागरिकांचे आरोग्यही सुदृढ राहते. ही जबाबदारी केवळ महापालिकेची नसून प्रत्येक नगरकरांची आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. यापुढे प्रत्येक दहा दिवसांनी शहरातील विविध भागांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे….

Read More

ग्राऊंड रिपोर्ट:कुरनूर धरणावरील वीजपुरवठा केला बंद; पाऊस अन् वीजही नाही, शेतकरी संकटात

प्रतिनिधी | अक्कलकोट पावसाने ओढ दिल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील पाणीसाठा आणि पाणी वापराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर बोरी मध्यम प्रकल्प तसेच पाटबंधारे तलावावरील कृषीपंपांना विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी होणारा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी आणि पाणीसाठ्याचे नियोजन सुरळीत…

Read More

अनुसूचित जातीच्या 59 जातींचा जनसागर रस्त्यावर उतरणार:उपवर्गीकरणाचा घाट हाणून पाडण्यासाठी तिवस्यात ‘एल्गार मोर्चा

देशात हिंदू-मुस्लिम वाद पेटवल्यानंतर आता केंद्र व राज्य सरकारने जाती-जातीत भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहेत. अनुसूचित जातीतील ५९ जातींचे हक्काचे १३ टक्के आरक्षण संपवण्याचा सरकारचा हा कुटील डाव असून, हा उपवर्गीकरणाचा घाट कोणत्याही परिस्थितीत हा . या मोर्चात ५ हजारपेक्षा जास्त आंबेडकरी जनसागर रस्त्यावर उतरणार असून, तालुक्यातील सामाजिक व राजकीय वातावरण या निमित्ताने कमालीचे…

Read More

टाळ-मृदंगाच्या गजरात लखमाजी महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना:चोहोट्टा बाजार येथे पालखीचे भाविकांकडून उत्साहात स्वागत‎

श्री क्षेत्र लखमाजी महाराज संस्थान, बाग (वनोजा) येथून निघालेली आषाढी पायी पालखी दि. २६ जून रोजी दुपारी चोहोट्टा बाजार येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात दाखल झाली. श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या पालखीचे स्थानिक ग्रामस्थांनी व भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत करून वारकरी परंपरेचा गौरव जपला. अकोला-अकोट मुख्य महामार्गावरील प्रमुख चौकातून पालखीचे आगमन होताच अवघा परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात…

Read More

महेश नवमीच्या शुभपर्वावर निघाली देखणी शोभायात्रा:वायएसपीचे सुनील राणा यांनी राजकमल चौकात केले स्वागत‎

प्रतिनिधी | अमरावती महेश नवमीच्या पावन पर्वानिमित्त शहरात मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या देखण्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, धार्मिक देखावे, आकर्षक रथ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी शोभायात्रेची शोभा वाढवली. युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या नेतृत्वात राजकमल चौकात जल्लोषात शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला…

Read More

मनपा क्षेत्रात 67 हजारांहून अधिक बालकांना पल्स पोलिओचे दोन थेंब:अमरावतीत मोहिमेची तयारी, आयुक्त वर्षा लड्डा यांचे आवाहन‎

देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या ब . या बैठकीस मनपा आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, एन.एम.ए….

Read More

लोककलावंतांच्या मानधनात वाढ करा- दशरथ धुमाळ:अधिवेशनात मागण्या मांडण्याची आ. जगताप यांना विनंती‎

हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ धुमाळ यांनी लोककलावंतांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील लोककलावंतांच्या मागण्या आमदारांनी मांडाव्यात, अशी विनंती धुमाळ यांनी यावेळी केली. पारंपरिक लोककलावंतांची निवड इष्टांक ५०० पाचशे करावा अशी मागणी या…

Read More

विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास साधावा- शिंदे:खडांबे येथील विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी‎

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. सर्व समाजघटकांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी अनेक लोकहितकारी निर्णय घेतले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा, असे आवाहन प्राचार्य अप्पासाहेब शिंदे यांनी केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री शाहू विद्या मंदिर खडांबे येथे…

Read More

सलग तिसऱ्या वर्षी मोहरम मिरवणूक रेंगाळली:दोन्ही सवाऱ्या रात्री पावणेनऊ वाजता दिल्लीगेटमधून बाहेर,पावसाच्या हजेरीनंतर वाढला वेग‎

शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मोहरम मधील इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या सवारीची ‘कत्तलची रात्र’ व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. मात्र, या दोन्ही मिरवणूका बराचवेळ रेंगाळल्या. कत्तलची रात्र मिरवणूक शनिवारी रात्री बारा वाजता सुरू झाली. . दोन्ही मिरवणुका पारंपारिक मार्गाने काढण्यात आल्या. त्यासाठी सुमारे एक हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी असा मोठा…

Read More