आपेगाव, हिरडपुरी बंधारे तुडुंब; 50 गावांचा पाणी प्रश्न मिटला:हजारो हेक्टर शेतीला मिळणार भक्कम आधार, जायकवाडी धरणातील विसर्गाचा फायदा
पैठण जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस आणि वरच्या धरणांमधून झालेली जोरदार आवक यामुळे जायकवाडी धरण सध्या ९३ टक्क्यांहून अधिक भरले आहे. धरणाची सुरक्षितता आणि पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गेल्या सहा दिवसांत धरणाचे दरवाजे उघडून ५ टीएमसीहून अधिक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. या सोडलेल्या पाण्याचा थेट व मोठा फायदा पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी…