Headlines

सिया – केतनने गुगलवर शोधला 'डेथ पॉइंट':लोहगड किल्ल्यावर आधी केली रिहर्सल; पोलिसांच्या चौकशीसाठी उत्तरेही तयार केली होती

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांना कटाशी संबंधित अनेक पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनुसार, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी गुगल मॅपवर लोहगड किल्ल्याच्या पायवाटा, धोकादायक ठिकाणे आणि दऱ्यांची माहिती गोळा केली. दोघांनी गुगलवर ‘डेथ पॉइंट’ आणि ‘विष देऊन कसे मारावे, जेणेकरून पोलिसांना संशय येणार नाही’ असे प्रश्नही शोधले होते. दोघांनी आधीच हे देखील…

Read More

डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा पॅटर्न राज्यासाठी आदर्श:परदेशी भाषा, एआयच्या उपक्रमांचे नितीन लालसरे यांच्याकडून कौतूक‎

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी फ्रेंच, चायनीज, इटालियन आणि स्पॅनिश यांसारख्या परदेशी भाषा आत्मविश्वासाने बोलत असतील, स्वतःची विद्यार्थी सहकारी बँक चालवत असतील, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण घेत असतील, तर तो संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम असून, राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे…

Read More

कोट्यवधींचा खर्च पाण्यात:पहिल्याच पावसामध्ये गंगापूर ते कायगाव‎रस्ता चिखलमय; वाहनधारकांची गैरसोय‎

गंगापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर आणि शेजारील अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मानला जाणारा गंगापूर ते कायगाव हा ८ किलोमीटरचा रस्ता पहिल्याच पावसाळ्यात पूर्णपणे चिखलमय झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या मुख्य मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, हा रस्ता आता वाहतुकीसाठी पूर्णपणे अयोग्य बनला आहे. यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत…

Read More

कन्नडला 3 हजार नागरिकांमागे 1 पोलिस:37 कर्मचाऱ्यांवर भार, शहरामध्ये सुरक्षेचा उडाला बोजवारा‎

कन्नड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून, नुकतीच पोलिस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारात झालेल्या एका खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या अंतर्गत सुरक्षेचा आणि अपुऱ्या मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत ठाण्यातील रिक्त पदांची संख्या पाहता, ३ हजार नागरिकांमागे १ पोलिस असून, ५२ पदे रिक्त असल्याने ३७ कर्मचाऱ्यांवर भार पडत…

Read More

संभाजीनगरात पोषण आहार काळाबाजार:कलीम कुरेशी गँगवर मकोका कारवाई, किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनीत मारला होता पोलिसांनी छापा

सार्वजनिक वितरण प्रणालीचे रेशन धान्य आणि अंगणवाडीतील बालके तसेच गरोदर मातांसाठी असलेल्या पोषण आहाराची बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या कलीम छोटू कुरेशीसह त्याच्या गुन्हेगारी टोळीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. १२ जून रोजी गुन्हे शाखेने किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनी येथील एम. आर. फंक्शन हॉलच्या तळमजल्यावरील गाळ्यावर छापा टाकला होता. या कारवाईत शासनामार्फत मिळणारा…

Read More

पुण्यात देशी पिस्तूल बाळगणारा सराईत आरोपी अटकेत:धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरातून गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हा दाखल

गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश सुरेश ढोरे (वय ३८, रा. शिव कॉलनी, आंबेगाव पठार, धनकवडी) असे आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात…

Read More

चांदूर बाजारमध्ये रस्ता उखडला, खड्डे वाढले:विद्यार्थी, रुग्णांसह वाहनधारकांना अपघाताचा धोका

चांदूर बाजार शहरालगत असलेल्या शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीतील प्रल्हादपूर येथील शिवाजी चौक ते शिवाजी नगरकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्णतः निघून गेल्याने लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. हा मार्ग चांदूर बाजार-वलगाव रस्त्यावर शिवाजी चौकातून शिवाजीनगरकडे जातो…

Read More

मोझरी, कौंडण्यपूर, वलगाव विकास आराखड्यांना 72 कोटी मंजूर:आमदार राजेश वानखडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाचा निर्णय

तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव येथील विकास आराखड्यांतील रखडलेल्या कामांना आता गती मिळणार आहे. राज्य शासनाने या तिन्ही विकास आराखड्यांसाठी एकूण ७२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. आमदार राजेश वानखडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर येथील विकास आराखड्यांमध्ये हस्तांतरणाअभावी निर्माण झालेली अनागोंदी आणि इमारतींची दुरवस्था…

Read More

अमरावतीतील शाळा 30 जूनपासून सुरू:सीईओ गांधींच्या महत्त्वाच्या सूचना; गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश

अमरावती जिल्ह्यातील शाळा मंगळवार, ३० जूनपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शिक्षण विभागाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शाळांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विदर्भातील तापमानवाढीमुळे अमरावती जिल्ह्यातील शाळा उशिरा सुरू होत आहेत. या तयारीचा आढावा घेण्यासाठी सीईओ गांधी यांनी शिक्षण…

Read More

बसस्थानकाजवळ 200 मीटर नियमाचे उल्लंघन:खाजगी वाहतूक सर्रास सुरू, परिवहन मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही अमरावतीत परिस्थिती 'जैसे थे'

अमरावती येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर अंतराच्या आतूनच बेकायदेशीर खाजगी वाहतूक सुरू असून, यामुळे राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) मोठा आर्थिक फटका बसत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे या प्रकारात संगनमत असल्याचा आरोप प्रवासी आणि जागरूक संघटनांकडून केला जात आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवाशांची पळवापळवी सुरू…

Read More