Headlines

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्षे पूर्ण:29 जूनपासून महाराष्ट्रात 'सहकार सप्ताह', पुणे, मुंबई अन् सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारत सरकारने 6 जुलै 2021 रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. या मंत्रालयाच्या स्थापनेला 2026 मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 29 जून 2026 ते 6 जुलै 2026 या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पुणे, मुंबई आणि सांगली येथे विविध कार्यक्रमांचे…

Read More

शिवसेनेत येणाऱ्या मविआच्या नेत्यांचे स्वागत:पण कोणतेही 'ऑपरेशन' सुरू नाही, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण; संजय दिना पाटलांवरही भाष्य

पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या प्रकरणावरून खासदार संजय दिना पाटील यांच्याभोवती निर्माण झालेल्या वादावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपणही दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगतानाच त्यांनी यापुढे असे वक्तव्य होणार नाही आणि संजय दिना पाटील यांनीही माफी मागितली असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद…

Read More

2024चा पेपर फुटूनही अधिकाऱ्याला बढती दिली, म्हणूनच 2026मध्ये पुन्हा घोटाळा:धर्मेंद्र प्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नीट पेपरफुटीवरून रोहित पवार आक्रमक

2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपरफुटला होता पण तरीही त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला भाजपशासित राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून बढती देण्यात आली. त्यामुळे त्या विभागातील लोकांचे धाडस वाढले आणि 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. तर ज्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाल्याने…

Read More

पोलिस ‘मॅन्युअल’ बनले वॉशिंग मशीन, खाकीवरचा डाग 1 हजारात स्वच्छ!:लाखाची लाच, खुनाच्या तपासात गंभीर नसलेल्या पोलिसांना नोकरीत ‘कालबाह्य मॅन्युअल’चे सुरक्षा कवच

पोलिस दलातील लाचखोरी, खंडणीखोरांना अभय आणि खुनाच्या प्रकरणात आरोपींना मदत होईल असे कृत्य करण्यासारखे अनेक गंभीर प्रकार पुढे येत आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी पोलिसांचे कृत्य हे गंभीर गुन्ह्यासारखे असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊन कारवाई होणे अपेक्षित असते; परंतु पोलिसांच्या चुकांसाठी करण्यात येणाऱ्या शिक्षेसाठी 1959 च्या ‘पोलिस मॅन्युअल’चा आधार घेतला जातो. या कालबाह्य मॅन्युअलमध्ये अनेक गंभीर…

Read More

करमाळा तालुक्यात जांभळाचा हंगाम जोमात:बाजारात आवक वाढली, हवामान बदलामुळे यंदा मोठी फळधारणा, झाडे फळांनी भरली‎

करमाळा तालुक्यात यंदा जांभूळ झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतशिवार, ओढे-नाले परिसर तसेच गावांच्या हद्दीतील अनेक जुनी जांभूळ झाडे फळांनी लगडली असून जांभूळ हंगाम यंदा विशेष गाजताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांम . कृषी जाणकारांच्या मते, गतवर्षी झालेला चांगला पाऊस, जमिनीत टिकून राहिलेला ओलावा, हवामानातील बदल आणि त्यानंतर वाढलेले तापमान यामुळे…

Read More

सीताराम शुगर समोरील आंदोलन मागे:राजलक्ष्मी गायकवाड यांनी मागण्या मान्य केल्याचे दिले लेखी निवेदन‎

खर्डी येथील सिताराम साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तरुण शेतकऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. सोमवारपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती. कारखान्यामुळे होणारे हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण यांसह विविध समस्यांविरोधात तरुण शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. अखेर आज (गुरुवार) सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन मागे…

Read More

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार:24 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, रखडलेल्या खरीप पेरण्यांना मिळणार वेग

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने १ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही भागांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामानातील या बदलामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण आहे. नद्यांना पूर, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ…

Read More

जिल्ह्यात 30% औषधी दुकानांची 3 ते 6 वर्षांपासून तपासणीच नाही:चुकीच्या मार्गाने माल खरेदीने डुप्लिकेट औषधी येत असल्याची चर्चा‎

नागरिकांना खात्रीची व किफायतशीर दरात औषधे मिळावी, यासाठी औषधाच्या दुकानांची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी व ऑडिट करणे गरजेचे आहे. परंतु मनुष्यबळाची कमतरता आणि इतर तांत्रिक कारणांमुळे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार औषधी दुकान . यामुळे या काही मेडिकल्समधून विक्री होणारी औषधे, त्यांची गुणवत्ता आणि दराबाबत रुग्णांच्या मनात साशंकता निर्माण होत आहे. तसेच…

Read More

वरुणराजा बरसला:दोन दिवसांतच 25 हजार हेक्टरवर विक्रमी पेरणी; कपाशीलाच पसंती

अमरावती यंदा मान्सून सुमारे पंधरा दिवस उशिराने दाखल झाला असला, तरी जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच दमदार आणि सार्वत्रिक पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळेच मागील दोन दिवसांत जिल्ह्यात विक्रमी २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. पेरण्यांना उशीर झाल्याने यंदा अधिकाधिक शेतकरी कपाशीला…

Read More

आषाढी तयारी:मागील वारीत वॉटरप्रूफ मंडपाला गळती; तरीही, मक्तेदारावर मेहरबानी का?- ढाणे

गेल्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेले काही वॉटरप्रूफ मंडप गळत होते, अरणमध्ये हाच वॉटरप्रूफ मंडप कोसळून ग्रामपंचायत कर्मचारी जखमी झाला. कुर्डुमध्येही तीच निकृष्ट कथा घडली…मग असं असतानाही यंदाही ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची कामे देण्यासाठी पायघड्या का अंथरल्या जात आहेत? संबंधित ठेकेदारासोबत साटंलोटं आहे का? असा ’बॉम्ब’ कुर्डुचे जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी ऐन जिल्हा परिषदेच्या…

Read More