वरुणराजा बरसला:दोन दिवसांतच 25 हजार हेक्टरवर विक्रमी पेरणी; कपाशीलाच पसंती
अमरावती यंदा मान्सून सुमारे पंधरा दिवस उशिराने दाखल झाला असला, तरी जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच दमदार आणि सार्वत्रिक पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळेच मागील दोन दिवसांत जिल्ह्यात विक्रमी २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. पेरण्यांना उशीर झाल्याने यंदा अधिकाधिक शेतकरी कपाशीला…