Headlines

कर्जमाफीची घोषणा झाली, आता अंमलबजावणी करा:रोहित पवारांचा सरकारला इशारा, शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करण्याची मागणी

“राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील दोन अत्यंत जाचक अटी हटवण्यास सरकारला भाग पाडले, हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. मात्र, केवळ घोषणा करून चालणार नाही, तर या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे. कर्जमाफीची संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक…

Read More

अयोध्या मंदिरावर टीका करणाऱ्यांनी रामरक्षा म्हणणं हा मोठा विनोद!:उद्धव ठाकरेंवर शिंदेंची बोचरी टीका, कर्जमाफीवर शरद पवारांनाही कौतुक असल्याचा दावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकरी कर्जमाफी, उद्धव ठाकरे, शरद पवार, शिवसेना संघटनबांधणी आणि विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केले. शेतकरी कर्जमाफीतील अटी हटवण्याचा निर्णय हा लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित ‘रामरक्षा’ पठणावर त्यांनी जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे…

Read More

2029 Election Under Fadnavis Leadership; Rauts President System Rumors False

भारतामध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू होणार असल्याच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. भारताच्या संविधानात असा कोणताही बदल होणार नसून पंतप्रधान पद हेच देशातील सर्वोच्च लोकशाही पद आहे.नरेंद्र मोदी यांना देशाच्या जनतेने सलग 3 . नवनाथ बन म्हणाले की, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक केल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानताना…

Read More

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी

“भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत,” असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार, २०२९ च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक…

Read More

संघर्षाचा पहिला मोठा विजय:कर्जमाफीच्या दोन जाचक अटी हटल्या, शेतकऱ्यांचा लढा अद्याप सुरूच राहणार – रविकांत तुपकर

कर्जमाफीच्या निकषांमधील दोन महत्त्वाच्या जाचक अटी हटवण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा पहिला मोठा विजय असल्याचा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, बैठक संपताच विधानसभेत त्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे तुपकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा…

Read More

मोशी डेपो दुर्घटनाग्रस्त इमारतीला केवळ तळमजल्याचा पूर्णत्वाचा दाखला:वरच्या दोन मजल्यांना परवानगीच नाही; गंभीर प्रश्न उपस्थित

मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या तीन मजली इमारतीत दुर्घटना घडली, त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला आणि आठ कामगार 65 तास अडकले होते. या इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच महापालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला देण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने 27 जुलै 2023 रोजी या ‘ॲडमिन बिल्डिंग’ला…

Read More

हिंगोलीत शालेय पोषण आहाराचा बोजवारा:शाळांमध्ये किडलेले वाटाणे अन् सडक्या डाळी, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

हिंगोली जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचे धान्य निकृष्ठ असल्याने 1038 शाळांमधून 1.15 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. किडलेले वाटाणे, तांदूळात किडे अन आळ्या, डाळी खराब झालेल्या त्यामुळे हा पोषण आहार आहे का कुपोषण आहार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र शाळेची नांवे सांगा आम्ही तपासणी करतो…

Read More

आ. सावरकरांच्या पाठपुराव्याला यश:शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, महात्मा फुले योजनेतील 50 हजारांची जाचक अट रद्दची केली होती मागणी‎

अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कळीचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्याने, अकोला जिल्ह्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सावरकर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची मर्यादा ५० हजार रुपयांवरून दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तब्बल ६३ लाख शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा…

Read More

उत्पन्न वाढ अन् विकास; आयुक्तांचा निर्धार:आयुक्त डाॅ. मंगेश गोंदावले यांची मुलाखतीदरम्यान ग्वाही‎

शहरातील एकूणच समस्यांची मला सखोल माहिती घ्यावी लागणार असून सद्यस्थितीत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेत. तसेच आवश्यक उपाययोजना करीत शहरवासीयांचे जीवनमान उंचावण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे महानगर पालिकेचे नव्याने नियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिव्य मराठीला मुलाखतीदरम्यान सांगितले. २०१५ च्या आयएएस तुकडीचे ते कार्यक्षम अधिकारी असून याआधी त्यांना विविध विभागात काम करण्याचा दांडगा अनुभव…

Read More

पंढरपूर-फलटण प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सहा महिन्यात नव्याने सर्व्हेक्षण होणार:शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खासदार धैर्यशील मोहिते- पाटलांनी घेतली संयुक्त बैठक‎

पंढरपूर – फलटण या १०६ किलोमीटरच्या प्रलंबित रेल्वे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या पिंक बुक मध्ये झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नव्याने सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. ब्रिटिश कालीन सर्वेक्षणानंतर जमिनी अधिग्रहित झाल्या असल्या तरी नव्याने अ . या बैठकीसाठी पुणे रेल्वे निर्माण विभागाचे उपमुख्य अभियंता मोहित सिंग, वरिष्ठ अनुभाग अभियंता मीनाकुमार यांच्यासह फलटणचे माजी…

Read More