Headlines

पिंपळगाव पेठेत श्री सायंबा महाराजांची यात्रा उत्साहात:‘श्री सायंबा महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून श्रद्धा असलेल्या श्री सायंबा महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रेनिमित्त परिसरातील तसेच तालुक्यातील विविध गावांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढत गेली. ‘श्री सायंबा महाराज की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. श्री सायंबा महाराजांना नवस…

Read More

आत्महत्या:वैजापूर शहरासह खंडाळ्यामध्ये दोघांची गळफास घेत आत्महत्या

शहरातील रामगिरीनगर आणि तालुक्यातील खंडाळा येथे दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आल्या. मूलचंद प्रभुदेवा पारीक (४२, रा. रामगिरीनगर, वैजापूर) आणि मयुरी योगेश बागुल (१६, रा. खंडाळा) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मूलचंद पारीक हे काही दिवसांपूर्वी राजस्थान येथून वैजापूर येथे आले होते. शुक्रवारी त्यांनी राहत्या घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. हा प्रकार…

Read More

चिंचोली लिंबाजीत एकाच कुटुंबातील लहान बहीण-भावाचा संशयास्पद मृत्यू:फॉरेन्सिक, अन्न-औषध प्रशासनाकडून घरातील अन्नाचे नमुने जप्त

तालुक्यातील चिंचोली लिंबाजीत लहान बहीण-भावाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. अवघ्या दोन वर्षांचा लहानगा आयुष नारायण थोटे याचा गुरुवारी उपचारासाठी जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला, तर त्याची सात वर्षांची बहीण गायत्री नारायण थोटे हिची शुक्रवारी सकाळी प्राणज्योत मालवली. एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी नारायण साहेबराव थोटे (३५) आणि…

Read More

थरार:बहिणीशी लग्न लावून देण्यास नकार; दुकानात घुसून भावाचा भोसकून खून, संभाजीनगरातील घटना, आरोपी गेले फुलंब्रीला पळून

लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून हर्सूल परिसरातील ‘लाइफलाइन’ मेडिकल शॉपचे चालक फैसल कादर शेख (२२, रा.उमर कॉलनी) यांची दुकानात घुसून चाकू खुपसून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (११ सप्टेंबर) दुपारी १२.३० ते १२.५७ या दरम्यान हर्सूल येथील पटेल लॉन्सजवळील आयशा मंजिल परिसरात घडली. यात रेहान अमीन पटेल (२५, रा. करीमनगर) व समीर रईस शेख यांना…

Read More

चॅटजीपीटीद्वारे बनवले ‘पीएमओ’चे बनावट ओळखपत्र:रोहन पारेखला 14 दिवस कोठडी, ‘पीएमओ’च्या नियुक्तीचा ईमेल आल्याचा आरोपीचा कांगावा उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान स्वतःला पीएमओचा अधिकारी भासवून वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) व्हीव्हीआयपी सुरक्षेत घुसखोरी करू पाहणाऱ्या रोहन पारेखचा व त्याचा अंगरक्षक दिलीप कुंदे या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडी संपल्याने त्यांना वांद्रे न्यायालयाने शुक्रवारी हजर करण्यात आले होते. दरम्यान, ‘पीएमओकडून नियुक्तीचा ईमेल आल्याने आपलीच फसवणूक झाली,’ असा बचावाचा दावा…

Read More

'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही':अवास्तव मागण्या कशा पूर्ण होणार? मंत्री गिरीश महाजनांचा जरांगेंना सवाल

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच, अंतरवाली सराटी येथे गेल्या 14 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जाहीर शिव्या देऊन या प्रश्नावर कोणताही मार्ग निघणार नाही,…

Read More

छोट्या कर्जदारांनाही 'ओटीएस'ची समान संधी द्या:महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

आर्थिक अडचणींमुळे कर्जाची परतफेड करू न शकणारे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक यांना न्याय्य वन टाईम सेटलमेंट (ओटीएस)ची समान संधी मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ ते १२ या वेळेत झालेल्या आंदोलनात समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते…

Read More

2019 मतदार ठरवणार सातारा जिल्हा बँकेचा सत्तासमीकरणाचा कौल:21 संचालकांसाठी पडद्यामागे मोर्चेबांधणी; सोसायटी मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणुकीतील प्रमुख आकडे स्पष्ट झाले असून, २१ संचालकांच्या निवडीसाठी २ हजार १९ मतदार पात्र ठरले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा २२१ मतदार कमी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघनिहाय संख्येपेक्षा प्रत्येक मतदाराची राजकीय ‘किंमत’ वाढली आहे. विभागीय सहनिबंधकांकडे…

Read More

दिशाहीन नियोजनामुळे पुणे वाहतूक कोंडीच्या संकटात:एफएसआयच्या अतार्किक मंजुऱ्यांमुळे रस्ते, पाणी, पायाभूत सुविधांवर ताण; तज्ज्ञांचा परिसंवादात इशारा

पुणे शहर दिशाहीन शहरी नियोजन, वाढते बांधकाम आणि एफएसआयच्या अमर्याद परवानग्यांमुळे वाहतूक कोंडीसह पाणी, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांच्या मोठ्या संकटाकडे वाटचाल करत आहे. वेळीच योग्य नियोजन केले नाही, तर भविष्यात पुणे राहण्यायोग्य शहर राहणार नाही, असा इशारा वास्तुविशारद, नगररचनाकार आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी दिला. पुणे महानगराचा विकास नगररचना विभागाच्या निर्देशांनुसार, टीपी, डीपी आणि एमआरटीपी…

Read More

प्रॉपर्टीच्या वादातून बेलतरोडीत गोळीबार:एका युवकाला गंभीर दुखापत, 6 आरोपींना काही तासांत अटक

नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटाळ पांजरी येथे प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून एका युवकावर गोळीबार करण्यात आला. गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने काही तासांतच ६ आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता गोटाळ पांजरी येथील श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर ही घटना घडली….

Read More