मोर्शीत वारंवार वीजपुरवठा खंडितची समस्या:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर मोर्चा, लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
मोर्शी शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येविरोधात आज शनिवारी डोंगरयावली, हिवरखेड, दापोरी, घोडदेव आणि सालबर्डी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश घारड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता कार्यालयाबाहेर मोठा…