अयोध्या मंदिरावर टीका करणाऱ्यांनी रामरक्षा म्हणणं हा मोठा विनोद!:उद्धव ठाकरेंवर शिंदेंची बोचरी टीका, कर्जमाफीवर शरद पवारांनाही कौतुक असल्याचा दावा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकरी कर्जमाफी, उद्धव ठाकरे, शरद पवार, शिवसेना संघटनबांधणी आणि विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केले. शेतकरी कर्जमाफीतील अटी हटवण्याचा निर्णय हा लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित ‘रामरक्षा’ पठणावर त्यांनी जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे…