Headlines

भरसभेत दोन मंत्र्यांसमोर शिंदेंच्या आमदाराला रडू कोसळलं!:आमदारकी असूनही कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवू? निधी वाटपावरून महायुतीत भडका

नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधी वाटपातील दुजाभावावर बोलताना विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना चक्क व्यासपीठावरच रडू कोसळले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रघुवंशी यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘आम्ही…

Read More

राज्यात पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा:मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; 15 सप्टेंबरपासून पुन्हा मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता

सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचे संकेत अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. उलट, राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून,…

Read More

मनोज जरांगेंची भाषा घाणेरडी, ते सर्वांनाच शिव्या देत आहेत:मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर छगन भुजबळांचा संताप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील यांची भाषा अत्यंत घाणेरडी असून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांना शिव्या देत असल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी…

Read More

पानकनेरगावात बैलांच्या बाशिंगावर झळकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा:कर्जमाफीसह हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे हातबलता आणि दुसरीकडे पोळासारखा महत्त्वाचा सण या परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैलाच्या बाशिंगांवर विविध मागण्यांचे फलक लावून शासनाला साद घातली आहे. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील आगळावेगळा पोळा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता मांडणारा ठरला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप पिके हातची गेली आहेत. सोयाबीनचे पीक वाळून गेले असून…

Read More

राजापेठमध्ये नागपूर एक्सप्रेस 40 मिनिटे खोळंबली:नियोजनाच्या अभावाचा माॅडेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांना फटका; प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप‎

अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवर गुरुवार १० रोजी सकाळी नियोजन चुकल्यामुळे नागपूर- अमरावती एक्सप्रेस राजापेठ परिसरात ४० मिनिटे थांबवण्यात आली. रेल्वे स्टेशनवर केवळ ५ मिनिटे पोहोचण्यास शिल्लक असताना एवढा वेळ गाडी का थांबवण्यात आली तेही प्रवाशांना कळत नसल् . स.९.५० ऐवजी १०.३९ वाजता स्टेशनवर नागपूर-अमरावती एक्सप्रेसची पोहोचण्याची वेळ स. ९.५० वाजताची आहे. चांदूर रेल्वे स्टेशन स.९.१४…

Read More

अकोटमध्ये भोई, कुंभार समाजाने व्यक्त केली कृतज्ञता:जपली प्राण्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारी परंपरा

अकोट कृषिप्रधान संस्कृतीत शेतकरी बांधवांचा जिवाभावाचा सोबती असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण राज्यभरात पारंपरिक उत्साहात साजरा होतो. मात्र, याच दिवशी वर्षभर अविरत भार वाहणाऱ्या कष्टकरी मुक्या प्राण्यांप्रती म्हणजेच गाढवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक परंपरा अकोट शहरात जपली जाते. फरक फक्त एवढाच की बैलांचा पोळा भरतो, तर गाढवांचा पोळा भरवला जात नाही; तरीही पूजनाचा…

Read More

फुटलेल्या जलवाहिनीमुळे विठ्ठलनगरात एक महिन्यापासून रस्त्यावर पाणीच पाणी:पाण्याची नासाडी; साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला‎

प्रभाग क्रमांक ४ मधील मोठी उमरी परिसरातील विठ्ठलनगर, गल्ली क्रमांक ३ येथे गेल्या महिनाभरापासून नळाची पाइपलाइन फुटलेली असून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचत आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही या समस्येची अद्याप दुरुस्ती झालेली नसल्याने परिसरा . विठ्ठलनगरातील गल्ली क्रमांक ३ मध्ये जलवाहिनी फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहून येत आहे. गेल्या महिनाभरापासून हीच परिस्थिती कायम…

Read More

नीलेश सरवदेंची 1000 कि.मी.ची सायकलिंग मोहीम:75 तासांची वेळ असताना अवघ्या 73 तास 55 मिनिटांत गाठला अंतिम टप्पा‎

व्यवसायातील व्यस्तता सांभाळत प्रबळ इच्छाशक्ती, कठोर सराव आणि अफाट सहनशक्तीच्या बळावर येथील कपडे व्यापारी नीलेश सरवदे यांनी तब्बल एक हजार किलोमीटरची ‘बीआरएम १००० किमी’ सायकलिंग मोहीम अवघ्या ७३ तास ५५ मिनिटांत पूर्ण केली. या मोहिमेसाठी ७५ तासांची निर्धारित वेळ असताना त्यांनी तीन तास आधीच अंतिम टप्पा गाठत बार्शीच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे….

Read More

ग्रामीण मराठी साहित्य संमेलन:शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची पेरणी करणारे दीपस्तंभ- लंके गुरुजी

शिक्षक हे भावी पिढीला मार्ग दाखवणारे आणि विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची पेरणी करणारे दीपस्तंभ आहेत. बदलत्या काळातही शिक्षकांना समाजात सन्मानाचे स्थान असून, त्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन ज्ञानदेव लंके गुरुजी यांनी केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे गुरुवारी आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. स्व. पै. किसनराव…

Read More

साताऱ्यात वकिलावर जीवघेणा हल्ला:कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांच्या मुलावर गंभीर आरोप करत वकिलाची पोलिस अधीक्षकांकडे धाव

सातारा शहरात एका वकिलाला कार्यालयात बोलावून घेतल्यानंतर मारहाण, धमकी, शिवीगाळ आणि लूटमार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सातारा येथील वकील ॲड. शाहिद शहाबुद्दीन इनामदार यांनी 9 सप्टेंबर 2026 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला असून, त्याची प्रत सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही दिली आहे. तक्रारीनुसार, 5 सप्टेंबर 2026 रोजी…

Read More