Headlines

मिटमिटात 5.26 कोटींची बेहिशोबी रोकड जप्त:गुन्हे शाखेच्या छाप्यात साडेसहा हजार काडतुसे, 21 शस्त्रेही सापडली

छत्रपती संभाजीनगर शहरातील मिटमिटा परिसरात गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (१० जुलै) रात्री उशिरा एका घरावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची बेहिशोबी रोकड, साडेसहा हजार जिवंत काडतुसे, २१ विविध प्रकारची घातक हत्यारे, विदेशी दारू आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण ५ कोटी…

Read More

मुंबई मनपाच्या महासभेत महापौर-विरोधक आमनेसामने:ट्रोलिंग, धमक्या, पावसाळी दुर्घटना आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार खडाजंगी

मुंबई महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मरिन ड्राईव्हवरील व्हायरल व्हिडिओवरून झालेल्या ट्रोलिंगला सभागृहातून सडेतोड उत्तर दिले, तर दुसरीकडे माजी महापौर तथा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर, पावसाळ्यातील दुर्घटनांवर आणि वाढत्या कंत्राटांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आक्रमक भूमिका घेतली. ‘मी रीलस्टार की…

Read More

Solapur Farmers Threaten Migration Over MSEDCL Power Crisis

सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी वीज व पाण्याच्या तीव्र टंचाईवरून राज्य सरकारविरोधात थेट आणि आक्रमक पवित्रा घेतला आहे. “भीमा नदीकाठावरील ग्रामस्थांना शेतीसाठी हक्काची वीज आणि पाणी द्या, अन्यथा आम्हाला थेट कर्नाटक राज्य . भीमा नदीकाठच्या गावांमधील वीज संकटाची माहिती देताना शेतकऱ्यांनी प्रशासकीय दुजाभावावर तीव्र बोट ठेवले आहे. ‘एल निनो’च्या संभाव्य संकटाचे कारण पुढे…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आई-वडील गावात पापड विकायचे; मुलाने पुण्यात सुखाचा संसार थाटला, पण मोशीतील दुर्घटनेने सर्व काही संपवले

मोशी येथील कचरा डेपोच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका उच्चशिक्षित तरुण कर्मचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. भावेश मोहन वाणी (वय ३३ वर्षे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. भावेश हे रुपीनगर (निगडी) येथे राहत असून, ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावचे रहिवासी होते. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने वाणी कुटुंबाचा एकमेव…

Read More

लातूर हादरलं!:बोअरची वायर चोरल्याच्या संशयावरून तीन अल्पवयीनांना खांबाला बांधून बेदम मारहाण; संतापजनक VIDEO व्हायरल

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील बोअरवेलची इलेक्ट्रिक वायर चोरी केल्याच्या संशयावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरोळा गावातील एका शेतातील बोअरवेलची…

Read More

Naresh Mhaske Claims Sanjay Raut Accepted Rahul Gandhis Leadership

“उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत यांनी खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. स्वतःची खासदारकी टिकवण्यासाठी राऊत शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सुपारी वाजवत आहेत,” असा खळबळजनक दावा शिव . राऊतांच्या खासदारकीसाठी काँग्रेसची ऑफर? संजय राऊत यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, पण एकनाथ शिंदे पुन्हा…

Read More

कर्जमाफीची घोषणा झाली, आता अंमलबजावणी करा:रोहित पवारांचा सरकारला इशारा, शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करण्याची मागणी

“राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील दोन अत्यंत जाचक अटी हटवण्यास सरकारला भाग पाडले, हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. मात्र, केवळ घोषणा करून चालणार नाही, तर या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे. कर्जमाफीची संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक…

Read More

अयोध्या मंदिरावर टीका करणाऱ्यांनी रामरक्षा म्हणणं हा मोठा विनोद!:उद्धव ठाकरेंवर शिंदेंची बोचरी टीका, कर्जमाफीवर शरद पवारांनाही कौतुक असल्याचा दावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकरी कर्जमाफी, उद्धव ठाकरे, शरद पवार, शिवसेना संघटनबांधणी आणि विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केले. शेतकरी कर्जमाफीतील अटी हटवण्याचा निर्णय हा लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित ‘रामरक्षा’ पठणावर त्यांनी जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे…

Read More

2029 Election Under Fadnavis Leadership; Rauts President System Rumors False

भारतामध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू होणार असल्याच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. भारताच्या संविधानात असा कोणताही बदल होणार नसून पंतप्रधान पद हेच देशातील सर्वोच्च लोकशाही पद आहे.नरेंद्र मोदी यांना देशाच्या जनतेने सलग 3 . नवनाथ बन म्हणाले की, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक केल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानताना…

Read More

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी

“भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत,” असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार, २०२९ च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक…

Read More