Headlines

वैजापूरमध्ये 16 सौर प्रकल्पांमधून 55 मेगावॅट विजेची होतेय निर्मिती:दिवसा वीज मिळत असल्याने शेतीच्या सिंचनाची सोय‎

दुष्काळी पट्टा आणि शेतीसाठी विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्याची आता ऊर्जा क्षेत्रात नवी ओळख निर्माण होत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत तालुक्यात उभारलेल्या १६ सौर ऊर्जा प्रकल्पांमधून ५५ मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता उभी राहिली आहे. विशेष म्हणजे तालुक्याची सरासरी वीज गरज केवळ ४० मेगावॅट इतकी असताना स्थानिक पातळीवर त्यापेक्षा अधिक क्षमतेची निर्मिती होत आहे….

Read More

मुकुंदवाडी चौकातील मुख्य रस्त्यावर भरदिवसा तरुणाची लूट:व्हिडिओ व्हायरल, वर्दळीच्या चौकात घडलेल्या घटनेनंतरही गुन्हा नाही, कायदा-सुव्यवस्थेवर मात्र प्रश्नचिन्ह

शहरातील वर्दळीच्या मुकुंदवाडी चौकात एका तरुणाला भरदिवसा मारहाण करत लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, भररस्त्यात एवढी गंभीर घटना घडूनही पोलिसांत कोणताह . शहरातील मुकुंदवाडी चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. याच चौकात एकाने एका तरुणाला रस्त्याच्या कडेला खाली पाडून मारहाण…

Read More

80 तासांनी मोशीच्या कचरा ढिगाऱ्यामधून 7 मृतदेह बाहेर:एकूण बळींची संख्या 8 वर, मृतांत छत्रपती संभाजीनगरचा तरुण

पुण्याजवळील मोशी येथील कचरा डेपोत तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ८० तासांनंतर टप्प्याटप्याने शनिवारी ढिगाऱ्याखालून आणखी ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणाचाही समावेश आहे. त्यासोबत दुर्घटनेतील एकूण बळींचा आकडा ८ वर पोहोचला. एकाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे आव्हान बचाव दलापुढे आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील मोशी येथे अँटोनी लॉरा रिन्युएबल…

Read More

प्रेमप्रकरणातून वाद:प्रेयसीच्या चुलत्याची कुऱ्हाडीने‎ हत्या; प्रियकरासह चार अटकेत‎, नांदेड शहरातील आसना पूल परिसरात मध्यरात्री खून‎

नांदेड शहर पुन्हा एकदा थरारक हत्याकांडाने हादरले‎आहे. पुतणीच्या प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादाचा‎शेवट थेट खुनात झाला. सांगवीजवळील आसना पूल‎परिसरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत सचिन‎यशवंत काळे (२४, रा. नुरी चौक, नांदेड) या युवकाची‎विनादांड्याच्या कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या‎‎करण्यात आली. या प्रकरणातील‎‎मुख्य आरोपी राजेश दत्ता राजेगोरे‎‎याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना‎‎विमानतळ पोलिस आणि स्थानिक‎‎गुन्हे शाखेच्या पथकाने सहा तासांत‎‎ताब्यात घेतले….

Read More

राज्यातील रस्त्यांच्या दुतर्फा आता देशी वृक्षांची सावली:नुसती झाडे लावणार नाही, तर जगवण्यासाठी प्रणाली उभारणार- मंत्री भोसले

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या वृक्षारोपणात स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत देशी प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धनावर शासन विशेष भर देणार असून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा सहभागही वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवामान बदल, वाढते…

Read More

आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का!:ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र; अतिक्रमित बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांचे नगरसेवक व नगराध्यक्षपद रद्द करण्यात आले आहे. पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी मलगुंडे यांना अपात्र ठरवले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 7 मृतदेह आढळले, मृतांची संख्या 8 वर, एकाचा शोध अद्याप सुरू; 72 तासांपासून शोधकार्य चालू

पुणे, प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनेत आज चौथ्या दिवशी शोधमोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामुळे दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आठवर पोहोचली आहे. अद्याप एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मोशी येथील कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या…

Read More

आशासेविका, गटप्रवर्तकांनी 'काळा दिवस' पाळत निदर्शने केली:शासनाच्या धोरणांचा निषेध; मानधनवाढीची अंमलबजावणी करण्याची मागणी

देशभरातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी शुक्रवारी ‘काळा दिवस’ पाळत शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने केली. अमरावती जिल्ह्यातही ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांबाहेर आशा सेविका व गटप्रवर्तकांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरकर यांच्यामार्फत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना निवेदन पाठवण्यात आले. अमरावती शहरात सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) नेतृत्वाखाली हे आंदोलन…

Read More

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्या:खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट आणि कमी उगवणशक्तीचे बोगस बियाणे विकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आणि तूर बियाणे पुरवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात…

Read More

पंढरीच्या 50 वाऱ्या करणारे नानाजी गायकी यांचे निधन:85 व्या वर्षी वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास, निंभी येथे अंत्यसंस्कार

मोर्शी तालुक्यातील निंभी येथील प्रसिद्ध वारकरी आणि सेवानिवृत्त शिक्षक ह.भ.प. नानाजी गायकी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवारी, ११ जुलै रोजी सकाळी निंभी येथील मोक्षधाममध्ये विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या आयुष्यात पंढरपूरच्या ५० वाऱ्या पूर्ण केल्या होत्या. नानाजी गायकी यांनी आपल्या हयातीत पंढरीच्या वारीचे अर्धशतक पूर्ण केले…

Read More