Headlines

Raigad Scorpio Accident: 24-Hour Delay in Discovery

रायगडच्या आंबेनळी घाटात झालेल्या कार अपघातात एक नवी माहिती समोर आली आहे. सदर कारचा अपघात शनिवारी रात्रीच झाला होता. पण 24 तासांपर्यंत त्याचा कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता. रविवारी सकाळी मृत तरुणांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर रात्री 11 . यासंबंधीच्या माहितीनुसार, कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पोलादपूर महाबळेश्वर घाटात एक स्कॉर्पिओ कार खोल दरीत कोसळून झालेल्या…

Read More

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती:सर्वेक्षण करून त्या आधारावर उपाययोजना आखणार, मंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने “एकल महिला धोरण” तयार करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या , राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने संसाराचा भार सांभाळणाऱ्या…

Read More

परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी येणे अनिवार्य:तपासणीसाठी आरटीओ अधिकारी थेट रस्त्यावर, चालकांशी मराठीतून साधणार संवाद

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या नियमाची आता प्रशासनाकडून अत्यंत कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. “मराठी बोलता आली नाही तर थेट परवाने (लायसन्स) रद्द करणार,” या सरकारच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले होते. त्यानंतर परप्रांतीय चालकांना मराठी शिकण्यासाठी प्रशासनाने काही दिवसांची सवलत दिली होती. मात्र, आता प्रादेशिक…

Read More

'दुनियादारी'चा दिग्दर्शक कसा गेला नैराश्यात?:लॉकडाऊननंतर कार विकली, ऑटोतून फिरला; चित्रपट चालत नसल्याने गेले होते नैराश्यात

दुनियादारीचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्या डोक्यात दोनदा स्वतःला संपवण्याचा विचार आला. पण सिनेसृष्टीतील मित्रांच्या मदतीमुळे ते त्यापासून परावृत्त झाले. हे सर्व कसे घडले हे त्यांनी स्वतःच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. संजय जाधव यांचा दुनियादारी हा चित्रपट खूप गाजला. पण त्यानंतर त्यांना एकही हीट चित्रपट देता आला नाही. लॉकडाऊननंतर त्यांच्या आयुष्यात डाऊनफॉल आला….

Read More

पेट्रोल-डिझेलबाबतची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू:पुरवठ्यावर ताण येईल, अशाप्रकारे कुणीही साठेबाजी करू नये – CM फडणवीस

जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जगातील अनेक देशांनी पेट्रोल-डिझेल आणीबाणी घोषित केली आहे. काही देशांमध्ये तर दोन-दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अशाही बिकट परिस्थितीत आपल्याकडे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भविष्यात इंधन मिळेल की नाही, या भीतीने…

Read More

हिंगोलीत इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन:इंदिरा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी

हिंगोली जिल्हयासह राज्यभरात इंधन पुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी ता. २५ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या समोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हिंगोली येथील इंदिरा गांधी पुतळा…

Read More

कापूस बियाणे लुटीवरील केंद्राचे उत्तर म्हणजे वेळकाढूपणा:शेतकरी नेते विजय जावंधिया यांचा आरोप; तांत्रिक आकडेवारीने वेळ मारून नेल्याचा आरोप

भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाण्यांच्या नावाखाली मोठी आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जाब विचारला होता. मात्र, त्यावर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळालेले उत्तर अत्यंत निराशाजनक, मूळ प्रश्नांना बगल देणारे आणि केवळ वेळकाढूपणाचे आहे, असा घणाघात जावंधिया…

Read More

टीसीएस धर्मांतर प्रकरण:निदा खानच्या पाठीशी 'मायनॉरिटी कमिटी' राहणार उभी; मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर

नाशिकच्या टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि बळजबरीने केलेल्या धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय व सामाजिक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या बाजूने आता ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ मैदानात उतरली आहे. अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी हा बनाव रचल्याचा दावा माजी आदार आसिफ शेख यांनी केला आहे. दुसरीकडे, आश्रय दिल्याचा…

Read More

पंतप्रधान-राष्ट्रपती पदापेक्षा जनतेचं प्रेम मोठं; नितीन गडकरींचं मोठं विधान:झेड प्लस सुरक्षेवर मिश्कील टिप्पणी; नागपुरातील भाषण चर्चेत

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाबाबत मोठं विधान केलं आहे. जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद हीच आयुष्यातील खरी संपत्ती आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होण्याची गरज काय? लोकांचं प्रेम हेच सर्वात मोठं पद आहे, असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. नागपुरातील राष्ट्रभाषा परिवारातर्फे आयोजित मित्रों के बीच,…

Read More

११ केव्हीच्या खांबावर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्याने मृत्यू:बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने बंद पडलेली लाईन सुरू करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी | चांदूर रेल्वे शेतातील मंदिराच्या बांधकामासाठी पाणी सुरू व्हावे, या उद्देशाने वीज पुरवठा दुरुस्त करण्यासाठी ११ केव्हीच्या खांबावर चढलेल्या २४ वर्षीय युवकाचा करंट लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सावंगी संगम परिसरात घडली. मृत युवकाचे नाव अंकुश श्रावणजी नेवारे असे आहे. अंकुश हा डीजे व्यवसायासोबतच विद्युत संबंधित छोटी-मोठी कामे करीत होता. त्याच्या कुटुंबाची हडपा शिवारात…

Read More