Headlines

महायुतीची विधान परिषद ‘रणनीती’:नाशिक, संभाजीनगरसाठी शिवसेना, तर पुण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा; भाजप 2020 च्या तुलनेत मित्रपक्षांच्या 3 जागा खेचण्याच्या प्रयत्नात

१८ जून रोजी १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप २०२० च्या तुलनेत मित्रपक्ष शिवसेना (शिंदेसेना) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन जागा खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कदाचित जागांची . माध्यम प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही एकत्रित बसून यातून मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला…

Read More

पेसा शिक्षकांची जि.प.वर धडक, कायम नियुक्तीची मागणी:आमदार तायडे यांचा मुद्दा, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा

अमरावती: मेळघाटात ‘पेसा’ अंतर्गत सेवा दिलेल्या शिक्षकांना आगामी सत्रासाठी रुजू करून न घेता, त्या जागांसाठी नव्याने प्रक्रिया राबवली जात आहे. याविरोधात जुन्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, त्यांनाच पुनर्नियुक्ती मिळावी या मागणीसाठी २५ मे रोजी त्यांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. या शिक्षकांनी गेल्या काही वर्षांपासून मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सेवा दिली आहे. त्यांना…

Read More

शेंदुरजनाघाटमध्ये अधिक मासानिमित्त 'श्री दत्त दिंडी'चा गजर:तीन वर्षांनी आलेल्या ज्येष्ठ अधिकमासात भक्तीमय वातावरण

शेंदुरजनाघाट शहरात तीन वर्षांनी आलेल्या ज्येष्ठ अधिक मासानिमित्त ‘श्री दत्त दिंडी’चा गजर सुरू झाला आहे. १७ मे रोजी सुरू झालेली ही दिंडी १५ जूनपर्यंत महिनाभर चालणार असून, पहाटेच्या भक्तीमय वातावरणाने संपूर्ण नगरी दुमदुमून गेली आहे. हिंदू पंचांगानुसार, दर तीन वर्षांनी ज्येष्ठ अधिकमास येतो, ज्यामुळे यावर्षी हिंदू नववर्ष १३ महिन्यांचे झाले आहे. या काळात लग्नकार्यासारखी सर्व…

Read More

मोझरीचे जनार्धन बोथे यांना 'पद्मश्री' पुरस्कार:राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे माजी सचिव सन्मानित

अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील ज्येष्ठ समाजसेवक जनार्धन बापूराव बोथे (बोथे गुरुजी) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माजी खाजगी सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली आहे. या सन्मानामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या पुरस्कारामुळे केवळ जिल्ह्याचाच नव्हे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आणि ‘ग्रामगीते’चा राष्ट्रीय स्तरावर गौरव…

Read More

विधान परिषद निवडणूक सुरू, पहिल्या दिवशी १६ नामांकनांची उचल:पोटे, देशमुख, जगताप यांच्या नावांचा समावेश

अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवार, २५ मे पासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला तरी, विविध पक्षांतर्फे एकूण १६ अर्जांची उचल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे…

Read More

नरभक्षक वाघीण जेरबंद, ब्रह्मपुरी वनविभागाला यश:चार बछड्यांना पकडण्यासाठी 'मिशन' सुरू, पीडित कुटुंबांना आर्थिक मदत

ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत गुंजेवाही परिसरात चार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नरभक्षक वाघिणीला अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. या वाघिणीच्या चार बछड्यांचा शोध अजूनही सुरू असून, त्यांना सुरक्षितपणे पकडण्यासाठी वनक्षेत्रात मचाणे उभारून जिवंत भक्ष्य (बेट) लावण्यात आले आहे. बछड्यांना पकडण्याची रीतसर परवानगी मिळाली आहे. बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ डॉ. रविकांत खोब्रागडे आणि नेमबाज अजय मराठे…

Read More

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:अभिनेत्री नीलम शिर्के यांची अखेर माघार; राजकीय शिरकावाच्या चर्चांना पूर्णविराम

तब्बल 10 वर्षांनंतर पार पडत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सध्या मोठा ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा पाहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांनंतर आता नीलम शिर्के यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत…

Read More

दीपक कुमठेकर महावितरणच्या मुख्य अभियंतापदी रुजू:छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचा पदभार स्वीकारला; पवनकुमार कछोट यांची बदली

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी दीपक कुमठेकर यांनी सोमवारी (२५ मे) पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नाशिक येथील महावितरणच्या नेटवर्क प्लॅनिंग सेलचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. श्री. कुमठेकर हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी विपणन…

Read More

पुण्यात ‘ऑरेंज इकॉनॉमी’ एक्स्पोचे आयोजन:भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भवितव्य उलगडणार, 30 व 31 मे रोजी

पुण्यात ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० आणि ३१ मे रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे हा एक्स्पो पार पडणार असून, यातून भारताच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’चे (सर्जनशील अर्थव्यवस्था) भवितव्य उलगडणार आहे. ‘सृजन कॉलेज ऑफ डिझाईन’चे संस्थापक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत पारंपरिक उद्योगांच्या जोडीला सर्जनशीलता आणि डिजिटल…

Read More

आमदार इद्रीस नायकवाडींनी राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या:म्हणाले- अजितदादांनी विधानसभेच्या तयारीला लागायला सांगितले होते

राज्यपालनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रीस नायकवाडी यांच्या राजीनाम्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून, पक्षानेच त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, नायकवाडी यांनी या चर्चा फेटाळून लावत, पक्षाकडून किंवा कोणत्याही नेत्याकडून आपल्याला राजीनाम्याबाबत सांगण्यात आले नसल्याचे आणि उद्या होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत आपण यावर चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना…

Read More