Headlines

पाचोडच्या रुग्णालयात फायर सेफ्टीचा बोजवारा:दोन वर्षांपासून ऑडिटच नाही, पाण्याचे मुख्य कनेक्शन तुटलेल्या अवस्थेत, प्रशासनाचे दुर्लक्ष‎

पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत आग आटोक्यात ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या चक्क रिकाम्या असून, या टाक्यांना जोडलेले पाण्याचे मुख्य कनेक्शनही तुटलेल्या अवस्थेत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले आहे. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे या रुग्णालयाचे मागील दोन वर्षांपासून फायर ऑडिट झालेच नसल्याचे उघड झाले आहे….

Read More

जांबरगाव शिवारात बनावट डांबर निर्मिती:पत्र्याच्या शेडमध्ये थाटला कारखाना, अंधाराचा फायदा घेत संशयित पसार‎

समृद्धी महामार्गालगत पत्र्याच्या शेडआड सुरू असलेल्या बनावट डांबर तयार करण्याच्या कारखान्यावर वैजापूर पोलिसांनी धडक देत रॅकेटची पाळेमुळे उघड करण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी याच अड्ड्याची पोलखोल होऊन कारवाई झाली होती; मात्र त्यानंतरही येथे पुन्हा संशयित व्यवहार सुरू असल्याचा आरोप आहे. आता त्याच ठिकाणी पोलिसांना ८ ते ९ टन लोखंडी गजांचा साठा आणि विविध केमिकलने…

Read More

वेरूळ येथे 300 कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता:चार तास चालले महास्वच्छता अभियान, विविध शासकीय विभागांनी नोंदवला सहभाग‎

ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर आणि परिसर स्वच्छ, सुंदर व प्रसन्न ठेवण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छ मंदिर परिसर – सुंदर वेरूळ, आरोग्य संपन्न वेरूळ’ हा संदेश देत ३०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चार तासांचे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत शिक्षण विभागाने वेरूळ लेणी परिसर, तर महसूल विभागाने घृष्णेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता केली. तसेच इतर शासकीय…

Read More

दिशा सालियन मृत्यू:मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, बापाने तरुण मुलगी गमावलीय, आम्हाला राजकारणाशी देणंघेणं नाही

१४ जून रोजी २०२० रोजी आत्महत्या करणारा प्रख्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूतची तत्कालिन व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांनी लैंगिक अत्याचार आणि हत्येचा संशय व्यक्त केलेला असताना पोलिसांनी थेट एफआयआर नोंदवून तपास का केला नाही? केवळ सीआरपीसी १७४ (अपघाती मृत्यू ) अंतर्गत मर्यादित चौकशी करत…

Read More

जळगाव जिल्ह्यात दोन हृदयद्रावक घटनांत 6 मृत्यू:एकाची पत्नी, 2 मुलांसह आत्महत्या; दुसऱ्याने मुलासाठी प्राण गमावला

अमळनेर तालुक्यात गुरुवारी घडलेल्या दोन गावांतील वेगळ्या घटनांनी पित्याच्या नात्याचे दोन टोकाचे पैलू समोर आणले आहेत. एका घटनेत बापाने नैराश्यातून पत्नी आणि दोन मुलांसह रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवले. तर दुसऱ्या घटनेत, पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी बापाने स्वतःचा जीव धोक्यात घातला, मात्र दुर्दैवाने त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे अमळनेर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त…

Read More

अमरावती जिल्ह्यातील 550 ग्रामपंचायत प्रशासकांचा कार्यकाळ संपला:पुढील प्रशासकीय व्यवस्थेसाठी सीईओंचे शासनाकडे मार्गदर्शन

अमरावती जिल्ह्यातील सुमारे ५५० ग्रामपंचायतींच्या प्रशासकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप वेळ असल्याने, पुढील प्रशासकीय व्यवस्थेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही, त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार कोण पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील या साडेपाचशे ग्रामपंचायतींचा कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वीच…

Read More

नेपाळमध्ये अडकलेले अमरावतीचे 4 तरुण सुखरूप:दोन दिवसांनी संपर्क, प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन

नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये अमरावती येथील निवासी श्याम मारोडकर आणि त्याच्या चार मित्रांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. श्यामचे काका गौरव मारोडकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षात पोहोचून हे सर्वजण सुखरूप असल्याची पुष्टी केली. गौरव मारोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम आणि त्याचे इतर तीन मित्र नेपाळमध्ये फिरायला गेले होते. प्रवासात त्यांना आणखी काही महाराष्ट्रीयन…

Read More

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाला मोठी चालना:193 कोटींच्या आराखड्याला मंजुरी, भक्तनिवासासह प्रतीक्षा कक्ष-म्युझियम उभारणार

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औढा नागनाथ येथे १९३ कोटी रुपयांच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याला गुरुवारी ता. २७ शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील काळात भक्तनिवास, प्रतीक्षा कक्ष, म्युझियमसह हरिहर तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. नवीन आराखड्यानुसार भक्तांना दर्शनासाठी कमी वेळ लागेल याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात:डिव्हायडरला धडकून खड्ड्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर वाकसई गावाच्या हद्दीत एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक जखमी झाला आहे. हा अपघात २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४.१२ वाजण्यापूर्वी सूरज ढाब्यासमोर घडला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत गौतम बरवा (रा. मोशी,…

Read More

सीओईपी वसतिगृह प्रकरणी 100 ते 150 जणांवर गुन्हा:पत्रकार मंदार गोंजारी यांचे नाव समाविष्ट, पत्रकार संघाचा आक्षेप

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात विनापरवानगी प्रवेश करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एनएसयूआय आणि काँग्रेसच्या सुमारे १०० ते १५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये ‘एबीपी माझा’चे पत्रकार मंदार गोंजारी यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने पुणे श्रमिक पत्रकार संघाने तीव्र आक्षेप घेतला आहे. सीओईपीच्या वसतिगृह विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजू तुकारामजी पाचकोर…

Read More