Headlines

हिंगोलीत इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन:इंदिरा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी

हिंगोली जिल्हयासह राज्यभरात इंधन पुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी ता. २५ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या समोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हिंगोली येथील इंदिरा गांधी पुतळा…

Read More

कापूस बियाणे लुटीवरील केंद्राचे उत्तर म्हणजे वेळकाढूपणा:शेतकरी नेते विजय जावंधिया यांचा आरोप; तांत्रिक आकडेवारीने वेळ मारून नेल्याचा आरोप

भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाण्यांच्या नावाखाली मोठी आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जाब विचारला होता. मात्र, त्यावर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळालेले उत्तर अत्यंत निराशाजनक, मूळ प्रश्नांना बगल देणारे आणि केवळ वेळकाढूपणाचे आहे, असा घणाघात जावंधिया…

Read More

टीसीएस धर्मांतर प्रकरण:निदा खानच्या पाठीशी 'मायनॉरिटी कमिटी' राहणार उभी; मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर

नाशिकच्या टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि बळजबरीने केलेल्या धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय व सामाजिक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या बाजूने आता ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ मैदानात उतरली आहे. अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी हा बनाव रचल्याचा दावा माजी आदार आसिफ शेख यांनी केला आहे. दुसरीकडे, आश्रय दिल्याचा…

Read More

पंतप्रधान-राष्ट्रपती पदापेक्षा जनतेचं प्रेम मोठं; नितीन गडकरींचं मोठं विधान:झेड प्लस सुरक्षेवर मिश्कील टिप्पणी; नागपुरातील भाषण चर्चेत

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाबाबत मोठं विधान केलं आहे. जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद हीच आयुष्यातील खरी संपत्ती आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होण्याची गरज काय? लोकांचं प्रेम हेच सर्वात मोठं पद आहे, असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. नागपुरातील राष्ट्रभाषा परिवारातर्फे आयोजित मित्रों के बीच,…

Read More

११ केव्हीच्या खांबावर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्याने मृत्यू:बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने बंद पडलेली लाईन सुरू करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी | चांदूर रेल्वे शेतातील मंदिराच्या बांधकामासाठी पाणी सुरू व्हावे, या उद्देशाने वीज पुरवठा दुरुस्त करण्यासाठी ११ केव्हीच्या खांबावर चढलेल्या २४ वर्षीय युवकाचा करंट लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सावंगी संगम परिसरात घडली. मृत युवकाचे नाव अंकुश श्रावणजी नेवारे असे आहे. अंकुश हा डीजे व्यवसायासोबतच विद्युत संबंधित छोटी-मोठी कामे करीत होता. त्याच्या कुटुंबाची हडपा शिवारात…

Read More

पाणीटंचाईचे लोण आता मेळघाटच्या पायथ्याशी; अचलपुरातही पाणीटंचाई:चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी‎

प्रतिनिधी | अचलपूर चंद्रभागा धरणावरून पाण्याचा दाब कमी झाल्याने मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा-अचलपुर या जुळ्या शहरातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या टंचाईग्रस्त भागात नगरपालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब सध्या प्रचंड कमी झाला आहे. परिणामी अचलपूर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिनीत कमी…

Read More

ऑटो युनियनतर्फे चांदूरबाजार बसस्थानक परिसरात पाणपोई:आयपीएस अधिकारी सागर भामरे यांची यावेळी उपस्थिती‎

प्रतिनिधी | चांदूरबाजार वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता, बसस्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांना थंडगार पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने चांदूरबाजार ऑटो युनियनच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे रीतसर उद्घाटन आयपीएस अधिकारी सागर भामरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ऑटो युनियनचे अध्यक्ष मुमताजिर उर्फ मोंटू खान यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम…

Read More

मुळा धरणातील बोट नादुरुस्त, तीन गावांचा राहुरीशी संपर्क तुटला:९० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही ५ वर्षांत बोट मिळेना‎

प्रतिनिधी | राहुरी मुळा धरणाच्या जलाशयातून तीन गावांना जोडणारी बारागांव नांदूर धक्का ते जांभळी धक्का दरम्यान चालणारी प्रवासी यांत्रिक बोट नादुरुस्त झाली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी आणि जांभुळबन या तीन गावांमधील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मागील चार दिवसांपूर्वी या यांत्रिक बोटीचा गिअर बॉक्स तुटल्याने ही सेवा…

Read More

श्रीक्षेत्र देवगडात विठ्ठलनामाचा गजर;‎ "कृष्ण जन्मोत्सव'' सोहळा उत्साहात‎:ज्ञानसागर मंडपात हजारो भाविकांची अलोट गर्दी, विविध धार्मिक कार्यक्रम‎

प्रतिनिधी | नेवासे श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा तथा विष्णू याग सोहळ्यात ‘श्रीकृष्ण जन्मोत्सव’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ‘विठ्ठल माझा माझा’ या अजरामर भक्तिगीतामुळे सर्वदूर प्रसिद्ध असलेले राधाकृष्ण महाराज यांच्या अमोघ वाणीतून वाहणाऱ्या भागवत कथेमुळे सध्या देवगड परिसरात भक्तीचा महापूर पाहायला मिळत आहे. देवगड देवस्थानच्या…

Read More

डिझेलअभावी ट्रॅक्टरची चाके थांबली:३५० पंपांवर ‘नो स्टॉक''चे फलक, कॅन घेऊन शेतकऱ्यांचा पंपावर मुक्काम‎

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून इंधन टंचाईचे संकट असून ग्रामीण भागात ऐन खरिपाच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टरची चाके शेतातच थांबली आहेत. रोटाव्हेटर आणि नांगरणीची कामे करण्यासाठी लागणाऱ्या डिझेलसाठी बळीराजा आता शेत सोडून पेट्रोल पंपांवर कॅन घेऊन रांगेत उभा आहे. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव आणि सिल्लोड या तालुक्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. जवळपास ३५० हून अधिक…

Read More