Headlines

राज्यातील रस्त्यांच्या दुतर्फा आता देशी वृक्षांची सावली:नुसती झाडे लावणार नाही, तर जगवण्यासाठी प्रणाली उभारणार- मंत्री भोसले

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या वृक्षारोपणात स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत देशी प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धनावर शासन विशेष भर देणार असून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा सहभागही वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवामान बदल, वाढते…

Read More

आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का!:ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र; अतिक्रमित बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांचे नगरसेवक व नगराध्यक्षपद रद्द करण्यात आले आहे. पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी मलगुंडे यांना अपात्र ठरवले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 7 मृतदेह आढळले, मृतांची संख्या 8 वर, एकाचा शोध अद्याप सुरू; 72 तासांपासून शोधकार्य चालू

पुणे, प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनेत आज चौथ्या दिवशी शोधमोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामुळे दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आठवर पोहोचली आहे. अद्याप एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मोशी येथील कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या…

Read More

आशासेविका, गटप्रवर्तकांनी 'काळा दिवस' पाळत निदर्शने केली:शासनाच्या धोरणांचा निषेध; मानधनवाढीची अंमलबजावणी करण्याची मागणी

देशभरातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी शुक्रवारी ‘काळा दिवस’ पाळत शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने केली. अमरावती जिल्ह्यातही ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांबाहेर आशा सेविका व गटप्रवर्तकांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरकर यांच्यामार्फत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना निवेदन पाठवण्यात आले. अमरावती शहरात सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) नेतृत्वाखाली हे आंदोलन…

Read More

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्या:खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट आणि कमी उगवणशक्तीचे बोगस बियाणे विकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आणि तूर बियाणे पुरवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात…

Read More

पंढरीच्या 50 वाऱ्या करणारे नानाजी गायकी यांचे निधन:85 व्या वर्षी वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास, निंभी येथे अंत्यसंस्कार

मोर्शी तालुक्यातील निंभी येथील प्रसिद्ध वारकरी आणि सेवानिवृत्त शिक्षक ह.भ.प. नानाजी गायकी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवारी, ११ जुलै रोजी सकाळी निंभी येथील मोक्षधाममध्ये विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या आयुष्यात पंढरपूरच्या ५० वाऱ्या पूर्ण केल्या होत्या. नानाजी गायकी यांनी आपल्या हयातीत पंढरीच्या वारीचे अर्धशतक पूर्ण केले…

Read More

डॉ. अरुण मोंढे विश्व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख:अमरावती महानगर शाखेत विशेष नियुक्ती

अमरावती येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अरुण मोंढे यांची विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) अमरावती महानगर शाखेतील विशेष संपर्क विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा श्री क्षेत्र तपोवनेश्वर संस्थान, बोडणा येथे आयोजित विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या जिल्हास्तरीय अभ्यास वर्गात करण्यात आली. या अभ्यास वर्गाला विहिंपचे प्रांत संघटन मंत्री विष्णू देशमुख, जिल्हाध्यक्ष अनिल साहू,…

Read More

ढोरेगाव शाळेत 'दप्तरमुक्त शनिवार' उपक्रम:विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, पोषणमूल्ये व अन्नसुरक्षेचे धडे

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे ‘आनंददायी, दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेतीबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शेतीविषयक ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. अजित सीड कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर मोमीन शफी यांनी यावेळी विशेष मार्गदर्शन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक कृषी, पोषण आणि अन्नसुरक्षेविषयी जागरूकता…

Read More

शिवसेना प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये:फडणवीस-शिंदेंची भेट घेत धाराशिवसाठी मांडल्या मोठ्या मागण्या

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. निंबाळकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र भेट घेऊन धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि जनहिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकरी, सिंचन, पाणी, वीज, उद्योग, रोजगार आणि तुळजाभवानी मंदिरातील भाविकांच्या सुविधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांशी सविस्तर…

Read More

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीर:8 ते 10 हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे शहरात विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टने वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, महाप्रसाद आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, आरोग्य शिबिर, औषध वाटप तसेच चरण…

Read More