Headlines

महामार्गावरील खड्डे बुजवा; संभाजी ब्रिगेड झाले आक्रमक:अभियंत्यांना निवेदन सादर करीत आंदोलनाचा इशारा‎

राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, भेगाही पडल्याने संभाजी ब्रिगेड सोमवारी आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना निवेदन सादर केले. रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग येथील बाळापूरकडे जाणाऱ्या जगदंबा हॉटेल समोरील टी पॉइंटपासून तुषार हॉटेल समोर ते रेल्वे फाट्यापर्यंत सार्वजनिक रोडवर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या मध्य भागावर…

Read More

बाळापूरमध्ये अपघातांचे वाढते प्रमाण:रस्त्यांसाठी 150 कोटी द्या आ. देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 851 अपघात, 334 जणांचा मृत्यू‎

विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांसाठी १५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत आ. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना पत्रही दिले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सन २०१९ ते जून २०२६ या कालावधीत तब्बल ८५१ रस्ते अपघात झाले. या दुर्घटनांमध्ये…

Read More

मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्याची गरज- काझी:‘मुस्लिम बिरादार जमात’ तर्फे गुणवंतांचा सत्कार‎

मुलींची शैक्षणिक प्रगती मुलांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगत व्यसनांपासून मुलांना दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी केले. येथील मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार काझी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेंद्र राऊत,…

Read More

संताप:तक्रारीकडे दुर्लक्ष, पोलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात सोमवारी दुपारी घरासमोरील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून प्रीती गांगुर्डे या तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धोकादायक पोलबाबत मागील वर्षीच तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप करत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

सलग 39 व्या वर्षी भद्रा मारुती पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान:गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवास‎

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती पायी दिंडीने सलग ३९व्या वर्षी भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान केले. गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला. प्रस्थानापूर्वी श्री भद्रा मारुती मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व श्री हनुमानाची पूजा, आरती आणि हरिनाम कीर्तन करण्यात आले. त्यानंतर माजी…

Read More

जामनेरातील अपर तहसील कार्यालय शेंदुर्णीतच व्हावे:सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी निर्धार; नगराध्यक्ष अग्रवाल यांच्याकडून पाठपुराव्याची ग्वाही‎

जामनेर तालुक्यासाठी मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय शेंदुर्णी येथेच व्हावे, या मागणीसाठी शेंदुर्णी येथील नागरिकांनी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. यासंदर्भात आठवड्यातून दोनदा प्रथम नगरपंचायत कार्यालय व त्यानंतर माहेश्वरी मंगल कार्यालयात सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेंदुर्णी येथेच कार्यालय सुरू करण्याची मागणी लावून…

Read More

पायी दिंडीसमोर प्रशासन झुकले:वाकला जि. प. शाळेस तीन शिक्षक तत्काळ देणार, वाकल्याच्या शिक्षक आंदोलनाला यश, जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले आश्वासन‎

वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला, वाकला येथील आठ शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (६ जुलै) अखेर यश मिळाले. शाळेला कुलूप, थाळीनाद आंदोलन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयावर धडक देण्यासाठी निघालेली . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही : ^विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तीन शिक्षक तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, तर उर्वरित…

Read More

पंढरपूरच्या वारीत फाइव्ह-जी वॉकीटॉकी अन् ड्रोनची नजर:वारकऱ्यांची संख्या मोजण्यासाठी एआयची मदत, यात्रेत प्रत्येक हालचालीवर असेल नजर

आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले असून यंदाची वारी अधिक सुरक्षित व तंत्रस्नेही करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. यंदा आषाढी यात्रेत होणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘फाइव्ह-जी व . सोहळ्यासाठी १५ लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात येतात. हाच अंदाज गृहीत धरून यंदाही पोलिसांची तयारी सुरू आहे. वारीमध्ये येणाऱ्या भाविकांची अचूक…

Read More

साताऱ्यात 'रेड अलर्ट':आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश, पर्यटनस्थळे आणि धबधब्यांवर जाण्यास बंदी

भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज व रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीदरम्यान करावयाच्या तात्काळ उपाययोजना व आपत्ती व्यवस्थापना बाबत व्यापक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई व सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, भूस्खलन तसेच संपर्क यंत्रणा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे…

Read More

वसई-विरारमध्ये पावसाचा हाहाकार:हजारो चाकरमानी स्थानकातच अडकले! लोकल ठप्प, वीज गुल; जनजीवन विस्कळीत

वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कामण, भेंडीपाडा आणि मोरी गाव परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून निर्माण झालेल्या पूरस्थितीत अडकलेल्या 15 नागरिकांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूप सुटका केली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी आणखी 50 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका वाहतूक व्यवस्थेलाही बसला असून, पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा पाण्यामुळे…

Read More