लोकसहभागातून शेत पांदण रस्ते, जलपुनर्भरणाची कामे:अमरावती जिल्ह्यात एनजीओंकडून अर्ज आमंत्रित
अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरण योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लोकसहभागातून शेत पांदण रस्ते आणि जलपुनर्भरणाची कामे करण्यासाठी इच्छुक अशासकीय संस्थांकडून (एनजीओ) अर्ज मागवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हे आवाहन केले आहे. या कामांसाठी शेतकरी लोकसहभाग, ग्रामपंचायत स्वनिधी आणि जिल्हा नियोजन समितीचा निधी वापरला जाईल….