Headlines

केळगाव प्रकल्पातून अवैध पाणी उपसा:परिसरात गावांना टंचाईची भीती

सिल्लोड | तालुक्यातील केळगाव प्रकल्पातून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या पाणी उपसा होत असून, याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे. केळगाव प्रकल्पातून अंभई, केळगाव, जांभई, रेलगाव आदी गावांची तहान भागवली जाते. मात्र या प्रकल्पातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावत आहे. संबंधित…

Read More

दरेगावात शेतरस्त्याच्या कामाचे झाले भूमिपूजन:अनेक वर्षांपासून खराब रस्ते, चिखल, वाहतुकीच्या अडचणींचा त्रास

प्रतिनिधी | खुलताबाद शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ता योजनेअंतर्गत दरेगाव येथील बोरीचा मळा ते बेंडखोरा शेतरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. बाजार सावंगी जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षा विकास कापसे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून खराब रस्ते, चिखल, वाहतुकीच्या अडचणींचा त्रास होत…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘डॅमेज कंट्रोल’:खासदार पार्थ पवार – फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट

राष्ट्रवादीमधील संघटनात्मक फेरबदल व नवी पिढी खासदार पार्थ व जय पवारांकडे आर्थिक व प्रशासकीय सूत्रे एकवटल्याने ज्येष्ठ नेत्यांत निर्माण झालेल्या तीव्र नाराजीचा फटका बसू नये यासाठी महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. शनिवारी उशिरा ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री व पार्थ यांच्यात बैठक पार पडली. दरम्यान, या भेटीत काही प्रशासकीय व राजकीय…

Read More

मंदिर देणगीतून शिकतात गरीब मुले; जीवन सुधारले:सिम्बायोसिसला शिकलेले देतात धडे

महामहेश्वर मंदिर… महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या कापडणे गावातील या मंदिरात भजन, कीर्तन व धार्मिक अनुष्ठानांपेक्षा पुस्तकांच्या पानांची सळसळ जास्त ऐकू येते. सिम्बायोसिसमधून उच्च शिक्षण घेतलेल्या एका ‘योगी’ महाराजांच्या मार्गदर्शनात येथे तरुण आपले भविष्य घडवत आहेत. मंदिरातील देणगी, महाराजांना मिळणारी दक्षिणा विद्यार्थ्यांचे शिक्षण, पुस्तकांवर खर्च होते. योगी सिद्धनाथ महाराज आणि या मंदिराची देखभाल करणाऱ्या ‘श्री शेषनाथ संस्थान’चे…

Read More

दिव्य मराठी विशेष:366 आमदारांना मुंबईत मिळणार 1 हजार चौरस फुटांचे आलिशान घर; 42 अन् 29 मजल्यांच्या 2 भव्य टॉवर्सचे काम 2 वर्षांत होणार पूर्ण

विधानसभा व विधान परिषद मिळून एकूण ३६६ आमदारांसाठी उभारण्यात येत असलेल्या ‘मनोरा’ आमदार निवासस्थान पुनर्विकास प्रकल्पाला वेग आला आहे. या प्रकल्पाचे सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले असून, हरित इमारत तत्त्वावर उभारल्या जाणाऱ्या या इमारतीमध्ये प्रत्येक आमदाराला तब्बल १ हजार चौरस फुटांचे आधुनिक घर मिळणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निवासाचे…

Read More

26 ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून ई-रिक्षा:शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही घनकचरा संकलनासाठी धावणार घंटागाड्या

अमरावती जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींना ई-रिक्षा प्रदान करण्यात आले आहेत. या ई-रिक्षांची रचना विशेषतः दिव्यांग व्यक्तींनाही चालवता येईल अशा पद्धतीने करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला गती मिळणार आहे. या वाहनांमुळे घरोघरी कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला वेग…

Read More

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन वर्षांपासून शेतात वीज खांब पडलेले:महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा, अपघाताची भीती

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना गावात शेतकरी प्रशांत शामराव वानखडे यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून वीजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा येत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. वानखडे यांनी यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा त्यांचा…

Read More

परकीय गुंतवणुकीचा ओघ आटला:देशात आर्थिक आणीबाणी सदृश स्थिती, काँग्रेस प्रवक्ते तिवारींची केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांच्या मते, जागतिक युद्धजन्य परिस्थितीसोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे देशात ‘आर्थिक आणीबाणी’ सदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तिवारी यांनी म्हटले की, देशाचे अस्थिर परराष्ट्र धोरण, देशांतर्गत अशांतता, बिघडलेला सामाजिक सलोखा आणि…

Read More

दुभाजकाला धडकून बैतुल येथील दुचाकीस्वार ठार:नातेवाईकांकडून परतताना काळाचा घाला, मोर्शीतील तहसील कार्यालयाजवळील घटना

मोर्शी येथे झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या मोटरसायकलस्वाराची धडक रस्ता दुभाजकाला लागल्याने हा अपघात घडला. बाजीराव कुमरे (वय ३२, राहणार बैतुल) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवार, १७ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव कुमरे हे मोर्शीजवळील दुर्गवाडा येथे…

Read More

अमरावतीत कोबार्क येथे कॅरिकॅचर, एआय कार्यशाळा:कला आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून कलाप्रेमींना मिळाली नवीन कौशल्ये

अमरावती येथील कॉलेज ऑफ ॲनिमेशन बायो इंजीनियरिंग अँड रिसर्च सेंटर (कोबार्क) येथे १६ मे रोजी एक दिवसीय कॅरिकॅचर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला अमरावतीतील कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कला आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधणारी ही कार्यशाळा विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरली. ‘कार्टून आणि कॅरिकॅचर’ या विषयावर आधारित या कार्यशाळेत प्रख्यात कलाकार, ॲनिमेटर आणि…

Read More