Headlines

घाटीत 9 कलमी कार्यक्रम मंजूर:निवासी डॉक्टरांना 8 तासांची ड्युटी, वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) निवासी डॉक्टरांना आता केवळ आठ तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. तसेच, वर्ग ३ कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. रुग्णसेवा आणि प्रशासनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या एका मॅरेथॉन बैठकीत हा ९ कलमी कार्यक्रम मंजूर करण्यात आला. ही बैठक पहिल्यांदाच घाटीबाहेर शासकीय कर्करोग रुग्णालयात पार…

Read More

आषाढी वारीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे चोख नियोजन:वाहतूक मार्गांत मोठे बदल, एसपी संदीप सिंह गिल यांची माहिती

पुणे ग्रामीण पोलिसांनी आषाढी वारी २०२६ साठी चोख नियोजन केले आहे. वारकऱ्यांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि वाहतूक कोंडी टाळणे हा या नियोजनाचा मुख्य उद्देश आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी एका पत्रकार परिषदेत वारीच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. यंदा ८ जुलै २०२६ रोजी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी…

Read More

माथेरानच्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा:दस्तुरी येथील 22 हजार चौ.मी. जागेवर वाहनतळ, भूखंड महसूल विभागाकडून नगरपरिषदेकडे हस्तांतरित

प्रसिद्ध माथेरान गिरीस्थान येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांची वाहनतळाची मोठी समस्या आता कायमची सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माथेरानमधील दस्तुरी येथील २२,३३३.७० चौ.मी. क्षेत्रफळाचा मोठा शासकीय भूखंड वाहनतळासाठी माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने आज ( दि. ३ जुलै ) रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी…

Read More

महात्मा फुले दांपत्याला संयुक्त मरणोत्तर भारतरत्न द्या:अविनाश ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्तपणे मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्याची मागणी केली आहे. आधुनिक समाजक्रांतीचे अग्रदूत असलेल्या महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ही मागणी करण्यात आली. ठाकरे यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन सादर…

Read More

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी न्यायाची मागणी:‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ आणि ‘गुलाबो गँग’ आक्रमक

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात निष्पक्ष न्यायाची मागणी करत आज पुण्यात ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ आणि ‘गुलाबो गँग’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली . या परिषदेत केतन अग्रवालच्या संशयास्पद मृत्यूशी संबंधित अनेक महत्त्वाचे कागदोपत्री पुरावे, आवश्यक माहिती आणि कागदपत्रे माध्यम प्रतिनिधींसमोर जाहीर करण्यात आली. पत्रकार परिषदेला संबोधित करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सत्य दडपण्याचा…

Read More

केस दाखल केली म्हणजे तुम्ही निर्दोष ठरत नाही:महाराष्ट्रातील प्रकरणासाठी दिल्लीत याचिका का? चाकणकरांच्या नोटिशीवर रूपाली ठोंबरेंचा पलटवार

नाशिकच्या वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी दिल्ली हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत विरोधकांना नोटिसा पाठवल्याची घोषणा केल्यानंतर, आता यावर त्यांच्याच पक्षातील नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि सडेतोड पवित्रा घेतला आहे. “कोर्टात केस दाखल केली म्हणजे तुम्ही निर्दोष ठरत नाही, जनतेची दिशाभूल करणे बंद करा,” अशा शब्दांत…

Read More

तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता दूध सम्राटांकडे:'फार्म टू प्लेट' कडक नियमावली लागू, उल्लंघन केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा

राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे सत्र सुरूच असून, हॉटेल, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांनंतर आता त्यांनी आपला मोर्चा राज्यातील ‘दूध सम्राटांकडे’ वळवला आहे. दुग्धजन्य पदार्थांमधील वाढती भेसळ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी मुंढे यांनी राज्यात ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत दूध…

Read More

जळगावात लाचखोर अधिकाऱ्याच्या घरी ACB चा मोठा छापा:कोट्यवधींचे घबाड उघड, तब्बल 2.94 कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त

जळगाव येथे एका अधिकाऱ्याच्या घरावर पडलेल्या मोठ्या छाप्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अकोला येथे कार्यरत असलेल्या व जळगावात वास्तव्यास असलेल्या एका मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरावर नुकतीच धडक कारवाई करण्यात आली. या धाडीमध्ये अधिकाऱ्याच्या घरातून प्रचंड प्रमाणात रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले असून, एखाद्या धनकुबेरालाही लाजवेल अशी बेहिशोबी संपत्ती याठिकाणी सापडली आहे. जळगावमधील…

Read More

नागपुरातून एसटीची दीड कोटींची ई-बस चोरीला!:बसमधील ट्रॅकिंग सिस्टीममुळे लागला शोध, आंतरराज्यीय सराईत चोराला बेड्या

नागपूर बसस्थानकातून एसटी महामंडळाची तब्बल दीड कोटी रुपयांची ‘शिवाई’ ही इलेक्ट्रिक बस चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा तपास करत अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी चोरी गेलेल्या या बससह एका आंतरराज्यीय चोरट्याला शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या या सराईत चोरट्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि तपासादरम्यान त्याने दिलेली धक्कादायक माहिती ऐकून पोलिस…

Read More

पुण्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे 2 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू:पावसाच्या पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात बुडून अंत, अज्ञात ठेकेदारावर गुन्हा

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. घरासमोर खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून सोहम लखन कसबे (वय 2) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू…

Read More