Headlines

विद्यार्थ्यांनी नियोजन अन् ध्येय निश्चित करत गरुडभरारी घ्यावी:महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थी जीवनाचा "टर्निंग पॉइंट'', विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे. अचूक नियोजन केल्यास कोणत्याही शाखेचा विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये. आपली ध्येय निश्चित करून गरुडासारखी उंच भरारी घ्यावी, असे प्रतिपादन बाबासाहेब कावले यांनी केले. कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकरावी प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा…

Read More

पालखी सोहळ्याच्या तोंडावर अकलूजमध्ये पाणी टंचाई:15 जुलैपर्यंत टँकरद्वारे पुरवठा, अल निनोच्या इशाऱ्यामुळे कालव्याचे पाणी बंद, साठवण तलाव कोरडा‎

हवामान खात्याने अल निनो बाबत आगाऊ सूचना देऊन कमी पर्जन्यमानाचा अंदाज दिला, मात्र तोपर्यंत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी झाल्याने पालखी सोहळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून अकलूज शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आता चक्क टँकरने पाणी पुरवठा करण्यास नगर परिषदेने सुरुवात केली आहे. शहरातील जुने बोअर सुरू करण्याच्या हालचाली युद्ध पातळीवर सुरू झाल्या…

Read More

राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग:पुणे-रायगडला 'रेड' तर मुंबईला 'ऑरेंज' अलर्ट; सांताक्रूझमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी

अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत…

Read More

आरोग्य सेवेत कट प्रॅक्टिस-निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही:शासकीय रुग्णालयांवर विश्वास वाढवून संस्थात्मक प्रसूतींना प्राधान्य द्या– मंत्री आबिटकर

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक जबाबदारीने काम करावे. रुग्णांना जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयांकडे वळविणे, कट प्रॅक्टिसला प्रोत्साहन देणे किंवा शासकीय यंत्रणेतील उपलब्ध सुविधांकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, ईएमएस समन्वयक आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट निर्देश…

Read More

स्मार्ट मीटर मोहीम थांबवून जुने मीटर लावा:‘प्रहार’ची विद्युत भवनवर धडक, अभियंता देवहाते यांना विविध मागण्यांसाठी घातले साकडे‎

महावितरण कंपनीकडून घराघरांत बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे कामगार, शेतकरी व सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवे मीटर काढून जुनेच मीटर लावून द्या, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. या मागणीसाठी आज, गुरुवारी महावितरणचे मुख्यालय असलेल्या कॅम्प स्थित विद्युत भवनसमोर प्रचंड निदर्शने करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी अधीक्षक अभियंता दीपक…

Read More

नवीनकुमार पेठे यांना उद्यान पंडित पुरस्कार:राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सपत्निक सन्मान‎

महाराष्ट्र शासनाच्या वतीने फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा मानाचा ‘उद्यान पंडित पुरस्कार २०२४’ मोर्शी येथील प्रगतिशील संत्रा बागायतदार नवीनकुमार अरुणकुमार पेठे यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे बुधवार १ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सपत्निक त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री आशिष…

Read More

उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात रुग्णाचे उपोषण:चुकीचे इंजेक्शन आणि ऑपरेशन केल्याचा आरोप‎

येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप रुग्णाला गंभीर शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या या गलथान कारभाराविरोधात आणि संबंधित दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सागर दत्तात्रय गंगथडे या रुग्णाने गुरुवार, दि. ०२ जुलै पासून उपजिल्हा रुग्णालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते…

Read More

बोल्हेगाव परिसरात पोलिसांचा छापा; सहा दारू अड्डे उद्ध्वस्त

बोल्हेगाव परिसरामध्ये सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. यात साहस दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड यांच्या तक्रारीवरून राम भाऊ खलाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, गावठी दारू नष्ट करण्यात आली. महिला हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, पोलिस कर्मचारी दिनेश मोरे आणि हेमंत…

Read More

दुर्घटना:मुंबईत मॅनहोलमध्ये पडल्याने वृद्धाचा मृत्यू, उघड्या मॅनहोलप्रकरणी मुंबई मनपाच्या 4 अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला गुरुवारी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यातील हा पावसाचा प्रभाव आगामी ७ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. दरम्यान, मुंबईत गुरुवारी सकाळपर्यंत २४ तासांत ९ इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली. साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी बृहन्मुंबई…

Read More

शेतकरी बांधवांनी शेती आधुनिक पद्धतीने करावी- सभापती बोंबले:पुढील वर्षांपासून 10 शेतकऱ्यांचा पंचायत समितीतर्फे गौरव‎

बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, पीक नियोजन, हवामानाशी सुसंगत शेतीपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती वैशाली बोंबले यांनी केले. त्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी उपसभापती संजय लघाने,…

Read More