Headlines

अमरावतीत 58 तक्रारींवर जनसुनावणी पूर्ण:राष्ट्रीय महिला आयोगाचा संवाद, पीडितांना न्याय मिळवून देण्याची दिली हमी‎

राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने गुरुवार ३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनसुनावणी घेण्यात आली. यात ५८ तक्रारी विचारात घेण्यात आल्या. विशेष म्हणजे उपस्थित सर्व तक्रारदारांशी आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्तिशः संवाद साधून त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांना निर्देश दिले. जनसुनावणीच्या वेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक महेश पाटील, पोलिस आयुक्त…

Read More

तरुण पिढीला मोबाइलपासून दूर ठेवत मैदानावर आणावेत:कुलगुरूंनी केले आवाहन, विद्यापीठात उत्कृष्ट खेळाडूंचा केला सत्कार‎

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठासाठी हे वर्ष सुवर्णमयी राहिले असून विद्यापीठाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करून पदके प्राप्त केली आहेत. या यशामध्ये सर्वांचा हातभार असून खेळाडू व क्रीडा शिक्षकांची खरी मेहनत फळाला . संलग्नित महाविद्यालयांतील क्रीडा संचालक तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षक यांच्याकरीता आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याची घोषणा करून कुलगुरू डॉ. मिलींद…

Read More

आलियाबादऐवजी अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागामध्येच ‘जीएमसी’ व्हावे:आमदार संजय खोडके यांची पुन्हा एकदा मागणी‎

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे आलियाबाद येथील प्रस्तावित जागा वन विभागाच्या अखत्यारीतील ‘आयडेंटीफाईड फॉरेस्ट’ क्षेत्रात येत असल्याने कायदेशीर व तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ही जागा बदलून शहराच्या मध्यवर्ती भागातील पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी सभागृहात केली. आमदार खोडके म्हणाले की, जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर…

Read More

माळशिरसमध्ये एक लाखांहून अधिक सीडबॉलची निर्मिती:हरित वारी उपक्रमात 6 शाळांमधील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग‎

प्रतिनिधी | अकलूज पर्यावरण संवर्धनासाठी माळशिरसमध्ये हरित वारी उपक्रमांर्गत जीवन सहारा परिवार, जैन सोशल ग्रुप अकलूज, माळशिरस पोलिस ठाणे आणि से ट्रीज कंपनी व ‘ दिव्य मराठी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाखांहून अधिक सीडबॉलची निर्मिती करण्यात आली. समाजातील विविध घटकांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल…

Read More

अहिल्यादेवींचे विचार आचरणामध्ये आणा:"अहिल्यानगर' नाव सार्थ करा, आ. संग्राम जगतापांच्या उपस्थितीत ''आनंदतीर्थ'' ॲप लाँच‎

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचार, संस्कृती, निष्ठा आणि चारित्र्य येथील प्रत्येक नागरिकाच्या आचरणात दिसू लागले, की ‘अहिल्यानगर’ हे शहराचे नाव खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही, तर स्वैराचार, क्रूरता, आक्रमण आणि धर्माच्या नावाखाली खोटे काम करणाऱ्या प्रवृत्तींना विरोध आहे, असा संदेश उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी महाराज यांनी दिला. राष्ट्रसंत आनंदऋषीजी यांच्या समाधी सान्निध्यात…

Read More

पोलिसांना निवेदन सादर:बिडकीनला सकल मातंग ‎समाजाच्या वतीने मूकमोर्चा, आक्षेपार्ह वक्तव्याचा केला निषेध

बिडकीन सोशल मीडियावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे तसेच मातंग समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सकल मातंग समाज, बिडकीन व चितेगाव सर्कलच्या वतीने शुक्रवारी तीव्र संताप व्यक्त करत मूकमोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनानुसार, मुंबईतील भांडूप (पश्चिम) येथील राजू थाटे नामक व्यक्तीने…

Read More

6शिक्षकांची पदे रिक्त; वाकला येथे जि.प. शाळेस ग्रामस्थांनी ठोकले टाळे:दोन वर्षांपासून ग्रामस्थांचा पाठपुरावा, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष कायम‎

तालुक्यातील वाकला जि. प. प्रशालेत २ वर्षांपासून मुख्याध्यापकांसह ६ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने ग्रामस्थ आणि शालेय समितीने शुक्रवारी शाळेला कुलूप ठोकत आंदोलन सुरू केले. निवेदने, आंदोलने आणि उपोषण करूनही शिक्षण विभागाने दखल न घेतल्याने गावकऱ्यांनी आक . ३१ शाळांत पदे रिक्त तातडीने २ शिक्षक देणार Source link

Read More

मुख्य परीक्षेतील पर्यायी विषयही रद्द:एमपीएससी क गटाच्या 2619 जागांची ऑनलाइन परीक्षा; कंपनीच्या सहभागावर विद्यार्थ्यांचे प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ‘क’ च्या 2,619 जागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेची घोषणा केल्याने लाखो तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र या भरती प्रक्रियेत सप्टेंबर 2026 पासून लागू होणाऱ्या ऑनलाइन (सीबीटी) परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी वादग्रस्त ठरलेल्या खासगी कंपनीकडे सोपवणे, नॉर्मलायझेशन प्रक्रिया राबवणे आणि मुख्य परीक्षेतील पर्यायी विषय रद्द करण्याचा…

Read More

राज्यात 14.8 लाख मोकाट कुत्रे; मुंबईत 3निवारा केंद्रे उभारू- सामंत:लहान मुलांच्या मृत्यूबद्दल आमदारांचा तीव्र संताप, अधिक कारवाईची मागणी

राज्यात सातत्याने वाढणारा मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आणि त्यांच्या हल्ल्यात निष्पाप बालकांना गमवावा लागणारा जीव, या गंभीर मुद्द्यावरून शुक्रवारी विधानसभेत आमदारांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने कडक पावले उचलावीत तसेच श्वान नियंत्रण मोहिमेत प्राणीप्रेमाच्या नावाखाली अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. या संदर्भातील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उद्योगमंत्री…

Read More

नाशिक कुंभमेळ्याच्या रस्ते कामांत हजारो कोटींचा घोटाळा- अनिल परब:दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

नाशिकमधील २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासकामांमध्ये सरकारी नियम धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांची ‘रिंग’ तयार केली असून यात हजारो कोटी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र लुटत आहात, पण किमान देवाला तरी सोडा, असा घणाघाती आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी केला. विधान परिषदेत नियम २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी पुराव्यांसह…

Read More