Headlines

मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश:वीरकर महाराज आश्रमातून ताब्यात; पैशांचा पाऊस पडेल म्हणत फसवणूक

सोलापूर जिल्ह्यात भोंदू बाबांविरोधातील कारवाईचा धडाका सुरू असतानाच आणखी एका स्वयंघोषित महाराजाचा पर्दाफाश झाला आहे. मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाच्या अटकेनंतर आता माढा तालुक्यातील आडेगाव येथील नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणूक, जादूटोणा आणि लोकांची दिशाभूल केल्याच्या आरोपांमुळे वीरकर महाराज अडचणीत आला आहे. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी आश्रमावर छापा…

Read More

अक्कलकोटमध्ये स्वामीनामाचा गजर लिखित नामजप ग्रंथांची निघाली दिंडी:विश्वशांतीसाठी प्रार्थना, राज्यभरातून आलेल्या ग्रंथांचे स्वामी चरणी अर्पण‎

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन ते पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून अक्कलकोट नगरीत ‘ओम श्री स्वामी समर्थ’ नामाचा महाघोष ऐकायला मिळाला. समर्थ नगरी परिवाराच्या वतीने राज्यभर राबवण्यात आलेल्या लिखित नामजप सोहळ्यातील ग्रंथांची बुधवारी भव्य दिंडी मिरव . बुधवारी सायंकाळी ५ वाजता श्री खंडोबा मंदिर येथे या सोहळ्याला प्रारंभ झाला. सुधाकर महाराज इंगळे, सैदप्पा इंगळे, वनिताताई…

Read More

अवकाळी पावसाची हजेरी,‎ तापमानाचा पारा 40 अंशांवर‎:बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात पावसाच्या सरी

मंजू अकोला तालुक्यातील बोरगावमंजू, काटेपूर्णा, वणी रंभापूर, पातूर नंदापूर आदी गाव आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर व मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, दिवसभराच्या कमाल तापमानात घट झाली ७ मे रोजी कमाल तापमान ४०.१ अंश…

Read More

मोहोळच्या विकासाला मुंबईतून ग्रीन सिग्नल:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत सकारात्मक चर्चा; आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश‎

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमदार राजू खरे यांनी मुंबईत जोरदार फिल्डिंग लावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदार खरे यांनी मतदारसंघातील रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचला. या भेटीत उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आमदार खरे यांनी सुचवलेल्या दोन महत्त्वाच्या विकासकामांसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे. यामुळे मतदारसंघातील विकासकामांना…

Read More

मिरजगावात बेशिस्त पार्किंगचा विळखा:पादचाऱ्यांचा जीव टांगणीला‎, नागरी हक्क, सुरक्षिततेचा प्रश्न; कायमस्वरूपी नो-पार्किंग झोन जाहीर करण्याची गरज

मिरजगाव येथे मुख्य रस्त्यावर अशी वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सिमेंट रस्त्यावर वाहने उभी केल्यास तत्काळ दंड आकारला जावा. पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने निर्ढावलेली भूमिका सोडून रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. रस्त्यावरील अतिरिक्त अडथळे दूर करून…

Read More

जिल्हा बँकेवर ” प्रशासक’ राज; “त्या’ बड्या नेत्यांची सद्दी संपली:दिग्गजांच्या एक्झिटमुळे नव्या चेहऱ्यांच्या आशा झाल्या पल्लवित‎

. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाची ‘लाइफलाइन’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेवर अखेर सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. संचालक मंडळाची मुदत संपूनही निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अकोले तालुक्यातील सीताराम गायकर, अमित भांगरे आणि मधुकरराव नवले या ‘त्रिमूर्ती’सह संपूर्ण संचालक मंडळ पदमुक्त झाले आहेत. सहकार विभागाने मार्चअखेर निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजवले…

Read More

सेवानिवृत्त सैनिकाची मिरवणूक:विविध चौकांमध्ये केला सत्कार

सिल्लोड -भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत सेवानिवृत्त झालेले तळणी गावचे सुपुत्र दिलीप चंदन यांचा सत्कार करुन, सजवलेल्या जीपमधून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील तळणी गावातील दिलीप पुंजाराम चंदन हे २००४ मधे केंद्रीय रिझर्व राखील दलात भरती झाले होते. त्यांनी जम्मु कश्मीर, छत्तीसगड, झारखंड, गडचिरोली ( महाराष्ट्र ), नागालँड आदी ठिकाणी २२ वर्ष देशसेवा केली….

Read More

कळवणला 17 ग्रामपंचायतींची जालना जिल्ह्यातील परतूरच्या टीमकडून पाहणी:मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विकासकामांचे स्कॅनिंग‎

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कळवण तालुक्यातील एकूण १७ गावांची परतूर, जि. जालना टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत बिलवाडी येथे तपासणी व पाहणी कामासाठी आलेल्या मान्यवर टीमचे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले . यावेळी उपस्थित जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची पाहणी करून मार्गदर्शन केले….

Read More

वातावरणात बदल:10 दिवसांत पारा 6 अंशांनी घसरला, निफाड @ 37 अंश, एप्रिल महिन्यात 43 अंशापर्यंत गेले हाेते तापमान

एरव्ही थंड तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कडाक्याचे ऊन पडत असल्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेच्या झळा सोसाव्या लागल्या. एप्रिल महिन्यात ४३ अंशांपर्यंत गेलेल्या तपमानाला कुठेतरी आता ब्रेक लागला असून, दहा दिवसानंतर निफाडचे तापमान ३७ अंशांवर येऊन पोहोचले आहे. सहा अंशांनी पारा घसरल्याने नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी तापमानाची नोंद…

Read More

पावसाळा तोंडावर; ‘जलतारा’चे आदेश नाहीत:सिल्लोडमध्ये 3600 शोषखड्ड्यांचे प्रस्ताव रखडले, शेतकऱ्यांत नाराजी‎

तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ उपक्रमाची कामे अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३ हजार ६०० जलतारा खड्डे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आले नसल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यास अवघा महिनाभराचा…

Read More