काश्मिरातील राजौरीत चकमक सुरू:2-3 दहशतवादी लपून बसल्याचा संशय, सुरक्षा दलांनी वेढा घातला
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे शनिवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दोरीमलच्या जंगलात 2-3 पाकिस्तानी दहशतवादी घेरले असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांची जंगलात शोधमोहीम सुरू आहे. याच दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. किश्तवाडमधून दहशतवादी नेटवर्कचा खात्मा याच वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कोअरने किश्तवाडमधून दहशतवादी नेटवर्कचा खात्मा केल्याची घोषणा केली होती….