Headlines

"माझ्याकडून असा अन्याय कधीच होणार नाही":मनोज जरांगे पाटील ठाम, 'राज्यातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत लढत राहणार'

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला आणि समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “राज्यातील एका भागाला आरक्षण आणि दुसऱ्या भागाला नाही, असे माझ्याकडून कधीही होणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत मी…

Read More

मुलगा अन् सावत्र आईचे अनैतिक संबंध; दाेघांनी केली आत्महत्या:दोघांना गत आठवड्यात पोलिसांनी आणले शोधून

सावत्र आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या अनैतिक प्रेमसंबंधांचा शेवट गुरुवारी (२८ मे ) अंबाजोगाई येथे झाला. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन केले. प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. केज तालुक्यातील सोनीजवळा येथील साहेबराव पवार (४०) यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला…

Read More

लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी सटाण्यात उपोषण मागे, साक्री-शिर्डी महामार्गाचे काम 20 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन‎

शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश सोनवणे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर दुसऱ्या दिवशी यश मिळाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत अपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण तातडीने सुरू करण्यात येऊन २० तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. साक्री-शिर्डी महामार्गावरील सुकड नाला ते बसस्थानकापर्यंतचे काम पूर्ण…

Read More

भारत अन् बांगलादेशाला जोडणारा सांस्कृतिक धागा धर्मापेक्षाही बळकट:बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांचे मत‎

भारत आणि बांगलादेश हे दोन स्वतंत्र देश असले तरी हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती हा दोन्ही देशांना जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. हा धागा धर्मापेक्षाही जास्त बळकट आहे. मात्र, सध्या दोन्ही देशात धर्मावर आधारित द्वेष आणि हिंसा वाढू लागल्याने उपखंडातील संस्कृतीचे विघटन होत आहे, असे परखड मत बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांनी व्यक्त केले….

Read More

पाटणा-15 लोकांना घेऊन जाणारी नाव गंगेत बुडाली, 3 मृत्यू:4 बेपत्ता, मरण पावलेल्यांत बाप-लेकही, प्रत्यक्षदर्शी म्हणाले- वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नाव डगमगली

पाटणा जिल्ह्यातील बाढ येथे गंगेत बोट उलटल्याने 3 जणांचा बुडून मृत्यू झाला. तर 4 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. 7 जणांना वाचवण्यात आले आहे. बोटीत सुमारे 15 लोक होते. ज्यात बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश होता. हा अपघात बाढ येथील उमानाथ परिसरात झाला आहे. मृतांची ओळख नीलम कुमारी (30), श्रवण महतो (36) आणि काशी…

Read More

परसवानी कुटुंब 11 दिवसांपासून बेपत्ता:पिंपरी-चिंचवडमध्ये शेवटचे लोकेशन ट्रेस, जी-पेमुळे छडा लागला

नागपूरच्या धंतोली परिसरातून ११ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परसवानी कुटुंबाचा अखेर शोध लागला आहे. तांत्रिक तपासादरम्यान एका ‘जी-पे’ (G-Pay) व्यवहारातून त्यांचे लोकेशन पिंपरी-चिंचवड येथे ट्रेस झाले. यानंतर नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे. धंतोली येथील बलराज मार्गावरील ‘दुर्गा सदन’ इमारतीत राहणारे जितेंद्र परसवानी, त्यांची पत्नी हर्षा, मुलगी इशिता, खुशी आणि मुलगा कृष्णा…

Read More

त्यांना ताकदवर लोक नाही, गुलाम पाहिजे:संजय पाटलांची शिवसेना ठाकरे गटावर टीका; म्हणाले- एका व्यक्तीमुळे प्रॉब्लेम झाला

मला संजय राऊतांचा काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण शिवसेना ठाकरे गटाची काही अडचण नाही. फक्त एका व्यक्तीसोबत प्रॉब्लेम आहे, असे ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे. आता ही व्यक्ती कोण, त्यांचे नाव घेण्यास संजय पाटील यांनी टाळले आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संजय दिना पाटील यांच्या मुलीच्या…

Read More

पावसाळी अधिवेशन:विधीमंडळाच्या कामकाजाला सुरुवात; विधानसभेत पूरस्थितीवरून सरकार-विरोधक आमनेसामने

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तेरावा दिवस आहे. दोन्ही सभागृहांच्या विशेष कामकाजाला सुरुवात झाली आहे. आजच्या 14 व्या दिवशी विधानसभेत ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. आज विधीमंडळात अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जाणार असून, विरोधक विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे, काल विधीमंडळात मुंबईतील…

Read More

विरोधी खासदारांना विकास निधी नाकारल्यास काँग्रेसचा सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा:निधी मिळत नव्हता हे सांगणे म्हणजे सरकारचीच पोलखोल- गोपाळ तिवारी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सत्ताधारी भाजप-महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये विकास निधी अडवून सूडबुद्धीचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. ही वागणूक अशीच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील जनता ‘सविनय कायदेभंग’ आणि ‘असहकार आंदोलन’ पुकारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे. तिवारी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना…

Read More

₹1783 Crore Worldwide; 32 Days Strong

26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘धुरंधर: द रिवेंज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करत आहे. रणवीर सिंह अभिनीत या चित्रपटाने प्रदर्शनाचे 32 दिवस पूर्ण केले आहेत आणि आता त्याने जगभरात 1783 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपट आपल्या पाचव्या आठवड्यातही उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि लवकरच 1800 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ…

Read More