Headlines

भोपाळ-दुर्घटनेचे हे छायाचित्र काढणारे रघु राय यांचे निधन:म्हटले होते- त्या निष्पाप चेहऱ्यातील शांतता कोणत्याही किंकाळीपेक्षा जास्त तीव्र होती

देशातील सर्वात प्रतिष्ठित छायाचित्रकारांपैकी एक असलेले रघु राय यांचे रविवार सकाळी एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. 83 वर्षीय राय कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि 3 मुली असा परिवार आहे. 1966 मध्ये ‘द स्टेट्समन’ मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या राय यांनी सहा दशकांहून अधिक काळ अनेक अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद केले….

Read More

छावा प्रतिष्ठानचा महिला अत्याचारावर आधारित देखावा:महिलांच्या हस्ते जलाभिषेक अन् बुधभूषण ग्रंथाचे पूजन, शिवराज्य सेनेकडून शरीरसौष्ठव स्पर्धा

बार्शी शहर व तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध संघटनांच्या वतीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर शंभूभक्तीत न्हाऊन निघा . छावा प्रतिष्ठानच्या वतीने जयंतीचे औचित्य साधून बार्शी शहरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शासकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील महिलांना सन्मानित करण्यात आले….

Read More

सुनेत्रा पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड:सुप्रिया सुळेंकडून चिंता व्यक्त, म्हणाल्या – असे झाले असेल तर हा चिंताजनक विषय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजीत दिपके यांच्यातील कथित भेट तसेच सुनेत्रा पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान झालेला तांत्रिक बिघाड, या दोन्ही चर्चिलेल्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “सुनेत्रा वहिनींनी प्रवास केलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती जर खरी असेल, तर मला नक्कीच वहिनींची, पार्थची आणि तटकरेंची काळजी वाटते,”…

Read More

शबरीमाला सोने प्रकरण- माजी टीडीबी प्रमुखांविरुद्ध पुरावे मिळाले:केरळम हायकोर्टाने SIT ला नवीन गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिली

केरळममधील शबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणात एसआयटीने दावा केला आहे की, तपासात त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (TDB) चे माजी अध्यक्ष पीएस प्रशांत यांच्या विरोधात महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. एसआयटीने सांगितले की, त्यांच्याकडे अनेक अधिकारी आणि बोर्ड सदस्यांच्या भूमिकेशी संबंधित पुरेसे पुरावे आहेत. तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की, या प्रकरणात गुन्हेगारी फसवणूक, बनावटगिरी आणि कटकारस्थान यांसारखे गंभीर…

Read More

ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, केवळ मुहूर्ताची प्रतीक्षा:केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा मोठा दावा; उद्या मातोश्रीवर तातडीची बैठक

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची आता उघडपणे चर्चा सुरू झाली असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे. “शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडणारे ‘ऑपरेशन टायगर’ आता पूर्णपणे अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन…

Read More

अहमदाबाद विमान अपघाताच्या जागी वसतिगृह बांधले जाणार:G+8 मजली आधुनिक रचना; टाटा एअरलाईन्स ₹53 कोटींची भरपाई देणार

12 जून 2025 रोजी दुपारी 1:38 वाजता अहमदाबादच्या मेघाणीनगर परिसरात असलेल्या ‘अतुल्यम हॉस्टेल’च्या इमारतीवर एअर इंडियाचे विमान कोसळले होते, तेव्हा या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने डॉक्टर आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. असारवा येथील सिव्हिल हॉस्पिटलजवळच्या न्यू मेंटल कॅम्पसमध्ये आता ₹105 कोटींच्या खर्चाने नवीन अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्टेल आणि कॅन्टीन ब्लॉक बांधण्यात येईल. टाटा…

Read More

मेळघाटातील ब्रिटीशकालीन ऐतिहासिक यंत्रांचे संग्रहालय व्हावे:इंटॅकच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना घातले साकडे

मेळघाटात १०० ते १३० वर्षे जुन्या काही मशीन, लोखंडी चाके असा ऐतिहासिक ऐवज काही ठिकाणी पडून दिसतो. या मशीनचा ब्रिटिशांनी रस्ते बांधणी, सागवान लाकूड कापणे व बाहेर काढणे अशा कामासाठी उपयोग केला होता. ही मशीन आज उपयोगात नसल्याने पडून आहेत. मात्र त्यांचा इतिहास जाणून घेतल्यास तो फार रंजक आहे. ही मशीन एकत्र करून त्याचे एक…

Read More

पुण्याच्या धरणांतील पाणीसाठा 24.30 टक्क्यांवर, कपात सुरू:फायर टँकमधील 'डेड स्टॉक' वापरा, जयंत इनामदार यांची मागणी

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा केवळ २४.३० टक्क्यांवर आल्याने शहरात पाणी कपात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील विविध इमारतींमध्ये असलेल्या अग्निशमन टाक्यांमधील (फायर टँक) ‘डेड स्टॉक’ पाणी वापरण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांनी केली आहे. इनामदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, धरणांमध्ये अत्यल्प साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने…

Read More

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी पूर्ण:25 जूनपर्यंत प्रवेश, 27 जूननंतर चौथी फेरी सुरू होणार

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी शनिवार, २० जून रोजी पूर्ण झाली आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे. या फेरीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर २७ जूननंतर चौथ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली जाईल. तिसरी फेरी गुरुवार, १८ जून रोजी सुरू झाली होती आणि २० जूनच्या मध्यरात्रीपर्यंत…

Read More

पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून 15 वर्षाचा मुलगा ठार:एक महिला गंभीर जखमी, उपचारासाठी नांदेडला हलविले

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून एक १५ वर्षाचा मुलगा ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ता. २६ घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी येथील आनंद नागोराव जाधव (१५) व कमलबाई…

Read More