साताऱ्यात विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता:अनेक ठराव मंजूर, पर्यायी सांस्कृतिक राजकारण स्त्रियांच्या खांद्यावरुन येणार – संभाजी भगत
ऐतिहासिक सातारा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जंयती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेलं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वीपणे पार पडलं. या संमेलनाच्या समरोप सत्रात संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत, कॉ. सुबोध मोरे, ॲड. वर्षा देशपांडे, वाहरु सोनवणे, अविनाश कदम आणि कॉ. धनाजी गुरव यांची भाषणे झाली. आपल्याला या संमेलनानंतर काय करायचं आहे…