Headlines

CID ही कुचकामी यंत्रणा, बिनकामाचे ओझे:रोहित पवार यांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना दादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सीआयडी सारखी यंत्रणा कुचकामी व बिनकामाचे ओझे असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी करत असलेला तपास बघता, ही तपास यंत्रणा काय करते नेमके हेच कळत नाही. CID सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे…

Read More

जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र विद्युत विभाग स्थापनेवर लवकरच निर्णय:संघटनेची सरकारसोबत 7 वर्षानंतर झाली बैठक, इतर मागण्यांवरही झाली चर्चा

राज्यातील जिल्हा परिषदेसाठी लवकरच स्वतंत्र विद्युत विभाग स्थापनेवर निर्णय घेण्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी ता. 27 मुंबईत झालेल्या अभियंता संघटनेच्या बैैठकीत दिले आहे. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षाच्या पाठपुराव्यानंतर हि बैठक झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत अभियंत्यांची प्रश्‍न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. रिक्तपदे भरणे, 2005 पुर्वी जाहिरात असलेल्या पण नियुक्ती…

Read More

वर्गात ग्रील कोसळल्याने 6वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू:जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा मान्य केला, मुख्याध्यापकाला निलंबित केले

बिहारमधील बेगुसराय येथे एका सरकारी शाळेत झालेल्या निष्काळजीपणामुळे 12 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जीव गेला. ही 6 मे रोजी बिहारमधील अरवा गावातील जहानपूर माध्यमिक शाळेतील घटना आहे. वर्गात लोखंडी ग्रील्सचा ढिगारा कोसळल्याने सहावीतील विद्यार्थी विवान राज उर्फ मुन्नाचा जागीच मृत्यू झाला. पेन उचलण्यासाठी वाकला, तेव्हा ग्रिल कोसळल्या मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत शाळेच्या व्हरंड्यात बरीच गर्दी होती….

Read More

सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड:चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा दैवी आवाज शांत झाला – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत आपल्या शोकभावना व्यक्त करत या दोन्ही नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या…

Read More

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना लुटणारे पोलिस:खंडणी प्रकरणी खंडाळा पथकातील 5 अंमलदार निलंबित, सखोल चौकशी सुरू

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना अंमली पदार्थांच्या खोट्या संशयाखाली अडवून खंडणी मागणाऱ्या महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या खंडाळा पथकातील दोषी अंमलदारांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून, त्यांची खात्यांतर्गत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना १३ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना ५…

Read More

पर्यावरण संवर्धन दुर्लक्षाविरोधात 20 संस्था तयार करणार दबावगट:पर्यावरण संवर्धनासाठी वज्रमूठ; 20 संस्थांचे 93 प्रतिनिधी आले एकत्र‎

राज्य सरकारने ३०० कोटी वृक्षलागवडीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. परंतु, सध्या उभ्या असलेल्या मोठ्या झाडांकडे वनविभाग, सामाजिक वनीकरण तसेच स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे पेटवून दिली जात आहेत. वृक्षसंवर्धन केवळ कागदाव . पर्यावरण संवर्धनात कसूर केल्यासविचारणार थेट जाब प्रशासकीय संस्थांकडून जर पर्यावरण संवर्धनात कसूर, केला जात असेल तर जिल्हास्तर समिती थेट…

Read More

देशहितासाठी 'कान्स' दौरा रद्द अन् बैठका ऑनलाइन होणार:पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मंत्री आशिष शेलार यांचे तीन निर्णय

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचे सावट आता भारतावरही दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या विभागासाठी तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. मंत्री…

Read More

मोदींच्या आवाहनाला फडणवीसांचा प्रतिसाद:वंदे भारतने केला शिर्डी प्रवास; संदेश देण्याचा प्रयत्न, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे केलेले आवाहन लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डीचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने केला. त्यांच्या या प्रवासाची राज्यभरात चर्चा सुरू झाली असून, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाला प्राधान्य देण्याचा संदेश त्यांनी दिला…

Read More

महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर:बंडखोरी करत अर्ज दाखल करणाऱ्यांनी माघार घ्यावी, रवींद्र चव्हाण यांची विनंती

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, असे असूनही महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि जास्तीत जास्त जागा जिंकू असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण…

Read More