Headlines

पुण्यातील दत्त मंदिरात 25 लाख फुलांची सजावट:संस्थापिका लक्ष्मीबाईंच्या पुण्यस्मरणानिमित्त वासंतिक पुष्पोत्सव

पुण्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सत्तू अमावस्येच्या दिवशी या उत्सवाला सुरुवात झाली. यावर्षी तब्बल २५ लाख विविध सुवासिक फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही मनोहारी फुलांची आरास पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. या पुष्पोत्सवासाठी जाई,…

Read More

नाथसागरातील बेपत्ता दुसऱ्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला:दुर्दैवी घटनेतील मृतांची संख्या दोन

प्रतिनिधी | पैठण पैठण येथील नाथसागर धरणात रविवारी (३१ मे) पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांपैकी बेपत्ता असलेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सोमवारी (१ जून) सकाळी शोध पथकाला आढळून आला. त्यामुळे या दुर्दैवी घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सात मित्र धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. या वेळी पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या संकेत सिद्धार्थ खरात (१८)…

Read More

Don’t play with farmers’ hard work

Marathi News National Don’t Play With Farmers’ Hard Work Shivraj Singh Chouhan, Center Is Strict On Seed Fraud; Crime Against The Company, Ban On Sale Too नवी दिल्ली/भोपाळ/धार1 तासापूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशातील धार अन् खरगोण येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत बियाणे फसवणुकीचे मोठे प्रकरण समोर आले आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे तक्रार केली…

Read More

दिया मिर्झाचा मोदींवर निशाणा:म्हटले- 47 दिवसांनंतर बोलले पण काहीच म्हटले नाही; पीडितांसाठी सहानुभूतीचा एक शब्दही नाही

अभिनेत्री दिया मिर्झाने नीट पेपरफुटीच्या वादग्रस्त प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडील विधानावर आपली निराशा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एक नोट शेअर करत दिया म्हणाली की पंतप्रधानांचे विधान असंवेदनशील होते. तिने प्रश्न विचारला की आठवडाभर उपोषणावर बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी, विरोध करणाऱ्या तरुणांसाठी आणि आपल्या मुलांना गमावलेल्या कुटुंबांसाठी एकही शब्द का बोलला गेला नाही. ही प्रतिक्रिया पंतप्रधान…

Read More

गुरुग्राम मेदांतामधून सोनम वांगचुक यांचा नवीन VIDEO:म्हणाले- आज रुग्णालयातून डिस्चार्ज, राजघाटावर जाऊन गांधीजींना श्रद्धांजली वाहणार

गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल असलेले पर्यावरण कार्यकर्ते आणि आंदोलक सोनम वांगचुक यांनी सोमवारी सकाळी एक नवीन व्हिडिओ जारी केला. व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक म्हणाले- मला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. थोड्याच वेळात महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटला जाईन. वांगचुक पुढे म्हणाले- सर्व कामे पूर्ण करून आता मी पुन्हा पर्वतांवर परत येईन. तुम्हा सर्वांचे आभार आणि मेदांता…

Read More

वसमतमध्ये बोगस 'गावठाण' प्रमाणपत्राद्वारे भूखंडाची विक्री:दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

वसमत शहरातील सर्वेनंबर १८० मध्ये गावठाणचे बनावट प्रमाणपत्र जोडून भुखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २५ फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या भागातील खरेदी विक्रीत मोठा गोंधळ उघडकीस येणार असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील सर्वेनंबर १८० मध्ये पालिकेच्या मालकिची जागा आहे. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून…

Read More

रोहित पवारांनी संजय राऊतांना गुरू करू नये:जास्त झुरळ-झुरळ करू नये, त्यांचाच पक्ष झुरळांनी पोखरलाय- नवनाथ बन

रोहित पवार यांनी संजय राऊत यांच्या मार्गावर जाऊ नये. जसे संजय राऊत रोज उठून खोटे बोलतात ती सवय रोहित पवारांनी लागली आहे. राऊतांना गुरू करण्याचे काम रोहित पवारांनी केले आहे, मेलोडी चॉकलेट आणि झुरळ काय हे जनतेला माहिती आहे. झुरळांना कसे चिरडायचे हे देशातील माता-भगिणींना माहिती आहे, रोहित पवारांनी जास्त झुरळ झुरळ करू नये, त्यांचा…

Read More

परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इंधन वाचवा:मोदींवर जितकी टीका कराल, तितकेच खड्ड्यात जाल, देशहिताच्या निर्णयावर टीका करणे काँग्रेसची सवय- शिंदे

सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाड्या गरजेच्या आहेत त्या आमच्या ताफ्यात आहेत. बाकी गाड्या आम्ही कमी केल्या आहेत. इंधंन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केले आहे, त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. आपल्यासाठी देश सर्वांत पहिले असला पाहिजे, असे शिंदेंनी म्हटले आहे. परिस्थिती पूर्ववत होत नाही तो पर्यंत आपण इंधंन बचत…

Read More

काहीजण कष्ट न करताच पुढे जातात:नमस्कार फक्त ताकदीला अन् चमत्काराला होतो, छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य

राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या अत्यंत सूचक आणि धारदार वक्तव्ये करत असून, त्यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. “गेल्या २६ वर्षांत काहीजण मेहनतीने पुढे आले, तर काहीजण कष्ट न करताच थेट पुढे निघून गेले,” असा टोला लगावत भुजबळांनी पक्षातल्याच काही नेत्यांवर निशाणा…

Read More

आधारकार्ड गैरवापराची भीती दाखवत १४ लाखांचा गंडा:मुंबई गुन्हे शाखेच्या नावाने सायबर चोरट्यांनी केली फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांनी आधारकार्डच्या गैरवापराची भीती दाखवून एका संगणक अभियंता महिलेची १४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करत चोरट्यांनी हा गंडा घातला. नवी पेठेत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी महिलेला सांगितले की, तिच्या आधारकार्डचा गैरवापर करून मुंबईतील हॉटेलमध्ये खोल्या आरक्षित केल्या आहेत आणि या प्रकरणात…

Read More