Headlines

मान्सूनचा ‘पॅटर्न’:5 वर्षांत जूनमध्ये कधी 7 तर कधी 22 दिवस पावसाने जलसंकट, कमी दिवसांत जास्त पावसाने पिकांचे नुकसान

महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न गेल्या पाच वर्षांत (2021 ते 2025) बदलत आहे. 5 वर्षांत जून महिन्यात पावसाचे दिवस कमी-अधिक ( 7 ते 22) होत आहेत. त्यातच ‘कमी दिवसांत अतिवृष्टी’ म्हणजे ‘इंटेन्स स्पेल’ होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र सरकारचा ‘महावेध’ प्रकल्प स्कायमेटच्या सहकार्याने 2,335 स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे अचूक हवामान माहिती पुरवतो. या प्रकल्पाच्या ‘महारेन’ प्रणालीतून…

Read More

खाद्यपदार्थ व पर्सनल केअर उत्पादने महागतील:कंपन्यांवर कच्च्या मालाच्या खर्चाचा दबाव; पॅकेजिंग साहित्य 56% पर्यंत महागले

येत्या काही दिवसांत दैनंदिन वापराच्या आवश्यक ग्राहक वस्तू महाग होऊ शकतात. सिस्टिमॅटिक्स रिसर्चच्या अहवालानुसार, कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांवर महागाईचा सतत दबाव आहे, ज्यामुळे त्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात. गेल्या दोन महिन्यांत किमती 3 ते 7% पर्यंत वाढल्या अहवालात म्हटले आहे की, वेगवेगळ्या श्रेणीतील कंपन्यांनी गेल्या एक ते दोन महिन्यांतच त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत सरासरी…

Read More

डाबली-धांदरणे जिल्हा परिषद शाळेत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक

तालुक्यातील डाबली धांदरणे येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गिरासे, सदस्य पुना मंगळे, गजानन पाटील, भगवानसिंग गिरासे, तसेच पालक हरीश संकलेचा, अनिल कोळी, सुदाम देवरे आणि रामकृष्ण पाटील यांची प्रमुख…

Read More

नागपुरात डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे 'एक पेड नाती के नाम' उपक्रम:10 उद्यानांमध्ये भारतीय वंशाच्या वृक्षांचे रोपण करणार, नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ

नागपूरमध्ये डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे ‘एक पेड नाती के नाम’ या वृक्षारोपण आणि संवर्धन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, जिथे पर्यावरणप्रेमी नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षांचे वाटप करण्यात आले. नागपूर आणि विदर्भातील…

Read More

जिल्हाधिकारी यांची अभिनव संकल्पना:प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बदल्या, 41 कर्मचारी, 5 मंडळ अधिकारी यांचा समावेश‎

जिल्हा प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात ऑनलाईन समुपदेशनाद्वारे करण्यात आल्या. हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच झाला. त्याद्वारे पात्र ४१ कर्मचाऱ्यांपैकी सर्व एक्केचाळीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मंडळ अधिकारी संवर्गात ५ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाली. ग्राम महसूल अधिकारी संवर्गात ८२ पात्र कर्मचाऱ्यांची बदली झाली. महसूल सहायक संवर्गात ३९ पात्र कर्मचाऱ्यांची…

Read More

100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका:बीबीएफ व टोकण पद्धतीचा अवलंब करा, कृषी अधिकारी कोयले यांचे आवाहन‎

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. विशेषतः ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अन्यथा उगवण कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, असे बार्शी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी सांगितले. यावर्षी मान्सूनचे आगमन झाले असले तरी अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नाही. काही…

Read More

Odisha High Court Ruling on APAAR ID; Parental Consent Mandatory Nationwide

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने APAAR ID संदर्भात कठोर निर्णय दिला आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, कोणतीही शाळा स्वतः मुलांची अपार आयडी बनवू शकत नाही. यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. भुवनेश्वरमधील पालकांनी याचिका दाखल केली भुवनेश्वरमधील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक रोहित आनंद दास यांच्याकडून APAAR ID बनवण्यासाठी संमती मागितली. संमती पत्रात नकार…

Read More

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन विशेष:AI केवळ चॅटबॉट नाही, शेती-शाळा-रुग्णालयांपर्यंत पोहोचतेय, तज्ञांनी सांगितले भारताचे तंत्रज्ञान मिशन

भारतात 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जात आहे. या निमित्ताने, आयआयटी खरगपूर, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रासचे संचालक आणि भारत सरकारच्या एआय-आधारित भाषांतर प्लॅटफॉर्म, भाषिणीचे सीईओ यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या युगात प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञानाबद्दल आणि सामान्य लोकांपर्यंत त्याच्या पोहोचबद्दल त्यांचे विचार आणि प्रयोगांबद्दल सांगितले. आयआयटी खरगपूरचे संचालक प्रा. सुमन चक्रवर्ती म्हणाले…

Read More

Ludhiana Girl NEET AIR-1 Claim Controversy; Scorecard Missing From List

लुधियाना11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लुधियानाच्या एका मुलीने री-नीट (Re-NEET UG) परीक्षेत AIR-1 आल्याचा दावा केला आहे. यामुळे घरी मिठाई वाटण्यात आली. मुलीने अधिकृतपणे निकालाचे गुणपत्रक (स्कोरकार्ड) दाखवले आहे, ज्यात तिचे गुण टॉपर आर्यन गुप्ता आणि पांशुल बंसल यांच्या बरोबरीने 720 पैकी 715 असे लिहिलेले आहेत. मात्र, गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) तिचे नाव नाही. मुलीचा दावा…

Read More

सैनिकांचे योगदान, ऋण कधीही फिटणार नाही:कळवणला आजी-माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्याधिकारी नागेश येवला यांचे प्रतिपादन‎

देशाच्या संरक्षणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या त्यागामुळेच सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत. सैनिकांच्या देशसेवेमुळे देश सुरक्षित असून, त्यांचे ऋण कधीही फिटणार नाही, असे प्रतिपादन मुख्याधिकारी नागेश येवला यांनी केले. रोटरी क्लब कळवणच्या वतीने आयोजित आजी-माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश पाखले, सेक्रेटरी नितीन संचेती…

Read More