Headlines

सोलापूर अतिक्रमण हटाव मोहिम:तिसऱ्या दिवशी एका इमारतमधील एकच अनधिकृत गाळा पाडला, नव्याने 120 इमारतींची यादी तयार;आयुक्तांची मंजुरी मिळताच पाडकाम

शहरातील 35 इमारतींमधील अनधिकृत बांधकामाच्या पाडकाम मोहिमेला 26 मेपर्यंत ब्रेक लागला आहे. त्यानंतर कुठल्या इमारतीवर हातोडा पडेल हे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत महापालिकेकडून नव्याने 120 इमारतींमधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे काम होती घेण्यात आले. पुढील दोन दिवसांत यादी तयार करून आयुक्तांना मेलवर पाठवण्यात येईल. मंजुरी येताच सर्वांना नोटीस बजावून पाडकाम करण्याची मोठी मोहीम हाती…

Read More

पुण्यात गुन्हेगारीचा थरार:दारूच्या नशेत मित्राचा डोक्यात दगड घालून खून, पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात, घोरपडीतील घटना

पुण्यात दारू पिताना झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरातील मोकळ्या जागेत घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव लोकेश मानसिंग ठोंबरे (वय 30, रा. खाडेगाव, जि. नागपूर) असे आहे. पोलिस शिपाई…

Read More

रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता!:इंधन तुटवडा अन् कांदा दरावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघाती हल्ला

राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यालाच स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पेपरफुटी, महागाई, इंधन टंचाई आणि महिला अत्याचाराने संपूर्ण राज्य होरपळत असताना, सरकार मात्र कमालीचे असंवेदनशील बनले आहे. राज्यातील ही गंभीर परिस्थिती पाहता, ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या…

Read More

नकारात्मक परिस्थितीत माणुसकी जपणे महत्त्वाचे – डॉ. सबनीस:मनोहारी मैत्र संघातर्फे पुरस्कार वितरण सोहळ्यात मत व्यक्त

आजच्या नकारात्मक परिस्थितीत माणुसकी, नीतीमत्ता आणि संस्कृती जपणे हेच सर्वात मोठे ध्येय असायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. मनोहारी मैत्र संघातर्फे आयोजित ऊर्जाशील अभियंता आणि मातृभूमी सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात…

Read More

ओडिशामध्ये एटीएमला थारने बांधून उपटले, व्हिडिओ:ओढतांना दोरी तुटली, 3 चोरांना मिळून मशीन उचलता आली नाही; पैसे न काढताच पळून गेले

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तुडीगडिया बाजारात फिल्मी स्टाईलने एटीएम लुटल्याची घटना समोर आली आहे. तीन ते चार बदमाश शुक्रवारी रात्री सुमारे 2 वाजता काळ्या रंगाच्या महिंद्रा थार एसयूव्हीमधून इंडिया1 एटीएम किओस्कवर आले. त्यांनी किओस्कचा दरवाजा तोडला आणि एटीएमला दोरीने थारला बांधून उपटून काढले. नंतर एटीएमला रस्त्यावर ओढत घेऊन जाऊ लागले, पण दोरी तुटली. चोरांनी मशीन उचलून…

Read More

लोकसभा जागा 545 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव:2029 पासून लागू होईल, महिलांना 33% आरक्षण मिळेल, जागा वाढवण्यावर दक्षिणेकडील राज्यांचा विरोध

केंद्र सरकारने लोकसभेच्या एकूण जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासंबंधीचे मसुदा विधेयक खासदारांसोबत शेअर केले आहे. प्रस्तावानुसार, 850 पैकी 815 जागा राज्यांना आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांना दिल्या जातील. सरकार या बदलासाठी संविधान दुरुस्ती करण्याच्या तयारीत आहे. हा प्रस्ताव लागू करण्यासाठी संविधानाच्या कलम 81 मध्ये सुधारणा केली जाईल. यासाठी 16 एप्रिलपासून…

Read More

रुपाली चाकणकरांकडे इतर नेत्यांचे व्हिडिओ:भाजप 'वॉशिंग मशीन'मधून काढून क्लीन चिट देईल, कॉंग्रेसच्या संगीता तिवारींचा आरोप

अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्याव्या लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता काँग्रेस कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांच्याकडे इतर अनेक नेत्यांचे व्हिडीओ असल्याचा दावा तिवारी यांनी केला असून, हे व्हिडीओ सार्वजनिक होऊ नयेत म्हणूनच त्यांना या प्रकरणात क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे…

Read More

सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत:म्हणाल्या- रिश्ते मायने रखते है, संपूर्ण कुटुंब वहिनींच्या पाठीशी

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. रिश्ते मायने रखते है, असे म्हणत त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात, असे सांगताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबतही सूचक भूमिका मांडली आहे. त्यामुळे बारामतीतील राजकारणात वेगळाच रंग भरला आहे. सुनेत्रा पवार यांच्या…

Read More

उष्माघाताने माझा बळी गेला तर फडणवीस जबाबदार:एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा, 30 मे पासून उपोषण करणार- मनोज जरांगे

आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता उष्माघाताने माझा बळी गेला तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेला, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आता होणारे उपोषण खूप कडक होणार आहे. वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही….

Read More

अश्व क्षेत्रासाठी राज्य सरकार करणार सामंजस्य करार:मंत्री पंकजा मुंडेंची घोषणा, संस्थांशी सहकार्य करून देणार उभारी

अश्व क्षेत्राच्या परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थांशी सहकार्य करण्यास आणि विद्यापीठांशी जोडले जाण्यास तत्पर असेल. यासाठी संस्थांशी सामंजस्य करार (MoU) करण्याची घोषणा राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. ‘द इक्वेस्ट्रियन फोरम २०२६’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीच्या अधिपत्याखालील ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’ संस्थेने या परिषदेचे…

Read More