अधिकमासानिमित्त तिर्थाटन:प्रवाशांची गर्दी वाढली; रेल्वेत आरक्षण मिळेना,एसटीतही गर्दी वाढली, महिलांना 50 टक्के सवलतीने संख्या जास्त
उन्हाळ्यात बहुतेक जण पर्यटनासाठी जात असल्याने रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नाही. त्यातच अधिक मासानिमित्त (पुरुषोत्तम मास) तिर्थाटनाला जाणाऱ्यांचीही भर पडल्यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले आहे. सामान्य श्रेणीत तर पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही, अशी प्रचंड गर्दी आहे. अशा प्रवासात गैरसोय होत असली तरी प्रवासी एका रात्रीचा त्रास आहे, असे म्हणत अगदी सहज ती सहन…