हिंगोलीत 30 पैकी 27 मंडळात अतिवृष्टी:नदी, नाल्यांना पूर; सेनगावात पुलावरून कार वाहून गेली, चौघे बचावले
हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासात झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून कयाधू नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी तब्बल २७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सेनगाव तालुक्यातील रामप्रसादनगर भागात पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. मात्र सुदैवाने कार मधील चौघेही बालंबाल बचावले आहे. हिंगोली जिल्हयाला पावसाचा रेड अलर्ट…