Headlines

Women protest at Mahavitaran to remove 33 KV line

मोहोळ शहरातील बागवान नगर आणि अहिल्यानगर परिसरात घरावरील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचा शॉक लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मंगळवारी (१६ एप्रिल) महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सकाळपासून ठ . दि. १५ एप्रिल रोजी बागवान नगरमधील लक्ष्मी विजय आदलिंगे (वय ३२) या यात्रेनिमित्त घराच्या स्लॅबवर स्वच्छता करत…

Read More

युवक काँग्रेसची भारत-अमेरिका ट्रेड डील रद्द करण्याची मागणी:अमरावतीत काँग्रेस भवनसमोर निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

अमरावती युवक काँग्रेसने भारत-अमेरिका व्यापार करार (ट्रेड डील) रद्द करण्याची मागणी केली आहे. हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी घातक ठरू शकतो, असा दावा युवक काँग्रेसने केला आहे. या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू असून, बुधवारी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. केंद्र शासनाने लागू केलेला इंडो-यूएस ट्रेड डील शेतकरीविरोधी असल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे…

Read More

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- उमर खालिदला जामीन मिळू शकला असता:दिल्ली दंगल प्रकरणात आपल्याच निर्णयावर आक्षेप घेतला, म्हटले- जामीन हा अधिकार आहे, तुरुंग अपवाद

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली दंगल कट प्रकरणात जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते उमर खालिदला जामीन देण्यास नकार देण्याच्या आपल्या मागील निर्णयावर आक्षेप घेतला. सय्यद इफ्तिखार अंद्राबी यांच्याशी संबंधित नार्को-टेररिझम प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने सोमवारी हे विधान केले. कोर्टाने असे मानले की, कोणत्याही आरोपीला जामीन देणे हा एक नियम आहे, तर त्याला तुरुंगात पाठवणे हा अपवाद असावा. न्यायमूर्ती उज्ज्वल…

Read More

सेन्सेक्स 600 अंकांनी वाढून 77,500च्या पातळीवर पोहोचला:निफ्टीतही 200 अंकांची वाढ, 24,200च्या पातळीवर

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालांदरम्यान आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी आज (4 मे) भारतीय शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स 600 अंकांच्या वाढीसह 77,500 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची वाढ आहे, तो 24,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. Source link

Read More

बंगळुरूमध्ये जनगणनेसाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन:आवश्यक माहिती देण्यासही नकार दिला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बंगळुरूमध्ये राष्ट्रीय जनगणनेच्या कामादरम्यान एका महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्याने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि काम करण्यापासून रोखले. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 30 एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे 4 वाजता घडली. महिला गणक जनगणनेच्या कामासाठी टी दसरहल्ली परिसरातील मल्लासंद्रा येथील एका घरी गेल्या होत्या. त्याचवेळी…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट:अखेर पातोंडा गावातील शुद्ध पाणीपुरवठा झाला सुरळीत

अकोट तालुक्यातील पातोंडा गावातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्टनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सलग ४० ते ४५ दिवस नळ कोरडे, दूषित पाणी, महिलांची फरपट आणि ग्रामस्थांचे हाल या गंभीर वास्तवावर प्रकाशित झालेल्या बातमीचा परिणाम दिसून आला आहे. अखेर गावात शुद्ध नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे….

Read More

कलाकारांना धमकावण्यापेक्षा बाळासाहेबांचा इतिहास वाचा:कुणाल कामराचे मंत्री प्रताप सरनाईकांना मार्मिक प्रत्युत्तर

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका विडंबन गीतानंतर सुरू असलेल्या हक्कभंग प्रकरणावरून राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामराला इशारा दिला होता. या इशाऱ्याला कामराने सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्मिक उत्तर दिले असून, थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा दाखला दिला आहे….

Read More

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण:देशव्यापी स्पर्धेतून निवड; 70 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह 3,067 प्रवेशिका

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन…

Read More

“एल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात 15 दिवस होणार वाढ:काळजी घ्यावी, पाऊसही पडणार कमी; हवामान तज्ज्ञ प्रकाश पारेख यांची माहिती‎

“एल निनो’च्या प्रभावामुळे दि. १० मेपर्यंत शहरासह महाराष्ट्रातील तापमान वाढत जाणार असून, त्यानंतर तापमान हळूहळू कमी होणार आहे. तसेच आणि यंदा शहरात पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा १५ टक्के कमी पाऊस पडेल, असा अंदाज येथील हवामान तज्ज्ञ प्रकाश पारेख यांनी वर् . “एल निनो’ला दि. २५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. “एल निनो’च्या काळात दररोज तापमात काही प्रमाणात…

Read More

वारंवार वीज खंडितमुळे ग्रामस्थ संतप्त:रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

प्रतिनिधी | खुलताबाद ऐन उन्हाळ्यातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी दि.२७ महावितरण कार्यालयात धडक दिली. ग्रामस्थांना संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांचा रोष अधिकच उफाळून आला….

Read More