Headlines

ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे:ओमराजे निंबाळकरांचे तळ्यात-मळ्यात असो पण डुबायला नको – आदित्य ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया…

Read More

शहागंज, बायजीपुरा, टीव्ही सेंटरमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित:उन्हाळ्यात नागरिक त्रस्त; तांत्रिक बिघाडामुळे रात्री उशिरापर्यंत वीज गायब

छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा पारा वाढत असताना, शहागंज, राजाबाजार, बायजीपुरा, जाधवमंडी आणि टीव्ही सेंटर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी शहागंज परिसरात तांत्रिक बिघाडामुळे तीन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता, जो मध्यरात्री १२ वाजता पूर्ववत करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ४ वाजता मौलाना आझाद चौकातील…

Read More

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई:17 कोटींहून अधिक मूल्याचे ड्रग्ज जप्त, 12 जणांच्या आवळल्या मुसक्या

मुंबई आणि ठाणे परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई सत्र राबवत तब्बल 17 कोटींहून अधिक मूल्याचे ड्रग्ज जप्त केले आहेत. मुंबईतील वर्सोवा (अंधेरी) परिसरात अँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने छापा टाकून 3.82 कोटी रुपये किमतीचे 765 ग्रॅम हेरॉईन जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर दुसरीकडे मीरा रोड परिसरात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 ने…

Read More

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत बघून घेईनची भाषा कशी?:'मिसिंग लिंक' आणि राम मंदिर चोरीवरून राज ठाकरेंची महायुती सरकारवर सडकून टीका

“पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या मुद्द्यावरून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देख लुंगा’ अशी भाषा वापरतात आणि चक्क हिंदीतून बोलतात. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, समोर बसलेले आमदार मराठी आहेत, मग तुम्ही विधानसभेत हिंदीतून कुणाला दम देत आहात? दिल्लीत बसलेल्या तुमच्या पक्षातील वरिष्ठांना संदेश द्यायचा आहे का?” अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका…

Read More

अभिषेक बॅनर्जींच्या येण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर गोंधळ:टीएमसी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारामारी; दावा- भाजप कार्यकर्ते अंडी घेऊन पोहोचले होते

कोलकाता विमानतळावर शुक्रवारी रात्री भाजप आणि तृणमूल काँग्रेस (TMC) कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, त्यामुळे तेथे गोंधळ निर्माण झाला. यावेळी एक महिला बेशुद्ध पडली. TMC कार्यकर्ते पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते, जे दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन परत येत होते. अभिषेक यांच्या एका समर्थकाने आरोप केला की, भाजपशी…

Read More

आढावा बैठक:इतके निष्क्रिय अधिकारी प्रथमच पाहतोय, काम शासनासाठी करता की ठेकेदारांसाठी

अकोले तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई आणि रखडलेल्या विकासकामांवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी प्रशासनाचे वाभाडे काढले. “इतके निष्क्रिय अधिकारी मी पहिल्यांदाच पाहत आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तरी प्रशासनाला फरक पडत नाही. अधिकारी सरकारसाठी काम करतात की ठेकेदारांसाठी?” अशा शब्दांत विखे पाटलांनी आपला संताप व्यक्त केला. येथील विठ्ठल लॉन्सवर आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते…

Read More

पुणे विधान परिषद जागा भाजपनेच लढवावी:जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी

पुणे जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, अशी आग्रही मागणी केली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष तसेच स्थानिक आघाड्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता ही मागणी करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात…

Read More

संरक्षण मंत्री म्हणाले- संरक्षणाप्रमाणे नॉलेज कॉरिडॉर तयार करा:राजनाथ सिंह म्हणाले- आपल्याला सरप्राईज एलिमेंटवर काम करायचे आहे; प्रयागराजमध्ये नॉर्थ टेक सिम्पोजियमचे उद्घाटन

प्रयागराजमध्ये सोमवारी उत्तर तंत्रज्ञान परिसंवाद (नॉर्थ टेक सिम्पोजियम) 2026 ची सुरुवात होत आहे. याचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दीप प्रज्वलित करून केले. ते म्हणाले- ‘डिफेन्स कॉरिडोर’प्रमाणे ‘नॉलेज कॉरिडोर’ तयार करा. ते म्हणाले- ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जगाला आपल्या ताकदीची जाणीव झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले- ‘ऑपरेशन सिंदूर’चे उदाहरण आपल्यासमोर आहे. या ऑपरेशनला एक…

Read More

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण:एसआयटीच्या रडारवर छत्रपती संभाजीनगर विभाग; बनावट मान्यता, कागदपत्रांद्वारे लाटले अनुदान

राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे लोण छत्रपती संभाजीनगरमध्येही पोहोचले आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, तुकडीला मान्यता नसतानाही संचमान्यता देत नव्याने शिक्षक भरती केल्याचे विविध कागदपत्रांवरून समोर आले आहे. त्यात विशेष म्हणजे अनेक वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीचे जावक क्रमांक शिक्षण विभागाच्या दप्तरी जुळत नसल्याचे समोर आले आहे. सुमारे 4 हजार मान्यतांची…

Read More

नाविन्यपूर्ण कला असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाव द्यायला हवा- डॉ. अशोक रुपनर:दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेत 50 शिक्षकांचा सहभाग‎

मुलांना प्रात्यक्षिक करायचे असतात परंतु हव्या तेवढ्या सुविधा नसतात. शाळेमध्ये घ्यायचे झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. रोजच्या वेळापत्रकामधून वेळ भेटत नाही तर सुट्टीच्या दिवशी अशा ऍक्टिव्हिटी घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर मुलांना सायन्स सेंटरमध्ये घेऊन जायला हवे, प्रात्यक्षिक दाखवायला हवेत. सर्वच मुले नाविन्यपूर्ण नसतात, परंतु ज्यांच्याजवळ नाविन्यपूर्ण कला आहे त्यांना वाव द्यायला हवा, असे प्रतिपादन डॉ. अशोक…

Read More