Headlines

शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी जीरामजी योजनेचा लाभ घ्यावा, पंचायत समिती सभापती अनिता बनकर यांचे आवाहन‎

केंद्र व राज्य शासनाची मनरेगा योजनेचे नव्याने सुधारणा करून जीरामजी ही योजना सुरू केली असून शेतकऱ्यांनी जीरामजी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अनिता बनकर यांनी केले आहे. बनकर म्हणाल्या की, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. सिंचन विहीर,गायगोठे, शेततळे,विविध फळ व वृक्षलागवड, पाणंद रस्ते सह विविध विकास कामांचा यात…

Read More

संभाजीनगरात जुना वाद मिटवण्याचे कारण देत बोलावून घेत हत्या:वादातून तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपींची अटक बेकायदा ठरवून कोर्टाकडून सुटका

तरुणांच्या दोन गटात मागील ४ दिवसांपासून वाद सुरू होता. या वादात माजी नगरसेवकाने मध्यस्थी केली. तरीही तरुणाला भेटायला बोलावत त्याची हत्या केली. ही घटना रविवारी (२६ जुलै) मध्यरात्री १२.४५ वाजेच्या सुमारास रोजाबाग परिसरात घडली. यात नासेर खान तारेख अहेमद . घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त सागर देशमुख, निरीक्षक निर्मला परदेशी, रवींद्र सांगळेंनी घटनास्थळी भेट दिली….

Read More

खुशखबर!:जायकवाडी 53%भरले; सेकंदाला 13 लाख लिटर पाणी आवक, नाशिकच्या विक्रमी पावसाने संभाजीनगरला दिलासा,

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सध्या जायकवाडीत ४७,४०५ क्युसेक (सुमारे १३ लाख ४२ हजार ३५७ लिटर प्रति सेकंद) वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. अवघ्या ४ दिवसांत तब्बल ४८१.३८ दलघमीहून अधिक पाण्याची आवक झाली आहे. २२ जुलै रोजी ३१ टक्के असलेला उपयुक्त जलसाठा रविवारी (२६ जुलै) रात्री ९ वाजेपर्यंत ५३.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच…

Read More

ठाण्यात निवृत्त अधिकाऱ्याला घातला 65 लाखांचा गंडा:शेअर बाजारात दुप्पट परतावा देण्याचे आमिष

नवी मुंबईतील ‘स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’च्या (सिडबी) ७३ वर्षीय निवृत्त सरव्यवस्थापकाची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने ६५.१९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या या पीडित व्यक्तीला २३ जून रोजी एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून दुप्पट परतावा देण्याचे आमिष ग्रुप ॲडमिनने दिले. ग्रुपवर…

Read More

ताडोबा जंगलात विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करताना आली वाघीण:5 वीज कर्मचारी एकाच खांबावर 1 तास अडकले, वाघिणीची गुरगुर पाहून 9 पैकी 4 जण चढले ट्रॅक्टरवर

चंद्रपुरातील ताडोबा-व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील मूल तालुक्यात फुलझरी गावातील महावितरणचे कर्मचारी विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करत असताना अचानक वाघीण झुडपातून शांत, दबक्या पावलांनी त्यांच्या समोर आली तोच क्षणाचाही विलंब न करता पाच कर्मचारी चपळाईने विजेच्या खांबावर चढले. इतर ४ जण ट्रॅक्टरवर जाऊन बसले. खाली येरझारा मारणारी वाघीण पाहून विजेच्या खांबावर राहावे लागले. गुरुवारच्या…

Read More

मंडे मेगा स्टोरी:मेडिकल टुरिझम, देशात आले 5 लाख रुग्ण, 1.5 लाख कोटींचे मार्केट होणार, विदेशातून भारतात येणारे रुग्ण 16 वर्षांत 4.5 पट वाढले…

Marathi News National Medical Tourism, 5 Lakh Patients Came To The Country, A Market Worth 1.5 Lakh Crores Will Be Created, Patients Coming To India From Abroad Have Increased 4.5 Times In 16 Years… नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत आता केवळ स्वस्त उपचारांचे ठिकाण उरलेले नसून मेडिकल टुरिझमचे एक मोठे जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने…

Read More

महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीच्या वावड्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्या:केंद्रात शिक्षणमंत्रिपदी वर्णी, विराेधकांचा दावा

केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पडदा टाकला. “मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. मी मुंबईतच आणि महाराष्ट्रातच राहणार आहे”, असे स्पष्ट करत त्यांनी दिल्लीत जाण्याच्या अफवा फेटाळून लावल्या. सीजेपी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान पायउतार झाल्यानंतर त्या पदावर फडणवीस यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा त्यांच्या दिल्लीवारीने…

Read More

संभाजीनगरसह राज्यातील 8 दूध डेअरींवरील एफडीएच्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती:त्रुटी सुधारण्यास 14 दिवस मुदत दिली नाही

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर दूध आणि अन्न विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर आणि जालना येथील ८ दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्यासमोर या याचिकांवर सुनावणी…

Read More

आषाढी सोहळ्यानंतर पंढरपुरातून लाखो वारकरी परतीच्या मार्गावर:दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र

श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडताच लाखो वारकऱ्यांनी रविवारी परतीचा प्रवास सुरू केला आहे. यामुळे पंढरपूरचे बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. दरम्यान, मंदिर परिसर, दर्शनरांग वगळता शहरात सर्वत्र वातावरण अगदी सामान्य झाल्याचे दिसून येते. शनिवारी एकादशी सोहळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री…

Read More

प्रगतिशील शेतकरी:सेंद्रिय कर्ब संवर्धनातून प्रति एकर 82 टन ऊस उत्पादन, जुन्नरमधील शेतकऱ्याचा ‘सुपरकेन’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील प्रयोगशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण यांनी सेंद्रिय कर्ब संवर्धन, पाचट व्यवस्थापन आणि ‘सुपरकेन’ रोपवाटिका तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ साधली आहे. त्यांच्या ४० एकर शेतीमध्ये प्रति एकर सरासरी ८२ टन ऊस उत्पादन मिळत आहे. एका हंगामात एकरी सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो….

Read More