Headlines

जायकवाडी धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ:53 टक्के साठा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना सिंचनाची आशा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून, धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी रात्री धरणात ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक…

Read More

संसद मार्चमध्ये पोलिसांच्या कारवाईविरोधात सोमवारी सुनावणी:सुप्रीम कोर्टात 2 याचिका दाखल; पोलिसांवर अवाजवी बळाचा वापर केल्याचा आरोप

सर्वोच्च न्यायालय सोमवारी दोन वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. या याचिकांमध्ये आरोप आहे की, NEET पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अत्याचार केले. या याचिका २० जुलैच्या संसद मार्चशी संबंधित आहेत, जो कॉकरोच जनता पार्टीने आयोजित केला होता. २७ जुलैच्या कॉज लिस्टनुसार, या याचिका सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही….

Read More

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना साडेचार कोटींची वीज सवलत:छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख ग्राहकांना लाभ

आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतो, तसेच वापरावर नियंत्रण ठेवणेही शक्य होते. महावितरण घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरावर मोठी सवलत देत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख घरगुती ग्राहकांना आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे….

Read More

पाच वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यात पेन्सिल घुसली:घाटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, दृष्टी वाचवण्यात यश

एका पाच वर्षीय मुलीच्या डोळ्यात खेळताना पेन्सिल घुसली. या घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. या पाच वर्षीय चिमुकलीची दृष्टी वाचवण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील डॉक्टरांना यश आले आहे. नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया करून चिमुकलीला नवजीवन दिले. सुरुवातीला या चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि…

Read More

अमरावतीच्या विकासावर अजितदादांचे प्रतिबिंब- संजय खोडके:जनसेवा सप्ताहात २५०० दाखल्यांचे वितरण, विविध योजनांचा लाभ

अमरावती शहराच्या विकासावर लोकनेते अजितदादा पवार यांच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले. जनसेवा सप्ताहांतर्गत आयोजित महाराजस्व अभियान व समाधान शिबिरात त्यांनी हे मत व्यक्त केले. या शिबिरात सुमारे २५०० विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेता आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत…

Read More

कवी शिवा इंगोले यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन:डॉ. अनिल सकपाळ म्हणाले- भारतीय तत्त्वज्ञानाचा संघर्ष समजून घ्या

ज्येष्ठ कवी व साहित्यिक शिवा इंगोले यांच्या “अक्षराचा तिसरा डोळा” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबईत पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्या वतीने साहित्यिक बाबुराव बागुल यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अनिल सकपाळ यांनी सांगितले की, “कवी हा संस्कृतीला प्रश्न…

Read More

महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक विभागातर्फे पालखी सोहळा उत्साहात संपन्न:वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाली विद्यार्थी

25/07/ 2026 शनिवार रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक शाळेतर्फे पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल वानखेडे, तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक अफसर शेख यांनी पालखीचे पूजन करून पालखी सोहळ्याची सुरुवात केली. मालती वाल्हे यांनी वारीची वैशिष्ट्ये सांगितली. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत भक्तिमय…

Read More

सर्वोच्च न्यायालयाने सरकारची याचिका फेटाळली:२८ प्राध्यापकांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा

ज्या प्राध्यापकांची नियुक्ती प्रक्रिया १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सुरू झाली होती, परंतु त्यांची प्रत्यक्ष नियुक्ती या तारखेनंतर झाली, अशा २८ प्राध्यापकांना आता जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे संबंधित प्राध्यापकांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग सुकर झाला…

Read More

SIR मुळे प्रशासनाची धावपळ:अमरावती जिल्ह्यातील 9 लाख मतदारांची नावे वगळण्याची भीती

अमरावती जिल्ह्यात मतदार यादीच्या एसआयआर कार्यक्रमांतर्गत २५ लाख मतदारांपैकी आतापर्यंत केवळ १६ लाख नागरिकांनीच गणना फॉर्म भरले आहेत. यामुळे ९ लाख नागरिक अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. वेळेत फॉर्म न भरल्यास त्यांची नावे मतदार यादीतून कमी होण्याची भीती असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ सुरू आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत जून महिन्यापासून मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात…

Read More

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चांदूरमध्ये जल्लोष:कॉकरोच जनता पार्टीने फटाके फोडून घोषणाबाजी केली

चांदूर रेल्वे येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने जल्लोष साजरा केला. शहरातील जुन्या मोटार स्टँड परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी “असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाची प्रत हातात घेऊन संविधान आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संदेश दिला. या…

Read More