Headlines

फोटो व्हायरलची धमकी देत महिलेचे घाटीतून अपहरण:पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवत अत्याचार, संभाजीनगरातील घटना; बदनापूरातील पीडिता

मावस भावाला भेटण्यासाठी घाटीत आलेल्या ३५ वर्षांच्या ऊसतोड मजूर महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. इन्स्टाग्रामवरील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन हे अपहरण करण्यात आले. १५ ते १७ जुलै दरम्यान नेवासा येथे हा प्रकार घडला. प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजू म्हसू माळी (२७, रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव आहे….

Read More

आज CJP-सरकारमध्ये चर्चेची तिसरी फेरी:प्रधानांच्या राजीनाम्यावर मिळणार उत्तर; आंदोलनाचा परिणाम- दिल्लीत दारू दुकाने लवकर बंद होणार

नीट पेपरफुटीतील गैरव्यवहारांविरोधात आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यात शुक्रवारी दुसऱ्या फेरीची चर्चा झाली. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, CJP ने 3 मागण्या आणि परीक्षा सुधारणांसाठी 5 सूचना मांडल्या आहेत. सरकार यावर चर्चा करत आहे. आज शनिवारी दुपारी 3.30 वाजता तिसऱ्या फेरीची बैठक होईल. ज्यात सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आपली…

Read More

पायरेटेड सॉफ्टवेअरद्वारे महाराष्ट्र सरकारचे कोट्यवधींचे व्यवहार:‘कॅग’च्या अहवालातून खुलासा, राज्य सरकारच्या तिजोरीवर सायबर हल्ला होण्याचा धोका

राज्य सरकारच्या तिजोरीची सुरक्षा आणि आर्थिक व्यवहार सध्या वाऱ्यावर आहेत. कार्यालयांच्या संगणकातील ‘पायरेटेड सॉफ्टवेअर’मधून कोट्यवधींचे व्यवहार सुरू आहेत. भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक अर्थात कॅग-२०२६ च्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या संगणकांवर अनधिकृत सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे अन् पेन ड्राइव्हच्या वापरावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळेच सायबर चोरांना मोकळे रान मि‌ळते. सरकारी तिजोरीलाही सायबर…

Read More

…आणिक दर्शन विठोबाचे!:पंढरपुरात पहाटे 3 वा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा; सलग 20 वर्षे वारी करणाऱ्या धाराशिवच्या माने दांपत्याला पूजेचा मान

श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व मानाचे वारकरी दांपत्य यांच्या हस्ते परंपरेनुसार ही पूजा झाली. यंदा मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील गौरगांवच्या बाबासाहेब माने (वय ७०) व प्रभावती माने (वय ६८) या वारकरी…

Read More

बनावट 'शालार्थ आयडी'द्वारे 190 कोटींचा घोटाळा:माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक, नाशिक रोड पोलिसांची कारवाई

बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून राज्य शासनाची तब्बल १९० कोटी रुपयांची महाप्रचंड आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगणीकर (वय ६६) यांना धुळे येथून अटक करण्यात आली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत या गंभीर घोटाळ्याचा गुन्हा…

Read More

Rohit Pawar Supports NEET Protest at Jantar Mantar, Demands CJI Impeachment

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या ‘कॉकरोज जनता पार्टी’च्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पूर्ण पाठिंबा जाहीर केला. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत द . नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी मागील एक महिन्यापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे…

Read More

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या माण-बालेवाडी टप्प्याला CMRS ची मंजुरी:सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी, प्रवासी सेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

हिंजवडी आयटी पार्कला शहराशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या प्रवासी सेवेचा मार्ग आता अधिकृतरीत्या मोकळा झाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यानच्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तात्पुरते प्राधिकरण प्रदान केले आहे. या मंजुरीमुळे सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीअंतर्गत ‘एटीपी’ मोडवर…

Read More

रवनीत बिट्टू यांचा मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा:राष्ट्रपतींनी मंजूर केला; भाजपने राज्यसभेचे तिकीट दिले नव्हते, पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार

केंद्रीय राज्यमंत्री रवनीत बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा २४ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. बिट्टू यांना काही काळापूर्वी भाजपने राज्यसभेचे तिकीट दिले नव्हते, त्यामुळे ते आता खासदार नव्हते. ते केंद्र सरकारमध्ये पंजाबमधून भाजपचे एकमेव राज्यमंत्री होते, त्यांना रेल्वे राज्य आणि अन्न प्रक्रिया उद्योग विभाग देण्यात आला होता. ते…

Read More

ढोल ताशा महासंघाकडून वाद्यपूजन:कसबा गणपती मंदिरात शहरातील पथकांचे प्रतिनिधिक पूजन

ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने शहरातील सर्व ढोल-ताशा पथकांच्या प्रतिनिधिक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध गणपती मंडळांचे पदाधिकारी आणि शहरातील ढोल-ताशा पथकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष…

Read More

कर्जमाफीतील पारदर्शकतेसाठी मोठा निर्णय:शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहूनच करावी लागणार KYC; मोबाईल ओपीटीद्वारे आधार प्रमाणीकरण बंद

राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊनच आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. मोबाईलवर ओटीपीद्वारे आधार प्रमाणीकरण बंद करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. योजनेमध्ये योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा तसेच पारदर्शकता रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना…

Read More