केडगावात 700 विद्यार्थ्यांनी दिला संस्कार अन् पर्यावरणाचा प्रभावी संदेश
प्रतिनिधी|अहिल्यानगर केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरात विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भक्तीमय वातावरणात ‘पंढरीची वारी, वृक्षदिंडी आणि शिक्षणाची वारी’ हा आगळावेगळा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बालवाडी ते दहावीपर्यंतच्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी वारकरी बनत महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, संस्कारांचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई, प्रभू श्रीराम,…