कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते देशी गोवंश प्रदर्शन उद्घाटन:शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील: कृषी मंत्री
हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना या संकटकाळातून बाहेर काढणे ही राज्य शासनाची जबाबदारी असून, त्याप्रमाणे शासन काम करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय येथे ‘शुद्ध…