Headlines

बंगालमध्ये जिथे पुन्हा निवडणूक, तिथे TMC उमेदवाराची माघार:फालता येथे भाजप चिन्हावर टेप चिकटवलेला आढळल्याने निवडणूक रद्द झाली होती

पश्चिम बंगालमधील फालता विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतदान होण्यापूर्वी दोन दिवस आधी तृणमूल काँग्रेस (TMC) उमेदवार जहांगीर खान यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. जहांगीर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच २९ एप्रिल रोजी फालतामध्ये मतदान झाले होते. यावेळी काही मतदान केंद्रांवर (बूथ) ईव्हीएममध्ये भाजपच्या बटणावर टेप चिकटवलेला…

Read More

छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या:आरोपी फरार, शोधासाठी पथके रवाना

छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत मंगळवारी (9 जून) घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी मुलगा अजीऊल शेख (19) हा पसार असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले. मूळ प. बंगालचे मती शेख हे मुलगा शाहीन, अजीऊल शेख (19) यांच्यासह बाबर कॉलनीत…

Read More

‘महारेल’कडे ‘आरओबी’चे काम दिल्यास पुनर्बांधणीत विलंबाची शंका:पावसाळी अधिवेशनात आ. संजय खोडके यांनी उपस्थित केला मुद्दा‎

शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या (आरओबी) पुनर्बांधणीचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) कडे हस्तांतरित केल्यास सर्व तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय प्रक्रिया नव्याने कराव्या लागतील. त्यामुळे प्रकल्पाला मोठा विलंब होऊन काम रखडण्याची शक्यता असल्याचा मुद्दा विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. मागील दहा महिन्यांपासून धोकादायक ठरलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून सर्व प्रकारची वाहतूक…

Read More

नीट – एसएस काउन्सिलिंगला विलंब:देशभरातील डॉक्टरांवर बेरोजगारीची वेळ, ‘फेमा’चा आंदोलनाचा इशारा

नीट-एसएस २०२४-२५ च्या काउन्सिलिंग प्रक्रियेला होत असलेल्या अनिश्चित विलंबामुळे देशातील सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ’ने (फेमा) वैद्यकीय समुपदेशन समितीला पत्र लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. एमसीसीच्या वेळापत्रकानुसार सुपर-स्पेशालिटीचे शैक्षणिक सत्र १० एप्रिल २०२६ रोजी सुरू होणार होते, मात्र मे महिना संपत…

Read More

सीना नदीवरील पुलामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला:9 महिने उलटूनही दुरुस्ती नाही, केवड परिसरातील ऊस कारखान्याची अवजड वाहने आणि विद्यार्थ्यांचा प्रवास बनला जीवघेणा‎

. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरामुळे सिना नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला असून पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या जॉईंटला भेगा पडल्या असून आतले गज उघडे पडल्याने पूल कमकुवत झाला आहे. तरीही गेल्या ९ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून अपघात होण्याआधीच पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी…

Read More

10 हजार किलो ई-कचऱ्याचे संकलन:कसब्यात पर्यावरणपूरक उपक्रम; शास्त्रोक्त पद्धतीने होणार विल्हेवाट

कसबा मतदारसंघात राबवण्यात आलेल्या ई-कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेअंतर्गत तब्बल १० हजार किलो ई-कचरा जमा करण्यात आला असून, वर्षानुवर्षे घरात पडून राहिलेल्या या कचऱ्याचे आता शास्त्रोक्त पद्धतीने विघटन केले जाणार आहे. आमदार हेमंत रासने यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भेटवस्तू नको, ई-कचरा द्या’ या अभिनव संकल्पनेतून हा उपक्रम शनिपारजवळील कवठी अड्डा येथे पार…

Read More

Maharashtra Cabinet Approves AI Policy, Green Maharashtra Commission; Boosts Disabled Education

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज 7 महत्त्वाच्या निर्णयांवर आपली मोहोर उमटवली. यात सरकारने दिव्यांगांच्या शिक्षणाच्या सबलीकरणासाठी ठोस निर्णय घेतला असून, हरित महाराष्ट्र आयोगाचीही स्थापना केली आहे. सरकारने सामाजिक . खाली वाचा मंत्रिमंडळाचे विभागनिहाय संक्षिप्त निर्णय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण…

Read More

पुढील ५ दिवस उकाड्यापासून सुटका नाही:दोन दिवस रेड अलर्ट; त्यानंतरही तीन दिवस चटके कायम, पूर्वमोसमी पावसाकडे लक्ष‎

प्रतिनिधी | अमरावती सलग दोन आठवड्यांपासून अमरावतीत उष्णतेचा कडाका कायम आहे. हवामान विभागाने ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. पुढील पाच दिवस अमरावतीकरांना या जीवघेण्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. २९ मेपासून तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला…

Read More

अमरावती पोलिसांना मिळाले 'कुलिंग जॅकेट':उन्हाळ्यात वाहतूक नियंत्रण सोपे करण्यासाठी अभिनव उपाय

अमरावती शहरात वाढत्या तापमानामुळे वाहतूक पोलिसांना आता ‘कुलिंग जॅकेट’चा दिलासा मिळाला आहे. भर उन्हात चौकाचौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही जॅकेट अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. यामुळे त्यांना उन्हाळ्यात कर्तव्य बजावणे सोपे होणार आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शहरातील वाहतूक शाखेतील तिन्ही विभागांमधील सुमारे दीडशे वाहतूक पोलिसांना ही…

Read More

जूनमध्ये 11 दिवस बँकांमध्ये कामकाज बंद राहणार:4 रविवार, 2 शनिवार व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी 5 दिवस बँका बंद राहतील

पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. आरबीआयने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार, पुढील महिन्यात 4 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 5 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँका बंद राहतील. ऑनलाइन बँकिंगद्वारे कामे करता येतील बँकांच्या सुट्ट्या असूनही, तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार किंवा इतर कामे करू शकता. या सुविधांवर…

Read More